शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

पूरग्रस्त बपेरा पुनर्वसन स्थळातील घरकुल दहा वर्षात झाले जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

२६ लोक मोहन भोयर तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे ...

२६ लोक

मोहन भोयर

तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे पुनर्वसन २०१०- २०११ मध्ये करण्यात आले. परंतु अवघ्या दहा वर्षात सदर घरकुल जीर्ण झाले असून घरकुलाची गच्चीला गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅब कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे जीव मुठीत घेऊन १२५ कुटुंबीय वास्तव्य करीत आहे. मूलभूत सोयीसुविधांचा येथे अभाव आहे. कोट्यवधी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. परंतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत पूरग्रस्त कुटुंबांवर पुन्हा बेघर होण्याची वेळ आली आहे.

बपेरा गावातील १२५ पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडून सन २००७-२००८ मध्ये मान्यता मिळाली. सन २०१०-२०११ पर्यंत घरे बांधून पूर्ण झाली व पूरग्रस्तांना घरांचा ताबा देण्यात आला.परंतु अवघ्या दहा वर्षातच घरे जीर्ण झाली. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक घरकुलात वास्तव्य करावे लागत आहे. तुमसर वाराशिवनी राष्ट्रीय महामार्गावर बापेरा हे गाव असून दरवर्षी वैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी गावात शिरते. त्यामुळे येथील सुमारे दीडशे घरांना त्याचा फटका बसतो. सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी नदीचे पाणी गावात शिरले होते व अनेक घरांची पडझड झाली होती. बेघर झालेल्यांना राज्यशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून घरकुल बांधून दिली. परंतु घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता निकृष्ट असल्यामुळे सदर घरकुलांना अवघ्या दहा वर्षातच गळती लागली आहे. शौचालय निरुपयोगी ठरले आहेत. गडर नाल्या यांचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले नाहीत. त्यांच्या घरांचे पट्टी अजून पर्यंत विद्यार्थी होणार नाही येथे योग्य रस्त्याचे बांध काम करण्यात आले नाही. अनेकांच्या घरी अजूनही वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच वास्तव्य करावे लागते.

बाधितांनी या संबंधीची तक्रार लोकप्रतिनिधी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु पावसाळा संपत आला तरी अजूनपर्यंत कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इथे मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी खा.शिशुपाल पटले यांनी केली पाहणी: बपेरा येथील पुनर्वसन स्थळाला माजी खासदार पटले यांनी भेट दिली व पुनर्वसन स्थळी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून अत्यंत विदारक परिस्थितीत येथील नागरिक वास्तव्य करीत असल्याचे त्यांना आढळले.

यावेळी देवानंद लांजे, बपेरा च्य सरपंच ममता राऊत,डॉ. मुरलीधर बानेवार, सचिन खंगार, अरविंद पटले, शोभाराम राऊत, संदीप जटाळे, दिलीप मुळे, पुरुषोत्तम उपरिकार, हिरा उपरिकार, परवेश भूते, सुरेंद्र उपरिकार, चेतन रहांगडाले, गुरुदेव पारधी, उपसरपंच सोहन पारधी, नीलेश गोंडाने, सुनील शिवणे, झनक पटले, रवींद्र रहांगडाले,उमेश गजभिये, हिरालाल सहारे, लोकेश बम्हणोटे, सचिन रहांगडाले, सुनील पटले, संतोष गौतम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.