शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
2
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
3
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
4
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
5
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
6
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
7
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
8
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
9
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
10
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
11
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
12
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
13
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
14
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
15
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
16
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
17
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले
18
Crime: विधवा भावजयीच्या प्रेमात पडला जेठ, लग्नासाठी सतत दबाव; नकार देताच अ‍ॅसिड फेकलं!
19
IND vs SA : सलग दोन सेंच्युरीसह 'या' पठ्ठ्यानं वाढवलं गिल-गंभीर जोडीचं टेन्शन; कारण...
20
आधार कार्ड काढायला घराबाहेर पडले ते परतलेच नाहीत; पेट्रोल पंप मालकाचा २ मुलींसह संशयास्पद मृत्यू

लाखांदूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:44 IST

तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : प्रशासनाची बघ्याची भूमिका, उपाययोजना कागदावरच, रोज सकाळी होतात नळावर भांडणे

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे. प्रशासन मात्र पाणी टंचाई समस्येकडे दुर्लक्ष करीत असून बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरी आटल्या, बोअरवेल निकामी झाले. पाण्यासाठी दुसरे कोणते स्त्रोत उपलब्ध नाही. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अतिरिक्त विहिरी व बोअर अधिग्रहण करण्याची गरज आहे.एप्रिल महिना संपला आहे व मे महिन्याच्या सुरुवात होऊन पंधरा दिवस झाले आहेत. पाणी टंचाईग्रस्त गावात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. परंतु प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. प्रशासन असेच बघत राहणार की काही उपाययोजना करेल, असे प्रश्न नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात उपस्थित केल्या जात आहेत.पाण्याचा अपव्यय टाळाभंडारा : जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात जाणवत असले तरी भविष्यात येथील नागरिकाना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा पुर्नवापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची हीच वेळ आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुर्नवापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा शहरासह जिल्हाभरात पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात काही भागात पाणी येत नाही तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरडतात. ग्रामीण भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाºयाने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे मोठे आव्हान आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई