शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारची शेतकऱ्यांना भेट; 'पंतप्रधान धन-धान्य कृषी योजने'साठी २४ हजार कोटींची तरतूद
2
मोठी बातमी! आनंदराज आंबेडकरांची एकनाथ शिंदेंना साथ; शिंदेसेना-रिपब्लिकन सेनेच्या युतीची घोषणा
3
MTNL Defaults: कर्जात बुडालीये 'ही' सरकारी कंपनी; बँकांना परत करू शकत नाहीये ८५८५ कोटींचं लोन, जाणून घ्या
4
बाबर क्रूर, अकबर सहिष्णू तर औरंगजेब मंदिर पाडणारा', NCERT ने पुस्तकात केले मोठे बदल
5
१६०० कोटी पगार! मेटा 'या' व्यक्तींसाठी उधळतोय पाण्यासारखा पैसा, कारण ऐकून धक्का बसेल!
6
तिकीट काढले विमानाचे, प्रवास घडला कारचा; Air India च्या प्रवाशांसोबत नेमके काय घडले?
7
भारताकडून ब्राह्मोस, जपानकडून युद्धनौका, आता तैवानसोबत मिळून चीनला आव्हान देणार हा देश
8
लँडिंगसाठी जागाच मिळेना, एकाच वेळी १७३ प्रवाशांचा जीव होता धोक्यात; इंडिगोच्या पायलटने 'अशी' दाखवली हुशारी!
9
गुहेत राहणाऱ्या रशियन महिलेने कसे कमावले पैसे, भारतात स्थायिक होण्याचे कारणही सांगितले
10
मुलाच्या हव्यासापोटी जन्मदाता बापच झाला हैवान; ७ वर्षांच्या लेकीला कालव्यात फेकून मारलं
11
श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती दररोज करता का? शुभ-लाभ होतात, स्वामी कायम सोबत राहतात!
12
Chaturmas 2025: चातुर्मासात गुरुवारपासून सुरू करा दत्तबावनी, फक्त पाळा 'हे' नियम!
13
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!
14
एकटे PM मोदीच आठवड्याला १०० तास काम करतात; '७० तास'वरून ट्रोल झालेल्या नारायण मूर्तींचं प्रशस्तीपत्रक
15
गुवाहाटीची रहीमा सोनमपेक्षाही भयंकर! पतीला संपवलं अन् बेडरूमध्येच गाडलं, शांततेत झोपली; कशी पकडली गेली?
16
सूर्य गोचराने शुभ राजयोग: ७ राशींचे कल्याण, भाग्याची साथ; महिनाभर ‘हे’ करा, लाभच लाभ मिळवा!
17
चला हवा येऊ द्या! CHYD चं नवं शीर्षक गीत रिलीज; कॉमेडीच्या गँगवॉरची झलक बघा
18
मस्क अजूनही नंबर १, पण झुकरबर्गला बसला मोठा धक्का! AI च्या कामगिरीने 'हा' उद्योगपती झाला जगात दुसरा श्रीमंत!
19
IND vs ENG: शुभमन गिलने कोहलीसारखा ब्रँड बनण्याचा प्रयत्न करू नये, माजी क्रिकेटपटूचा महत्त्वाचा सल्ला!

पूरग्रस्त बपेरा पुनर्वसन स्थळातील घरकुल दहा वर्षात झाले जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

२६ लोक मोहन भोयर तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे ...

२६ लोक

मोहन भोयर

तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे पुनर्वसन २०१०- २०११ मध्ये करण्यात आले. परंतु अवघ्या दहा वर्षात सदर घरकुल जीर्ण झाले असून घरकुलाची गच्चीला गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅब कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे जीव मुठीत घेऊन १२५ कुटुंबीय वास्तव्य करीत आहे. मूलभूत सोयीसुविधांचा येथे अभाव आहे. कोट्यवधी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. परंतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत पूरग्रस्त कुटुंबांवर पुन्हा बेघर होण्याची वेळ आली आहे.

बपेरा गावातील १२५ पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडून सन २००७-२००८ मध्ये मान्यता मिळाली. सन २०१०-२०११ पर्यंत घरे बांधून पूर्ण झाली व पूरग्रस्तांना घरांचा ताबा देण्यात आला.परंतु अवघ्या दहा वर्षातच घरे जीर्ण झाली. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक घरकुलात वास्तव्य करावे लागत आहे. तुमसर वाराशिवनी राष्ट्रीय महामार्गावर बापेरा हे गाव असून दरवर्षी वैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी गावात शिरते. त्यामुळे येथील सुमारे दीडशे घरांना त्याचा फटका बसतो. सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी नदीचे पाणी गावात शिरले होते व अनेक घरांची पडझड झाली होती. बेघर झालेल्यांना राज्यशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून घरकुल बांधून दिली. परंतु घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता निकृष्ट असल्यामुळे सदर घरकुलांना अवघ्या दहा वर्षातच गळती लागली आहे. शौचालय निरुपयोगी ठरले आहेत. गडर नाल्या यांचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले नाहीत. त्यांच्या घरांचे पट्टी अजून पर्यंत विद्यार्थी होणार नाही येथे योग्य रस्त्याचे बांध काम करण्यात आले नाही. अनेकांच्या घरी अजूनही वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच वास्तव्य करावे लागते.

बाधितांनी या संबंधीची तक्रार लोकप्रतिनिधी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु पावसाळा संपत आला तरी अजूनपर्यंत कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इथे मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी खा.शिशुपाल पटले यांनी केली पाहणी: बपेरा येथील पुनर्वसन स्थळाला माजी खासदार पटले यांनी भेट दिली व पुनर्वसन स्थळी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून अत्यंत विदारक परिस्थितीत येथील नागरिक वास्तव्य करीत असल्याचे त्यांना आढळले.

यावेळी देवानंद लांजे, बपेरा च्य सरपंच ममता राऊत,डॉ. मुरलीधर बानेवार, सचिन खंगार, अरविंद पटले, शोभाराम राऊत, संदीप जटाळे, दिलीप मुळे, पुरुषोत्तम उपरिकार, हिरा उपरिकार, परवेश भूते, सुरेंद्र उपरिकार, चेतन रहांगडाले, गुरुदेव पारधी, उपसरपंच सोहन पारधी, नीलेश गोंडाने, सुनील शिवणे, झनक पटले, रवींद्र रहांगडाले,उमेश गजभिये, हिरालाल सहारे, लोकेश बम्हणोटे, सचिन रहांगडाले, सुनील पटले, संतोष गौतम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.