शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
3
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
4
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
5
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
6
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
7
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
8
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
9
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
10
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
11
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
12
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
13
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
14
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
15
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
16
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
17
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
18
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
19
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

रेतीच्या राजरोस वाहतुकीचे आणखी किती बळी?

By admin | Updated: May 9, 2017 00:19 IST

जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून....

प्रशासन केव्हा जागे होणार : दोन दिवसांत दोघांचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरच्या धडकेत दररोज लहानमोठे अपघात होत आहेत. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवशी रेती वाहतुकीच्या टिप्परने दोन जणांना बळी घेतला आहे. दररोज जीव जात असताना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाचे या अवैध रेती वाहतुकीकडे लक्ष जाणार की नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.भंडारा जिल्ह्यात ५३ रेती घाटांपैकी २७ रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. तांत्रिक कारणांमुळे काही रेतीघाटांचे लिलाव झालेले नाहीत. लिलाव न झालेल्या काही घाटांतून रेतीची तस्करी सुरू आहे. ज्या घाटांचे लिलाव झाले आहेत, तिथून रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरू आहे. परंतु या रेती घाटांच्या अवैध वाहतुकीला लगाम लावण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याने याचा फटका सामान्य जीवाला बसत आहे. मागील दोन दिवसात रेती वाहतुकीमुळे निष्पाप दोन जीवांचा बळी गेला. अवैध वाहतुकीमुळे आणखी किती जणांचा बळी जाईल? प्रशासनाला केव्हा जाग येईल? हा प्रश्न सामान्यजणांना पडला आहे. शनिवारला दुपारी पवनी-लाखांदूर मार्गावरील विरली येथे भरधाव टिप्परच्या धडकेत सुनिता रमेश महावाडे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चार वर्षापुर्वी तिच्या पतीचे निधन झाले आता तिची मुले पोरकी झाली आहेत. घटनेच्या दिवशी ती शेतातून गवताचा भारा आणत असताना काळाने तिच्यावर झडप घातली. त्यानंतर रविवारला दुपारी एका लग्न समारंभातून गावाकडे परतत असताना रेती वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने लाखांदूर पंचायत समितीचे माजी सदस्य देवीदास भोयर यांना धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जीवघेणी वाहतूकरेतीची वाहतूक करणारी वाहने बेधडकपणे रस्त्यावरून धावत आहेत. परिणामी अपघाताची संख्या बळावली आहे. विरली व अड्याळ मार्गावर घडलेल्या या दोन्ही घटनेतील वाहने ही रेतीची वाहतूक करणारी होती. देवीदास भोयर यांच्या अपघाताचे दृश्य मन हेलावणारे होते. संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. वाहनचालक सापडला असता तर अनर्थ घडला असता. ज्या गावाच्या हद्दीतून रेतीची वाहतूक होत आहे. त्या गावातील नागरिकांची समिती गठीत त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्याची गरज आहे. जिल्हा खनीकर्म विभागाला यावर्षी गौण खनिजांच्या माध्यमातून ५४ कोटी ११ लाखांचा महसूल मिळत असला तरी अवैध खनिजांच्या वाहतुकीमुळे बळी गेलेल्यांचा जीव अमूल्य आहे, हे प्रशासनाला सांगणार तरी कोण?