शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

धानाची शेती करता... तर मग काही टिप्स जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2023 17:49 IST

उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांचे आवाहन

मुखरू बागडे

पालांदूर (भंडारा) : खरिपाचा हंगाम मान्सूनपूर्व मशागतीने अंतिम टप्प्यात पोहोचलेला आहे. सिंचित क्षेत्रातील शेतकरी पेरणीसाठी लगबग करीत आहेत तर कोरडवाहूचा शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत चातकासारखी वाट बघत आहे. पेरणीचा हंगाम साधला तरच रोवणीचा हंगाम जोमदार ठरतो. त्यामुळे पेरणीपूर्वी बियाणांची माहिती व काळजी अत्यंत महत्त्वाची ठरते.

कृषी विभाग दरवर्षी शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक करीत नवनवीन माहिती देतो. तरीही काही शेतकरी जुन्याच चुकीच्या पद्धतीने शेती करतात. तेव्हा नव्या ज्ञानाचा, अभ्यासाचा शेतकरी आपल्या भावास म्हणतो, धानाची शेती करतोस... तर मग कृषी विभागाच्या काही टिप्स जाणून घे!

खरीप हंगामात मुख्यत्वे करून भात पिकाची लागवड केली जाते. बाजारातील भात पिकाच्या वाणांची खरेदी करताना बियाणांचा योग्य दर्जा व उत्कृष्ट गुणवत्ता असल्याची खात्री करून बियाणे खरेदी करणे आवश्यक आहे. बोगस बियाणे हे पावती शिवाय विकले जाते. त्यामुळे अशा बियाणांची खरेदी करून पेरणी करणे नुकसानदायक आहे. परवानाधारक व अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खरेदी करावे.

बियाणे सीलबंद वेष्ठनातील, लेबल असलेले व लेबलवर बियाणाबाबत संपूर्ण तपशील नमूद असलेले तसेच वैध मुदतीत असलेले बियाणे खरेदी करून पक्के बिल घ्यावे. पेरणीच्या वेळी पिशवीच्या खालच्या बाजूस छिद्र पाडून बियाणे बाहेर काढावे व थोडे बियाणे पिशवीतच शिल्लक ठेवावे. पक्के बिल, लेबल व काही शिल्लक ठेवलेले बियाणे हंगाम संपेपर्यंत जपून ठेवावे. छापील किमतीपेक्षा अधिक दराने व विना पावतीचे बियाणे खरेदी करू नये. पावतीवर खरेदीदार शेतकरी व विक्रेता यांची स्वाक्षरी असल्याची खात्री करून घ्यावी. तेव्हाच बियाण्यांची खरेदी करावी.

कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये

अत्यंत स्वस्त दरात विकले जात असलेले बियाणे अनधिकृत व निकृष्ट दर्जाचे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. याद्वारे शेतकऱ्यांची फसवणूक होण्याची दाट शक्यता असते. बियाणांचा दर्जा, उगवण क्षमता, भौतिक शुद्धता बाबत काही तक्रार असल्यास जवळच्या पंचायत समिती किंवा राज्य शासनाच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क करावा.

हे करून बघा...

बियाणे पेरणीपुर्वी उगवण क्षमता तपासावी व योग्य उगवण क्षमतेच्या बियाणांची तीन टक्के मिठाच्या दावणाची व बुरशीनाशकाचे बीजप्रक्रिया करून घ्यावी. बीज प्रक्रिया करताना प्रथम मिठाच्या ३ टक्के द्रावणामध्ये (३०० ग्राम मीठ + १० लिटर पाणी) टाकून ढवळून हलके, रोगग्रस्त पाण्यावर तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून २ ते ३ वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन २४ तास सावलीत वाळवावे. पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा कॉर्बेनडिझिम किंवा थायरम यापैकी एका रासायनिक बुरशी नाशकाची २.५ ग्राम ग्राम प्रति किलो या प्रमाणात बीज प्रक्रिया करावी. त्यानंतर अझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणूंची प्रत्येकी २५० ग्राम प्रति दहा किलो याप्रमाणे बीज प्रक्रिया करून सावलीत सुकवून पेरणी करावी.

जिवाणू खताकरिता कृषी विज्ञान केंद्र, साकोली इथे संपर्क करता येईल. बियाणे निवड करताना जमीनपरत्वे व सिंचनाची सोय लक्षात घेऊनच हलके, मध्यम व भारी कालावधीच्या वाणांची निवड करावी. रब्बी पिकाची वेळेवर पेरणी होणे करिता हलक्या व मध्यम जाती योग्य ठरतात. कोरडवाहू क्षेत्रात भात बियाणे पेरणी करताना घाई न करता १०० मी.मी. पाऊस झाल्यावर व जमिनीत १५ ते २० से.मी. खोलीपर्यंत ओलावा पोहोचल्यानंतरच हवामान अंदाज घेऊन पेरणी करावी.

- किशोर पात्रीकर, उपविभागीय कृषी अधिकारी, साकोली

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी