शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
4
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
5
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
6
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
7
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
8
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
9
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
10
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
11
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
12
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
13
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
14
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
15
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
16
अभिमानास्पद! मित्रांनी वडिलांची उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवतेय फुटबॉलचं मैदान
17
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
18
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
19
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
20
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...

५० हजारात शेततळी कशी होणार?

By admin | Updated: February 23, 2016 00:18 IST

राष्ट्रीय कृषी विकास योजना, गतिमान पाणलोट योजना, आरएजीपी (अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी), आयडब्ल्युएमपी एकात्मिक पाणलोट विकास योजना ...

शेतकऱ्यांमध्ये संताप : अनुदान वाढवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराची गरजयुवराज गोमासे भंडाराराष्ट्रीय कृषी विकास योजना, गतिमान पाणलोट योजना, आरएजीपी (अवर्षण प्रवण क्षेत्रासाठी), आयडब्ल्युएमपी एकात्मिक पाणलोट विकास योजना १०० टक्के अनुदान योजनेत मशीनचा वापर करून शेततळे खोदण्यासाठी ८२ हजार व १.११ लाख रूपयांचे अनुदान दिले जायचे. आता मंत्रिमंडळाने ‘मागे त्याला शेततळे’ या योजनेत ५० हजाराचे अनुदान जाहीर केल्यामुळे हे अनुदान अत्यल्प असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटू लागली आहे. राज्य शासनाच्या कृषी विभागामार्फत १०० टक्के अनुदानावर यांत्रिकी पद्धतीने दुष्काळावर मात करण्यासाठी व शाश्वत उत्पन्नासाठी अनेक योजना राबविल्या जात आहेत. भाजीपाला, बागायती पिके व अन्न धान्याची पिके यातून घेतली जात आहे. परंतु अजुनही अनेक शेतकऱ्यांकडे शेततळी नाहीत. सिंचनाच्या शाश्वत सुविधा नाहीत. त्यामुळे दुष्काळाचा सामना करावा लागतो. गतिमान पाणलोट योजना, आरएडीपी अवर्षणप्रवण क्षेत्रासाठी, आयडब्ल्यूएमी एकात्मिक पाणलोट विकास योजना शासनाच्यावतीने पूर्वीपासून राबविल्या जात आहेत. या योजना १०० टक्के अनुदानाच्या असून सर्व खोदकाम मशीनने करावयाची आहेत. या योजनांतर्गत ३० बाय ३० बाय ३ मीटर आकारमानाच्या शेततळ्यांसाठी १ लाख ११ हजाराचे अनुदान शेतकऱ्यांना शासनाच्या वतीने कृषी विभागामार्फत दिले जाते. योजनांना प्रतिसादही समाधानकारक आहे. रोजगार हमी योजने मार्फतही १०० टक्के अनुदानावर ३० बाय ३० बाय ३ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी सुमारे १.५० लाखाचे अनुदान दिले जाते. यात १ मीटरपर्यंतचे काम मजुरांच्या सहायाने तर उर्वरित काम मशीनच्या मदतीने करावयाचे असून हे या योजनेचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे. मात्र अनुदानाची रक्कम मोठी असल्याने या योजनेचा लाभ शेतकरी घेत आहेत.शेततळ्यांसाठी ऐवढ्या योजना असताना शासन मागेल त्याला शेततळे नावाची नवीन योजना कार्यान्वित केली आहे. ९ फेब्रुवारी रोजी राज्य मंत्रीमंडळाने मान्यता देऊन आॅनलाईन घोषित केली आहे. १९ फेब्रुवारीपासून आॅनलाईन पद्धतीने शेतकऱ्यांना अर्ज मागविले जात आहे. मात्र ही योजना शेतकऱ्यांसाठी फसवी असल्याची प्रतिक्रिया उमटू लागली आहे. ‘आवळा देऊन कोहळा घेणे’ यासारखी ही योजना असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. अज्ञानी शेतकरी आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी कुठे भटकणार? जुन्या योजना बंद होणार तर नाही, अशी शंका घेतली जात आहे. ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेत शेततळ्याची कामे मशीनने करावयाची असली तरी ३० बाय ३० बाय ३ मीटर आकारमानाच्या शेततळ्यासाठी कमाल ५० पेक्षा कमी पैसेवारी असलेल्या गावात योजना राबविणारी जाणार असताना मिळणारा निधी तुटपूंजा असल्याने दुष्काळात तोंडाला पाने पुसण्यासारखी योजना असल्याचा आरोप होत आहे. ५० हजारापेक्षा जास्त खर्च आल्यास लाभार्थ्याला द्यावा लागणार असून बीपीएल व आत्महत्याग्रस्त कुटूंबीयांनी पैसा आणायचा कुठून, असा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.