शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

लाखांदूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:44 IST

तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : प्रशासनाची बघ्याची भूमिका, उपाययोजना कागदावरच, रोज सकाळी होतात नळावर भांडणे

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे. प्रशासन मात्र पाणी टंचाई समस्येकडे दुर्लक्ष करीत असून बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरी आटल्या, बोअरवेल निकामी झाले. पाण्यासाठी दुसरे कोणते स्त्रोत उपलब्ध नाही. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अतिरिक्त विहिरी व बोअर अधिग्रहण करण्याची गरज आहे.एप्रिल महिना संपला आहे व मे महिन्याच्या सुरुवात होऊन पंधरा दिवस झाले आहेत. पाणी टंचाईग्रस्त गावात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. परंतु प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. प्रशासन असेच बघत राहणार की काही उपाययोजना करेल, असे प्रश्न नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात उपस्थित केल्या जात आहेत.पाण्याचा अपव्यय टाळाभंडारा : जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात जाणवत असले तरी भविष्यात येथील नागरिकाना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा पुर्नवापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची हीच वेळ आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुर्नवापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा शहरासह जिल्हाभरात पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात काही भागात पाणी येत नाही तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरडतात. ग्रामीण भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाºयाने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे मोठे आव्हान आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई