शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

ढगाळ वातावरणाने दुसऱ्या दिवशीही भाविकांची निराशा

By admin | Updated: February 2, 2016 00:58 IST

अंबाबाई किरणोत्सव : अलोट गर्दी; आज अखेरचा दिवस

१५० वर्षांची परंपरा संपली : न्यायालयाच्या आदेशाने ग्रामस्थांमध्ये नैराश्य

मासळ : १५० वर्षांची परंपरा असलेला, मासळ येथील शंकरपट, आधुनिक काळातील मासळ महोत्सव, सर्वाेच्च न्यायालयाच्या आदेशान्वये अखेर मोडीत निघाला असून आता शंकरपट फक्त इतिहासाच्या पानावरच असणार आहे. यामुळे शेतकरी, शेतमजूर, पटशौकिन व सामान्य माणसांच्या आनंदावर विरजण पडले आहे.मासळ येथे गावालगतच असलेल्या पाच हेक्टर सपाट नैसर्गिक परिसर हे पटाची दाण म्हणून प्रसिद्ध आहे. जागोबा आडकू झलके हे त्याकाळातील चिटणीसांकडे असलेले दिवाणजी म्हणून काम पाहायचे. भौगोलिकदृष्ट्या मासळ हे उत्तम ठिकाण असल्याने व शेती व्यवसायापासून उसंत मिळत असल्याने चिटणीसांच्या परवानगगिने त्यांनी मासळ येथे शंकरपटाला सुरूवात केली होती.या शंकरपटानिमित्त जिल्हाभरापासून शेतकरी, पटशौकिन आपआपल्या बैलजोड्या आणायचे. अलीकडच्या काळात विदर्भातून दुरवरून बैलजोड्या पटात दाखल व्हायच्या. यानिमित्ताने नातेवाईक, मित्रमंडळी, आबालवृद्धांसाठी मासळचे पट एक पर्वणीच असायची. या पटात उपवर-वधूंची सोयरिकसुद्धा होत होती. म्हणूनच हे पट सामाजिक संबंधाकरिता महत्त्वाचा दुवा होता. पटानिमित्त जोडीमालक बैलांना उच्च दर्जाचा कडबा, कुटार, पौष्टिक खाद्य द्यायचे. पटाच्या बैलांची विशेष काळजी घेतली जायची. गव्हाच्या कणकीचे भिजवून बनवले हुंडे म्हणजे उत्तम खुराक असायची. जोडीमालक आपली जोडी सर्वाेत्तम ठरण्यासाठी पोटच्या पोरांप्रमाणे बैलांची काळजी घ्यायचा. त्यासाठी ते बैलांचे मुलांप्रमाणे नामकरणसुद्धा करायचे मिरची, वागूर, शेरू, खिल्लारी, गेंडा, ढोंगाबसी, वाध्या, डुकऱ्या, सरज्या, हरण्या, माळी, ससा, झगड्या अशा प्रकारची बैलांची नावे आज ही शेतकऱ्यांच्या स्मरणात आहेत.शंकरपटानिमित्त दुरवरून व्यावसायिक यायचे. गावाला जणु यात्रेचे स्वरूप येत होते. लोक या पटातून शेतीची अवजारे गृहोपयोगी वस्तू, बैलांची खरेदी विक्री व्हायची. लाखोंची उलाढाल व्हायची. घरांची डागडुजी, नवीन कपडे, साफसफाई, पाहुण्यांची सरबराई यासाठी गावातील लोक आर्थिक बाजू तयार ठेवून आठ दिवसांपासून तयारीला लागायचे. तेव्हा गावातील रस्ते, पाणी व्यवस्था दिवाबत्तीची सोय याबाबी ग्रामपंचायत स्तरावरून प्राध्यान्याने केल्या जात होत्या. स्वातंत्र्यानंतरही मासळ येथील शंकरपट मोठ्या थाटात भरायचा. त्यासाठी रामजी चुटे, बाळकृष्ण लांजेवार, बाबुराव मुल, आसाराम ब्राह्मणकर, बाबा ब्राह्मणकर, छगन वांढरे, भास्कर गौरकर या मासळच्या माजी सरपंचांनी आपआपल्या कारकिर्दीत यशस्वीपणे, कोणतेही गालबोट न लागता धडाक्यात पटांचे आयोजन केलेले आहे. गावात अतिशय उत्साहाचे, आनंदाचे वातावरण असायचे. यातील मनोरंजनाचे कार्यक्रम व भोजनाची मेजवानी भरगच्च असायची. अशाप्रकारे तीळसंक्रातीनंतरचा तिसऱ्या रविवारपासून तीन दिवसपर्यंत चालणारा हा शंकरपट आठवणीशिवाय दुसरं काहीच उरला नाही. (वार्ताहर)