शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

पूरग्रस्त बपेरा पुनर्वसन स्थळातील घरकुल दहा वर्षात झाले जीर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:38 IST

२६ लोक मोहन भोयर तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे ...

२६ लोक

मोहन भोयर

तुमसर: वैनगंगा नदी काठावरील राज्याच्या शेवटच्या टोकावर बपेरा हे गाव असून येथे पूरग्रस्त १२५ कुटुंबांचे पुनर्वसन २०१०- २०११ मध्ये करण्यात आले. परंतु अवघ्या दहा वर्षात सदर घरकुल जीर्ण झाले असून घरकुलाची गच्चीला गळती लागली आहे. त्यामुळे स्लॅब कोणत्याही वेळी कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे जीव मुठीत घेऊन १२५ कुटुंबीय वास्तव्य करीत आहे. मूलभूत सोयीसुविधांचा येथे अभाव आहे. कोट्यवधी रुपये त्यावर खर्च करण्यात आले. परंतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत पूरग्रस्त कुटुंबांवर पुन्हा बेघर होण्याची वेळ आली आहे.

बपेरा गावातील १२५ पूरग्रस्त कुटुंबांचे पुनर्वसन करण्यासाठी राज्य शासनाकडून सन २००७-२००८ मध्ये मान्यता मिळाली. सन २०१०-२०११ पर्यंत घरे बांधून पूर्ण झाली व पूरग्रस्तांना घरांचा ताबा देण्यात आला.परंतु अवघ्या दहा वर्षातच घरे जीर्ण झाली. त्यामुळे त्यांना जीव मुठीत घेऊन धोकादायक घरकुलात वास्तव्य करावे लागत आहे. तुमसर वाराशिवनी राष्ट्रीय महामार्गावर बापेरा हे गाव असून दरवर्षी वैनगंगा नदीला पूर आल्यानंतर पुराचे पाणी गावात शिरते. त्यामुळे येथील सुमारे दीडशे घरांना त्याचा फटका बसतो. सुमारे दहा ते बारा वर्षापूर्वी नदीचे पाणी गावात शिरले होते व अनेक घरांची पडझड झाली होती. बेघर झालेल्यांना राज्यशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून घरकुल बांधून दिली. परंतु घरकुलांच्या बांधकामाचा दर्जा व गुणवत्ता निकृष्ट असल्यामुळे सदर घरकुलांना अवघ्या दहा वर्षातच गळती लागली आहे. शौचालय निरुपयोगी ठरले आहेत. गडर नाल्या यांचे बांधकाम तांत्रिकदृष्ट्या करण्यात आले नाहीत. त्यांच्या घरांचे पट्टी अजून पर्यंत विद्यार्थी होणार नाही येथे योग्य रस्त्याचे बांध काम करण्यात आले नाही. अनेकांच्या घरी अजूनही वीज जोडणी करण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना अंधारातच वास्तव्य करावे लागते.

बाधितांनी या संबंधीची तक्रार लोकप्रतिनिधी, तहसीलदार व जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदनाद्वारे केली आहे. परंतु पावसाळा संपत आला तरी अजूनपर्यंत कोणीच दखल घेतली नाही. त्यामुळे शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. इथे मोठ्या दुर्घटनेची प्रतीक्षा प्रशासन करीत आहे काय असा प्रश्न उपस्थित होत आहे.

माजी खा.शिशुपाल पटले यांनी केली पाहणी: बपेरा येथील पुनर्वसन स्थळाला माजी खासदार पटले यांनी भेट दिली व पुनर्वसन स्थळी वास्तव्य करणाऱ्या नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. येथे मूलभूत सोयीसुविधांचा अभाव असून अत्यंत विदारक परिस्थितीत येथील नागरिक वास्तव्य करीत असल्याचे त्यांना आढळले.

यावेळी देवानंद लांजे, बपेरा च्य सरपंच ममता राऊत,डॉ. मुरलीधर बानेवार, सचिन खंगार, अरविंद पटले, शोभाराम राऊत, संदीप जटाळे, दिलीप मुळे, पुरुषोत्तम उपरिकार, हिरा उपरिकार, परवेश भूते, सुरेंद्र उपरिकार, चेतन रहांगडाले, गुरुदेव पारधी, उपसरपंच सोहन पारधी, नीलेश गोंडाने, सुनील शिवणे, झनक पटले, रवींद्र रहांगडाले,उमेश गजभिये, हिरालाल सहारे, लोकेश बम्हणोटे, सचिन रहांगडाले, सुनील पटले, संतोष गौतम तथा ग्रामस्थ उपस्थित होते.