शहरं
Join us  
Trending Stories
1
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
2
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
3
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ११५ जण होरपळले, बचाव कार्य सुरू
4
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
5
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
6
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
7
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
9
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
10
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
11
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
12
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
13
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!
14
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
15
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
16
पाकिस्तानसाठी हेरगिरी, पुरवली गोपनीय माहिती; निशांत अगरवालच्या शिक्षेवरील निर्णय न्यायालयाने ठेवला राखून
17
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
18
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
19
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
20
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  

किती ही लूट? बीटीबीमंडीत कांदा २० रुपये, तर घराजवळ ३५रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री ...

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री करीत आहेत. मात्र शहरात होलसेल दरात मिळणारे दर व बाहेर रिटेलमध्ये असलेल्या दराची तुलना केली तर भाजीपाल्याचे दर हे दुप्पट दराने विक्री केली जात आहे. भंडारा शहरातील बीटीबी सब्जीमंडीत कांदा २० रुपये किलो असला तरी घराजवळ मात्र तो ३० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे.

भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी आधुनिक युगात हायटेक होत आहे. तंतोतंत शेती करीत उत्पन्न वाढवित आहे. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटली आहे. परिणामी व्यापारी स्वस्त दरात भाजीपाल्याची खरेदी करीत असला तरी ग्राहकांना तो महाग घ्यावा लागतो.

बॉक्स

गांधी चौकात भेंडी, १० रुपये, त्रिमुर्ती चौकात, १५ रुपये किलो

शहरात होलसेल भाजीपाला विक्रीचे ठिकाण बीटीबी सब्जीमंडी आहे. याठिकाणी भेंडीचे दर पाच ते सात रुपये किलो होते. मात्र याच भेंडीची शहरातील गांधी चौकात खरेदी केली असता ते दहा रुपये तर त्रिमुर्ती चौकात १५ रुपये किलो होती.

बॉक्स

पिकवितात शेतकरी जास्तीचा पैसा तिसऱ्यांच्याच हातात !

जिल्ह्यात भाजीपाल्याची आधुनिक शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. मात्र भाजीपाल्याला अत्यल्प दर मिळत असल्याने संकट उभे ठाकले आहे. मजुरीचे दर, कीटकनाशक, खत यांचे नियोजन आवाक्याबाहेर आहेत. अशा स्थितीत शेतकरी आपला माल सब्जीमंडीत विकूण आपली उपजिवीका भागवित आहे. खर्च झालेला उत्पन्न भाजीपाला विक्रीनंतर मिळत नाही. व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदीनंतर तोच माल दुकानदारांना विकला जातो. दुकानदार रोजगारासाठी पाच ते दहा रुपये अधिकची रक्कम ठेवून विक्री करतात.

कोट

वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अधिक वाढले आहे. जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने दर अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला दर बरे आहेत. ऑगस्ट महिन्यात दर वाढण्याची शक्यता अधिक आहे. शेतकरी भाजीपाला थेट बीटीबी सब्जीमंडीत आणतात. वाहतुकीवर खर्च, भाजीपाला पिकविताना मजुरीचे दर, कीटकनाशक, रासायनिक खत यासह पिकांची देखभाल शेतकरी करीत असतो. त्यानंतर रोजगार म्हणून दुकानदार सब्जी मंडीतून भाजीपाला खरेदी करून विकत असतात. त्यामुळे फायद्याच्यादृष्टीने दरवाढ होत असते.

- बंडू बारापात्रे.

कोट

होलसेल बाजारातून भाजीपाला स्वस्त असला तरी वाहतूक खर्च पाहता होलसेल बाजारात जाणे परवडत नाही. त्यामुळे घराजवळच्या दुकानातून भाजीपाला खरेदी करतो.

- नंदा सार्वे.

कोट

समारंभांमध्ये नातेवाईक अधिक असतात. त्यामुळे होलसेल बाजारातून खरेदी परवडते. मात्र घरातील दोन कुटुंबासाठी होलसेल बाजारात जावून नाहक खर्च करणे बरे नव्हे.

- शिला साखरे