शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
3
सोशल मीडियावर मैत्री केली; चार तरुणींच्या जाळ्यात अडकलेल्या आजोबांनी आयुष्यभराची कमाई गमावली!
4
RCBच्या यश दयालवर बंदीची कारवाई; अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी 'या' स्पर्धेतून बाद
5
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
6
५ लाख देण्याचे आश्वासन अन् हातात पडले अवघ्या ५ हजाराचे धनादेश; उत्तरकाशीतील नागरिकांचा संताप
7
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
8
जिला गर्लफ्रेंड म्हटलं तिनेच राखी बांधली! मोहम्मद सिराज आणि आशा भोसलेंच्या नातीचं रक्षाबंधन, फोटो समोर
9
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
10
'धकधक गर्ल' माधुरीचं सौंदर्य पाहून घायाळ झालेला अभिनेता, एकही रुपया मानधन न घेता केला सिनेमा
11
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
12
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
13
Bigg Boss 19: पहलगाम हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीला 'बिग बॉस'ची ऑफर! शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा
14
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
15
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
16
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
17
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
18
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
19
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
20
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?

रेतीच्या राजरोस वाहतुकीचे आणखी किती बळी?

By admin | Updated: May 9, 2017 00:19 IST

जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून....

प्रशासन केव्हा जागे होणार : दोन दिवसांत दोघांचा मृत्यूलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यात रेतीची अवैध वाहतूक थांबता थांबत नसल्याचे चित्र दररोज दिसत असून रेती वाहतूक करणाऱ्या भरधाव ट्रक, टिप्पर, ट्रॅक्टरच्या धडकेत दररोज लहानमोठे अपघात होत आहेत. शनिवार व रविवार असे सलग दोन दिवशी रेती वाहतुकीच्या टिप्परने दोन जणांना बळी घेतला आहे. दररोज जीव जात असताना जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासनाचे या अवैध रेती वाहतुकीकडे लक्ष जाणार की नाही? हा प्रश्न अनुत्तरीत आहे.भंडारा जिल्ह्यात ५३ रेती घाटांपैकी २७ रेतीघाटांचे लिलाव झाले आहेत. तांत्रिक कारणांमुळे काही रेतीघाटांचे लिलाव झालेले नाहीत. लिलाव न झालेल्या काही घाटांतून रेतीची तस्करी सुरू आहे. ज्या घाटांचे लिलाव झाले आहेत, तिथून रेतीचा रात्रंदिवस उपसा सुरू आहे. परंतु या रेती घाटांच्या अवैध वाहतुकीला लगाम लावण्यात पोलीस प्रशासनाला अपयश येत असल्याने याचा फटका सामान्य जीवाला बसत आहे. मागील दोन दिवसात रेती वाहतुकीमुळे निष्पाप दोन जीवांचा बळी गेला. अवैध वाहतुकीमुळे आणखी किती जणांचा बळी जाईल? प्रशासनाला केव्हा जाग येईल? हा प्रश्न सामान्यजणांना पडला आहे. शनिवारला दुपारी पवनी-लाखांदूर मार्गावरील विरली येथे भरधाव टिप्परच्या धडकेत सुनिता रमेश महावाडे या ४० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. चार वर्षापुर्वी तिच्या पतीचे निधन झाले आता तिची मुले पोरकी झाली आहेत. घटनेच्या दिवशी ती शेतातून गवताचा भारा आणत असताना काळाने तिच्यावर झडप घातली. त्यानंतर रविवारला दुपारी एका लग्न समारंभातून गावाकडे परतत असताना रेती वाहून नेणाऱ्या भरधाव वाहनाने लाखांदूर पंचायत समितीचे माजी सदस्य देवीदास भोयर यांना धडक दिली. यात त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जीवघेणी वाहतूकरेतीची वाहतूक करणारी वाहने बेधडकपणे रस्त्यावरून धावत आहेत. परिणामी अपघाताची संख्या बळावली आहे. विरली व अड्याळ मार्गावर घडलेल्या या दोन्ही घटनेतील वाहने ही रेतीची वाहतूक करणारी होती. देवीदास भोयर यांच्या अपघाताचे दृश्य मन हेलावणारे होते. संतप्त नागरिकांनी पोलीस प्रशासनाविरूद्ध रोष व्यक्त केला. वाहनचालक सापडला असता तर अनर्थ घडला असता. ज्या गावाच्या हद्दीतून रेतीची वाहतूक होत आहे. त्या गावातील नागरिकांची समिती गठीत त्यांच्यावर जबाबदारी सोपविण्याची गरज आहे. जिल्हा खनीकर्म विभागाला यावर्षी गौण खनिजांच्या माध्यमातून ५४ कोटी ११ लाखांचा महसूल मिळत असला तरी अवैध खनिजांच्या वाहतुकीमुळे बळी गेलेल्यांचा जीव अमूल्य आहे, हे प्रशासनाला सांगणार तरी कोण?