शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमावर्ती राज्यांमध्ये उद्या होणारा मॉक ड्रिल पुढे ढकलला; 'ऑपरेशन शील्ड'ची नवीन तारीख लवकरच जाहीर होणार
2
पुण्यात झाड कोसळून १ ठार; कोल्हापुरात जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी भूस्खलनाच्या घटना
3
एक वर्षानंतर 'कोविड पॉझिटिव्हिटी दर जास्त, NB.1.8.1 व्हेरिएंट वाढले'; WHO ने दिला इशारा
4
शस्त्र परवान्यासाठी गोळीबाराचा बनाव; शिंदे गटाच्या युवासेना जिल्हाप्रमुख निलेश घारे यांना अटक
5
Vaishnavi Hagawane Death Case :'आमचा आमच्या मुलीवर पूर्ण विश्वास'; हगवणेंच्या वकिलांच्या युक्तीवादावर वैष्णवीच्या कुटुंबीयांची पहिली प्रतिक्रिया
6
हगवणे बंधूंनी नीलेश चव्हाणच्या मदतीने केला आई, बहिणीचा मोबाईल लंपास; पोलिसांची कोर्टात माहिती
7
Rohit Sharma Gautam Gambhir, IND vs ENG: खुद्द रोहित शर्माने इंग्लंड दौऱ्यासाठी 'या' व्यक्तीबद्दल गौतम गंभीरकडे केली विनंती
8
सेबीच्या माजी अध्यक्षा माधबी पुरी बुच यांची हिंडेनबर्ग रिपोर्टच्या आरोपातून सुटका! लोकपालांनी दिली क्लीनचिट
9
आमच्याकडे ५ कोटींच्या गाड्या; आम्ही ४० लाखांच्या फॉर्च्युनरसाठी कशाला छळ करु - हगवणेंचे वकील
10
पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल करण्यास झालेल्या विलंबाची चौकशी व्हावी; महिला आयोगाचे मुख्यमंत्र्यांना पत्र
11
पाकिस्तानातील हिंदू क्रिकेटपटूचे दोन्ही पाय कापून टाकले, कारण ऐकून तुम्हालाही वाटेल वाईट
12
टॅरिफ आवश्यक, अन्यथा भारत-पाकिस्तान युद्धविराम भंग होऊ शकतो; ट्रम्प सरकारचा अमेरिकन न्यायालयात दावा
13
वैष्णवीचे एका व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरु होते, म्हणून तिने...' हगवणेंच्या वकिलांचा अजब युक्तिवाद
14
ड्रोन हल्ल्यांपासून वाचण्याचे मार्ग, ऑपरेशन शील्ड' अंतर्गत उद्या या ४ राज्यांमध्ये मॉक ड्रिल होणार
15
आकडे बोलतात! 'लोकमत डॉट कॉम'ला दणदणीत 'बहुमत'; वाचकांचा विश्वास जिंकला, मराठी न्यूज वेबसाईट्समध्ये 'नंबर पहिला'
16
माजी मंत्र्याचा सचिव, पाकिस्तानला पुरवत होता गुप्त माहिती! जैसलमेरमधून पकडला गेला आणखी एक गद्दार
17
इलॉन मस्क यांना नकार देणे 'अ‍ॅपल'ला महागात पडले; आयफोन वापरकर्त्यांना ही खास सेवा मिळत नाही
18
'मला रात्री घराबाहेर काढलं', परिणय फुकेंवर प्रिया फुकेंचे आरोप; सुषमा अंधारेंनी CM फडणवीसांना केली विनंती
19
बेडरूममध्ये बसली होती सवत, बघताच पहिल्या पत्नीला संताप झाला अनावर! पुढे पतीने जे केले, ते वाचून व्हाल हैराण
20
सर्वात मोठा खुलासा; पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीर पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड...

अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

डावा कालवाअंतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी चुल्हाड आणि बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील शेत शिवारात वितरण करण्यात आले आहे. चांदपूर ...

डावा कालवाअंतर्गत चांदपूर जलाशयाचे पाणी चुल्हाड आणि बपेरा जिल्हा परिषद क्षेत्रातील गावातील शेत शिवारात वितरण करण्यात आले आहे. चांदपूर जलाशयअंतर्गत चार हजार हेक्टर आणि सिंचन सुविधाने तीन हजार हेक्टर शेती ओलिताखाली आणण्यात आली आहे. उन्हाळी धान पिकांची लागवड या शेतीत करण्यात आली आहे. उन्हाळी धानाची लागवड करताना शेतकरी आनंदीत होते. अनेक वर्षांनंतर डावा कालवाअंतर्गत पाणी मिळाले होते. पाणी वितरण सुरू असताना शेतकऱ्यांनी नहरावर रात्र जागून काढली. विक्रमी उत्पादन घेण्याकडे शेतकऱ्यांनी आगेकूच केली होती. ऐन धान कापणीच्या हंगामात चक्रीवादळाने शेतकऱ्यांचे होत्याचे नव्हते केले. उभे धान जमिनीवर लोळले, धानाच्या लोंब्या जमिनीला झाले. फक्त तनीस असल्याचे दिसून येत आहे. यानंतर शेतकऱ्यांनी डोक्यावर हात ठेवले आहे. शेतकऱ्यांचे नियोजन एका क्षणात समाप्त झाले आहे. अवकाळी पाऊस, चक्रीवादळ अशा चर्चा होत आहेत. लोकप्रतिनिधींच्या भलत्याच शिवारात भेटी सुरू आहेत. सिहोरा परिसरात चक्रीवादळाने धान व आंब्याचे उत्पादन गेले आहे. माय-बाप शासनाने साधे सर्वेक्षणाचे आदेश दिले नाहीत. यामुळे सानुग्रह मदतीची अपेक्षा भंगली आहे. असे झाले तरी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचाऱ्यांना कुणी जाब विचारत नाहीत. परंतु नुकसानग्रस्तांच्या मनात खदखद आहे. एका जिगरबाज नेत्यांकडून मोठया अपेक्षा वाढल्या आहेत. त्यांच्या बोलण्याची प्रतीक्षा शेतकरी व उत्पादकांना आहे. शब्द आणि निर्णयात वजन असल्याचे सर्वांना माहीत आहे. दरम्यान, सिहोरा परिसरातील नागरिक, शेतकरी गेल्या दोन वर्षांपासून संकट अनुभवत आहेत. कोरोना विषाणूच्या लाटेने रोजगार हिरावला आहे. अवकाळी पावसाने शेत शिवारातील उत्पादन गिळले आहे. घरा-घरात चित्त आणि चिंतन सुरू झाले आहे. घरात बसून असल्याने तिजोऱ्या रिकाम्या झाल्या आहेत. गावातही रोहयोचे कामे नाहीत. यामुळे जीवनाचा उदरनिर्वाह अडचणीत असल्याचे दिसून येत आहेत. शासनाने मदतीची उभारी देऊन शेतकऱ्यांना तारले पाहिजे, असा एकच सूर गावात आहे.

बॉक्स

रोजगार देणारे शेतकरी अडचणीत :

ग्रामीण भागात खऱ्याअर्थाने गावातील महिला व पुरुष मजुरांना शेतकरीच मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध करीत आहेत. खरीप व रब्बी हंगामात रोजगाराचा कालावधी आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भाव संकट असताना सामाजिक सुरक्षा अंतरचे भान ठेवत गावातील मजुरांना रोजगार दिला आहे. रोहयोच्याबाबतीत ग्रामपंचायतींनी कानावर हात ठेवल्यानंतर खऱ्याअर्थाने शेतकरीच धावून आले आहेत. याशिवाय बिडी उद्योगानेही गावातील कामगारांची आर्थिक अडचण दूर केली आहे. परंतु मजुरांना तारणाऱ्या शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने हाल हाल केले आहे. सरसकट शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.