शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
2
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
3
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
4
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
6
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
7
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
8
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
9
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
10
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
11
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
12
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
13
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
14
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
15
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
16
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
17
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
18
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
19
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
20
आईचे दागिने विकून पत्नीला शिकवलं, सरकारी नोकरी मिळताच तिनं कांड केलं! पतीची पोलिसांत धाव

किती ही लूट? बीटीबीमंडीत कांदा २० रुपये, तर घराजवळ ३५रुपये किलो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:37 IST

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री ...

भंडारा : शेतकऱ्यांनी पिकविलेला भाजीपाला पीक थेट सब्जीमंडीत जात आहे. या सब्जीमंडीतून विक्रेते भाजीपाला खरेदी करून घरोघरी विक्री करीत आहेत. मात्र शहरात होलसेल दरात मिळणारे दर व बाहेर रिटेलमध्ये असलेल्या दराची तुलना केली तर भाजीपाल्याचे दर हे दुप्पट दराने विक्री केली जात आहे. भंडारा शहरातील बीटीबी सब्जीमंडीत कांदा २० रुपये किलो असला तरी घराजवळ मात्र तो ३० रुपये किलो दराने विक्री केला जात आहे.

भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी भाज्यांचे मळे आहेत. शेतकरी आधुनिक युगात हायटेक होत आहे. तंतोतंत शेती करीत उत्पन्न वाढवित आहे. उत्पन्नाबरोबर खर्चसुद्धा वाढलेला आहे. परंतु कोरोनाच्या संकटाने बाजारपेठा बंद असल्याने भाजीपाल्याला मागणी घटली आहे. परिणामी व्यापारी स्वस्त दरात भाजीपाल्याची खरेदी करीत असला तरी ग्राहकांना तो महाग घ्यावा लागतो.

बॉक्स

गांधी चौकात भेंडी, १० रुपये, त्रिमुर्ती चौकात, १५ रुपये किलो

शहरात होलसेल भाजीपाला विक्रीचे ठिकाण बीटीबी सब्जीमंडी आहे. याठिकाणी भेंडीचे दर पाच ते सात रुपये किलो होते. मात्र याच भेंडीची शहरातील गांधी चौकात खरेदी केली असता ते दहा रुपये तर त्रिमुर्ती चौकात १५ रुपये किलो होती.

बॉक्स

पिकवितात शेतकरी जास्तीचा पैसा तिसऱ्यांच्याच हातात !

जिल्ह्यात भाजीपाल्याची आधुनिक शेतीकडे अनेक शेतकरी वळले आहेत. मात्र भाजीपाल्याला अत्यल्प दर मिळत असल्याने संकट उभे ठाकले आहे. मजुरीचे दर, कीटकनाशक, खत यांचे नियोजन आवाक्याबाहेर आहेत. अशा स्थितीत शेतकरी आपला माल सब्जीमंडीत विकूण आपली उपजिवीका भागवित आहे. खर्च झालेला उत्पन्न भाजीपाला विक्रीनंतर मिळत नाही. व्यापाऱ्यांनी भाजीपाला खरेदीनंतर तोच माल दुकानदारांना विकला जातो. दुकानदार रोजगारासाठी पाच ते दहा रुपये अधिकची रक्कम ठेवून विक्री करतात.

कोट

वातावरणातील बदलामुळे भाजीपाल्याचे उत्पन्न अधिक वाढले आहे. जिल्ह्यात शेतकरी भाजीपाला पिकाकडे मोठ्या प्रमाणात वळलेला आहे. बाहेर जिल्ह्यात निर्यात कमी झाल्याने दर अत्यल्प आहेत. दर्जेदार मालाला दर बरे आहेत. ऑगस्ट महिन्यात दर वाढण्याची शक्यता अधिक आहे. शेतकरी भाजीपाला थेट बीटीबी सब्जीमंडीत आणतात. वाहतुकीवर खर्च, भाजीपाला पिकविताना मजुरीचे दर, कीटकनाशक, रासायनिक खत यासह पिकांची देखभाल शेतकरी करीत असतो. त्यानंतर रोजगार म्हणून दुकानदार सब्जी मंडीतून भाजीपाला खरेदी करून विकत असतात. त्यामुळे फायद्याच्यादृष्टीने दरवाढ होत असते.

- बंडू बारापात्रे.

कोट

होलसेल बाजारातून भाजीपाला स्वस्त असला तरी वाहतूक खर्च पाहता होलसेल बाजारात जाणे परवडत नाही. त्यामुळे घराजवळच्या दुकानातून भाजीपाला खरेदी करतो.

- नंदा सार्वे.

कोट

समारंभांमध्ये नातेवाईक अधिक असतात. त्यामुळे होलसेल बाजारातून खरेदी परवडते. मात्र घरातील दोन कुटुंबासाठी होलसेल बाजारात जावून नाहक खर्च करणे बरे नव्हे.

- शिला साखरे