शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

धानाची शेती करता... तर मग काही टिप्स जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:49 IST

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

मुखरू बागडे

पालांदूर (भंडारा) : खरिपाचा हंगाम मान्सूनपूर्व मशागतीने अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. सिंचित क्षेत्रातील शेतकरी पेरणीसाठी लगबग करीत आहेत तर कोरडवाहूचा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत चातकासारखी वाट बघत आहे. पेरणीचा हंगाम साधला तरच रोवणीचा हंगाम जोमदार ठरतो. त्यामुळे पेरणीपूर्वी बियाणांची माहिती व काळजी अत्यंत महत्त्वाची ठरते.

कृषी विभाग दरवर्षी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करीत नवनवीन माहिती देतो. तरीही काही शेतकरी जुन्याच चुकीच्या पद्धतीने शेती करतात. तेव्हा नव्या ज्ञानाचा, अभ्यासाचा शेतकरी आपल्या भावास म्हणतो, धानाची शेती करतोस... तर मग कृषी विभागाच्या काही टिप्स जाणून घे!

खरीप हंगामात मुख्यत्वे करून भात पिकाची लागवड केली जाते. बाजारातील भात पिकाच्या वाणांची खरेदी करताना बियाणांचा योग्य दर्जा व उत्कृष्ट गुणवत्ता असल्याची खात्री करून बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे. बोगस बियाणे हे पावती शिवाय विकले जाते. त्यामुळे अशा बियाणांची खरेदी करून पेरणी करणे नुकसानदायक आहे. परवानाधारक व अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे.

बियाणे सीलबंद वेष्ठनातील, लेबल असलेले व लेबलवर बियाणाबाबत संपूर्ण तपशील नमूद असलेले तसेच वैध मुदतीत असलेले बियाणे खरेदी करून पक्के बिल घ्यावे. पेरणीच्या वेळी पिशवीच्या खालच्या बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे व थोडे बियाणे पिशवीतच शिल्लक ठेवावे. पक्के बिल, लेबल व काही शिल्लक ठेवलेले बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे. छापील किमतीपेक्षा अधिक दराने व विना पावतीचे बियाणे खरेदी करू नये. पावतीवर खरेदीदार शेतकरी व विक्रेता यांची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. तेव्हाच बियाण्यांची खरेदी करावी.

कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये

अत्यंत स्वस्त दरात विकले जात असलेले बियाणे अनधिकृत व निकृष्ट दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. बियाणांचा दर्जा, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता बाबत काही तक्रार असल्यास जवळच्या पंचायत समिती किंवा राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा.

हे करून बघा...

बियाणे पेरणीपुर्वी उगवण क्षमता तपासावी व योग्य उगवण क्षमतेच्या बियाणांची तीन टक्के मिठाच्या दावणाची व बुरशीनाशकाचे बीजप्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रिया करताना प्रथम मिठाच्या ३ टक्के द्रावणामध्ये (३०० ग्राम मीठ + १० लिटर पाणी) टाकून ढवळून हलके, रोगग्रस्त पाण्यावर तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन २४ तास सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा कॉर्बेनडिझिम किंवा थायरम यापैकी एका रासायनिक बुरशी नाशकाची २.५ ग्राम ग्राम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर अझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणूंची प्रत्येकी २५० ग्राम प्रति दहा किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून सावलीत सुकवून पेरणी करावी.

जिवाणू खताकरिता कृषी विज्ञान केंद्र, साकोली इथे संपर्क करता येईल. बियाणे निवड करताना जमीनपरत्वे व सिंचनाची सोय लक्षात घेऊनच हलके, मध्यम व भारी कालावधीच्या वाणांची निवड करावी. रब्बी पिकाची वेळेवर पेरणी होणे करिता हलक्या व मध्यम जाती योग्य ठरतात. कोरडवाहू क्षेत्रात भात बियाणे पेरणी करताना घाई न करता १०० मी.मी. पाऊस झाल्यावर व जमिनीत १५ ते २० से.मी. खोलीपर्यंत ओलावा पोहोचल्यानंतरच हवामान अंदाज घेऊन पेरणी करावी.

- किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी