शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

फाटक्या घरात बेघरांचे वास्तव्य

By admin | Updated: August 13, 2015 01:28 IST

राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सिंदपुरी येथील आपातग्रस्तांच्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लागला नाही.

रंजित चिंचखेडे  चुल्हाडराज्याच्या पावसाळी अधिवेशनात सिंदपुरी येथील आपातग्रस्तांच्या घरकुलांचा प्रश्न मार्गी लागला नाही. यामुळे शासनाच्या संवेदनाच बोथड झाल्याचा अनुभव गावकऱ्यांना आलेला असून फाटक्या घरात वास्तव्य करणे, आपातग्रस्तांना जिकरीचे ठरत आहे.सिंदपुरी गावात तलावाची पाळ फुटल्याने विसर्ग होणारे पाणी गावात शिरले. या पाण्याचा फटका २०० हुन अधिक नागरिकांना बसला. यात अनेकांची घरे कोसळली. २५ कुटुंबीयांना टिनाचे शेडमध्ये वास्तव्य देण्यात आले. या घटनेला तब्बल वर्षभरांचा कालावधी लोटला असताना आपातग्रस्तांना घरकुल देणारा राज्याच्या तिजोरीचा पिटारा उघडण्यात आलेला नाही. या राज्याचे नागरिकांवर संकट कोसळले असताना शासन आणि लोकप्रतिनिधी गंभीर नसल्याचा अनुभव बेघर कुटुंबियांना आलेला आहे. जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणात चटई आणि टिन या साहित्याने शेड उभारण्यात आले आहे. हे शेड किती दिवस शाबुत राहणार आहेत हे सागताना खुद्द यंत्रणा चक्रावली आहे. चटई आता सडली आहे. यामुळे अनेक ठिकाणी छिद्र पडली आहे.हवेचा प्रवाह आर पार असल्याने शेडमध्ये वास्तव्य करणाऱ्या कुटुंबियाचे जिणे मुश्किल झाले आहे. एकेकाळी गावात वास्तव्य असल्याचे सांगणारे आपातग्रस्त कुटुंब आता नव्या वसाहतीचे नामकरण करित आहेत. घापरा टोली असे या वसाहतीचे नामकरण झाले आहे. या शेडमध्ये विजेची सोय करण्यात आली असली तरी अन्य सुविधाचे भयाण वास्तव निदर्शनास येत आहे. टिनच्या शेडची वाईट अवस्था झाल्याने गुऱ्हांचा गोठा असे चित्र निर्माण झाले आहे. प्रत्यक्षात या पडक्या शेडमध्ये नागरिक वास्तव्य करीत असल्याचा विसर लोकप्रतिनिधींना झालेला असल्याचे दिसून येत आहे. या शेडमध्ये कुटुंबात शाळकरी विद्यार्थी असून त्यांचे भवितव्य नाकर्ते शासनाच्या निष्क्रियतेमुळे वेशीवर टांगल्या जात आहेत. अभ्यासाचे वातावरण पुर्णत: ठासडले आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याची चिंता पालकांना भेडसावणारी आहे. दरम्यान आपातग्रस्त कुटुंब आणि शेतकऱ्यांना मदत वाटपावरून शासनाने दुरावा ठेवला आहे. सामाजिक संस्थेच्या मदतीने त्यांचे संसार सावरण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. परंतु मदत वाटप आखडती असल्याने पुन्हा स्थिती जैसे थे झाली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीपुर्वी आपातग्रस्तांना न्याय देण्यासाठी मोठे राजकारण झाले आहे. तुमसरच्या सभेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी मुंबईला जाताच आपातग्रस्तांचा घरकुलांचा प्रश्न मार्गी लावण्याचे ठासून सांगितले आहे. हा प्रश्न पावसाळी अधिवेशनात निकाली निघणार अशी अपेक्षा होती. ३५ लाख रूपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात येणार असल्याची चर्चा होती. या आपातग्रस्त कुटूंबियाकडे भुखंड असून घरकुल मंजुर करण्याची ओरड त्यांची आहे. शासनाचे घरकुल योजना सव्वा लाख रूपयाच्या घरात आहेत. यामुळे कोट्यवधी रूपयाची मागणी आपातग्रस्तांची नाही.परंतु पावसाडी अधिवेशन संपला असताना घरकुल मंजुरीचे साधे पत्र ग्रामपंचायत आले नाही. यामुळे हा पावसाडा कोरडा ठरला आहे. आता नागपुरात होणारे दिवाळी अधिवेशन ४ महिन्यावर ठेवून ठेपले आहे. हक्कासाठी भांडण्याची स्थिती आपातग्रस्त कुटूंबियावर आली आहे. संताप अन् आक्रोश असताना कुणी गंभीरतेने घेण्याच्या स्थितीत नाही. येत्या स्वतंत्र दिनाच्या ग्रामसभेत हा विषय चर्चेत येणार आहे. यामुळे नवा समीकरण तयार होण्याची चिन्हे आहेत. आपातग्रस्त कुटुंबियांच्या डोळ्यात अश्रृ आणि मदत वाटपात दिरंगाई होत असल्याने संताप आहे. याच गावात तलावाने गावकऱ्यांना कोट्यवधींचा फटका दिला आहे. अर्धा अधिक वर्ष दोन विभागाच्या जबाबदारी स्विकारण्यावरून भांडणात गेला आहे. नंतर प्रस्ताव तयार करून मुंबई दरबारात पाठविण्यात आलेला असून हा प्रस्ताव निधी आणि मंजुरीचा हिरवा कंदिल घेवून येताना वाटेतच गडप झाला आहे. या तलावावर रोहयो अंतर्गत ग्राम पंचायतने अंदाजे २५ लाखांचा निधी खर्च केला आहे. फाटक्या चादराला थिगडाचा आधार आहे. परंतु ६ गावांचा पाणी साठवणूक करणारा हा तलाव अल्प खर्चाची कामे शाबूत ठेवणार नाही, असे जाणकारांचे मत आहेत.