शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

रुग्णालयात रुग्णांचे हाल

By admin | Updated: October 14, 2015 00:44 IST

पवनी तालुक्यातील अड्याळ हे २० हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर सन २००५ मध्ये ग्रामीण रुग्णालयात झाले.

रिक्त पदांचा घोळ कायम : स्कॅन मशीन धूळ खात, अड्याळ येथील प्रकारविशाल रणदिवे अड्याळपवनी तालुक्यातील अड्याळ हे २० हजार लोकसंख्येचे सर्वात मोठे गाव. येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे रुपांतर सन २००५ मध्ये ग्रामीण रुग्णालयात झाले. यासाठी एक कोटी रुपये खर्च करुन सुसज्ज व देखणी ईमारत बांधण्यात आली. परंतु सद्यस्थितीला रिक्त पदांचा घोळ व सुविधांच्या अभावामुळे या रूग्णालयात रूग्णांचे हाल होत आहेत.रूग्णालयाची इमारतीचे बांधकाम झाल्यानंतर रुग्णालय सुरु नाही होत म्हणून येथील शिवसेना पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनही दिले होते. एकंदरीत उद्घाटनापासून ते आजपावेतो या रुग्णालयात एक ना अनेक समस्या कायम आहेत. या रुग्णालयाकडे लोकप्रतिनिधींचेही तेवढेच दुर्लक्ष होत गेले. ज्या आनंदी वातावरणात ज्या हेतूने मोठ्या वास्तुचे उद्घाटन झाले तो हेतू पूर्ण झालेला दिसून येत नाही. शासनाच्या दृष्टीकोनानुसार या ग्रामीण रुगणालयाची स्थापना झाली खरी परंतु याचा लाभ रूग्णांना कमीच मिळत आहे. काही कर्मचारी रुग्णावर तर काही रुग्ण येथील कर्मचाऱ्यांवर चिडताना दिसतात. कारण एकमेव असते येथील असुविधा. भर उन्हाळ्यात एका रुग्णाचे स्वत:घरचा कुलर लावला होता. रुग्णाना यात कधी पाणी नाही तर कधी घाणीच्या समस्येचा सामना करावा लागत आहे.अडयाळ व परिसरातून रोज शेकडो रुग्ण या ग्रामीण रुग्णालयाची पायरी चढतात. मात्र रुग्णालयच आजारी असेल तर रुग्णांना काय लाभ होणार? शवविच्छेदन वेळेवर होत नाही. त्यासाठी बाहेरुन स्विपरला पाचारण करावे लागते. यापेक्षा मोठी शोकांतिका काय असणार. सोनोग्राफीची नवीन मशीन २०१२ पासुन धूळ खात पडली आहे. आॅपरेटर नसल्याने त्याचा उद्घाटनाचा मुहूर्त अद्यापही गवसलेला नाही. या ग्रामीण रूग्णालयात एनसीडी योजनेअंतर्गत असंसर्गजन्य रोग उपचारार्थ ६ पदे मंजुर असून एकाच्या भरवश्यावर काम केल्या जात आहे. भंडारा येथील सामान्य रुग्णालयात अड्याळ ग्रामीण रुग्णालयातील २ कर्मचारी काम करताना आढळतात. पोष्टींग अड्याळला आणि वर्कींग भंडारा असे चित्र सध्या पाहावयास मिळते. लोकप्रतिनिधी येतात समस्या लवकर सुटतील, एवढे दोन शब्द बोलून निघून जातात. परंतु समस्या ‘जैसे थे’ असे चित्र आहे.अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आणि वाढत्या रुग्णांमुळे येथे कार्यरत कर्मचाऱ्यांना तर त्रास होतोच पंरतु त्यापेक्षा सर्वात जास्त त्रास इथे येणाऱ्या रुगणांना होताना दिसतो. याची गंभीर दखल घेणे गरजेचे आहे.