शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

लाखांदूर तालुक्यात भीषण पाणीटंचाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2019 00:44 IST

तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे.

ठळक मुद्देपाण्यासाठी पायपीट : प्रशासनाची बघ्याची भूमिका, उपाययोजना कागदावरच, रोज सकाळी होतात नळावर भांडणे

दयाल भोवते।लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील अनेक गावांत पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. पाण्यासाठी नागरिकांची पायपीट सुरू असून मिळेल त्या ठिकाणाहून पाणी मिळविण्याचा प्रयत्न नागरिकांतर्फे करण्यात येत आहेत. तर भीषण पाणी टंचाई असणाऱ्या गावांना पाण्यासाठी नागरिकांचे हाल सुरू झाले आहे. प्रशासन मात्र पाणी टंचाई समस्येकडे दुर्लक्ष करीत असून बघ्याच्या भूमिकेत असल्याचे चित्र दिसून येत आहेत.दरवर्षीप्रमाणे यावषीर्ही तालुक्यात पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. अनेक गावातील विहिरी आटल्या, बोअरवेल निकामी झाले. पाण्यासाठी दुसरे कोणते स्त्रोत उपलब्ध नाही. तालुक्यातील जवळपास प्रत्येक गावात अतिरिक्त विहिरी व बोअर अधिग्रहण करण्याची गरज आहे.एप्रिल महिना संपला आहे व मे महिन्याच्या सुरुवात होऊन पंधरा दिवस झाले आहेत. पाणी टंचाईग्रस्त गावात अतिशय भीषण परिस्थिती निर्माण झाली असून पाण्यासाठी लोकांचे अतोनात हाल सुरू झाले आहेत. परंतु प्रशासन मात्र बघ्याच्या भूमिकेत आहे. प्रशासन असेच बघत राहणार की काही उपाययोजना करेल, असे प्रश्न नागरिकांमधून मोठ्या प्रमाणात उपस्थित केल्या जात आहेत.पाण्याचा अपव्यय टाळाभंडारा : जिल्ह्यातून बारमाही वाहणारी वैनगंगा नदी आहे. टँकरमुक्त भंडारा जिल्ह्यात पाणी टंचाई नसावी, असे वाटत असले तरी पाणी टंचाईची झळ पोहोचते. निसर्गाने भरभरुन दिलेल्या भंडारा शहरात पाण्याचा अपव्यय मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. याचे परिणाम उन्हाळ्यात जाणवत असले तरी भविष्यात येथील नागरिकाना तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पाण्याचा पुर्नवापर, रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी प्रत्येकाने पुढे येण्याची हीच वेळ आहे. भंडारा जिल्ह्यात पावसाच्या पाण्याची साठवणूक झाली पाहिजे. पाण्याचा पुर्नवापर वाढला पाहिजे, नाहीतर भविष्यात मोठे जलसंकट निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. भंडारा शहरासह जिल्हाभरात पाण्याचा अपव्यय होत आहे. शहरातील विविध वॉर्डात व्हॉल्व लिकेज आहेत. शहरात काही भागात पाणी येत नाही तर काही भागात पाण्याचा अपव्यय सुरु असतो. पाणी वाहून जात असते. भंडारा शहरातील पाईपलाईन जीर्ण झाली असून नळाला दूषित पाणी येते. त्यामुळे नागरिक पाणी टंचाईच्या नावाने ओरडतात. ग्रामीण भागात हातपंपावर लहान मुलांचा खेळ सुरू असतो. जनावरे धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात विहीरीचे पाणी वापरले जाते. अंगणातील फरशीवर फवाºयाने पाणी मारले जाते. यात पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. त्यामुळे पाण्याची बचत करणे हे मोठे आव्हान आहे. 

टॅग्स :water shortageपाणीटंचाई