शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
3
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
4
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
5
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
6
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
7
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
8
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
9
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
10
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
11
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
12
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
13
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
14
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
15
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
16
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
17
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
18
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
19
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया
20
दिल्लीच्या प्रदूषणामुळे 'या' ५ कंपन्यांचे शेअर झाले हॉट! Air Purifier ची मागणी वाढल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष

किती ही लूट? बीटीबीमंडीत कांदा २० रुपये, तर घराजवळ ३५रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री ...

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री करीत आहेत. मात्र शहरात होलसेल दरात मिळणारे दर व बाहेर रिटेलमध्ये असलेल्या दराची तुलना केली तर भाजीपाल्याचे दर हे दुप्पट दराने विक्री केली जात आहे. भंडारा शहरातील बीटीबी सब्जीमंडीत कांदा २० रुपये किलो असला तरी घराजवळ मात्र तो ३० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे.

भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी आधुनिक युगात हायटेक होत आहे. तंतोतंत शेती करीत उत्पन्न वाढवित आहे. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटली आहे. परिणामी व्यापारी स्वस्त दरात भाजीपाल्याची खरेदी करीत असला तरी ग्राहकांना तो महाग घ्यावा लागतो.

बॉक्स

गांधी चौकात भेंडी, १० रुपये, त्रिमुर्ती चौकात, १५ रुपये किलो

शहरात होलसेल भाजीपाला विक्रीचे ठिकाण बीटीबी सब्जीमंडी आहे. याठिकाणी भेंडीचे दर पाच ते सात रुपये किलो होते. मात्र याच भेंडीची शहरातील गांधी चौकात खरेदी केली असता ते दहा रुपये तर त्रिमुर्ती चौकात १५ रुपये किलो होती.

बॉक्स

पिकवितात शेतकरी जास्तीचा पैसा तिसऱ्यांच्याच हातात !

जिल्ह्यात भाजीपाल्याची आधुनिक शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. मात्र भाजीपाल्याला अत्यल्प दर मिळत असल्याने संकट उभे ठाकले आहे. मजुरीचे दर, कीटकनाशक, खत यांचे नियोजन आवाक्याबाहेर आहेत. अशा स्थितीत शेतकरी आपला माल सब्जीमंडीत विकूण आपली उपजिवीका भागवित आहे. खर्च झालेला उत्पन्न भाजीपाला विक्रीनंतर मिळत नाही. व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदीनंतर तोच माल दुकानदारांना विकला जातो. दुकानदार रोजगारासाठी पाच ते दहा रुपये अधिकची रक्कम ठेवून विक्री करतात.

कोट

वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अधिक वाढले आहे. जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने दर अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला दर बरे आहेत. ऑगस्ट महिन्यात दर वाढण्याची शक्यता अधिक आहे. शेतकरी भाजीपाला थेट बीटीबी सब्जीमंडीत आणतात. वाहतुकीवर खर्च, भाजीपाला पिकविताना मजुरीचे दर, कीटकनाशक, रासायनिक खत यासह पिकांची देखभाल शेतकरी करीत असतो. त्यानंतर रोजगार म्हणून दुकानदार सब्जी मंडीतून भाजीपाला खरेदी करून विकत असतात. त्यामुळे फायद्याच्यादृष्टीने दरवाढ होत असते.

- बंडू बारापात्रे.

कोट

होलसेल बाजारातून भाजीपाला स्वस्त असला तरी वाहतूक खर्च पाहता होलसेल बाजारात जाणे परवडत नाही. त्यामुळे घराजवळच्या दुकानातून भाजीपाला खरेदी करतो.

- नंदा सार्वे.

कोट

समारंभांमध्ये नातेवाईक अधिक असतात. त्यामुळे होलसेल बाजारातून खरेदी परवडते. मात्र घरातील दोन कुटुंबासाठी होलसेल बाजारात जावून नाहक खर्च करणे बरे नव्हे.

- शिला साखरे