शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

पावसाच्या दडीने उकाडा वाढला पुन्हा सुरू झाली कुलरची घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:59 IST

पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली.

ठळक मुद्देदुबार पेरणीची गडद छाया। जमिनीबाहेर निघालेले अंकुर पाण्याअभावी करपले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाळ्याचे दिवस असूनही उष्णतेत वाढ होत असल्याने पुन्हा शासकीय निमशासकीय कार्यालयात तर, काही घराघरामध्ये पंखे, कुलरची घरघर सुरू झाली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांनी खरीप हंगामाचे महागडे बि-बियाण्याची शेतात पेरणी केली. जमिनीबाहेर बिजाअंकुर आले. परंतू पाण्याअभावी हिरवेगार वाऱ्यावर डुलणारे बिजाअंकुर आता करपण्याच्या मार्गावर दिसत आहेत.यावर्षी पाऊस लांबणीवर पडला त्यामुळे खरीप हंगामातील धान पऱ्हे तसेच तूर, कापूस, सोयाबिन, मका व इतर पिकाची पेरणीही शेतकऱ्यांनी उशिरा सुरू केली. रोहणी, मृग, व अर्धाअधिक आद्रा नक्षत्र कोरडा गेल्यानंतर जिल्ह्यात पावसाला सुरूवात झाली. दमदार पावसाने कोरड पडलेल्या नद्या नाल्यांना ओले करून त्यात पाण्याची धार आली. परंतू पुन्हा पावसाने दडी मारल्याने पेरणी केलेले पिक हिरवेगार दिसत असतांना पुन्हा आकाशात ढगाळ वातावरण निवळले गेले. त्यामुळे सुर्याचे दर्शन होवून पुन्हा वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे.वातावरण बदलाचा परिणाम आजारावर सुध्दा पडत आहे. त्यामुळेच मानवासोबत पशुप्राणी यांनाही आजाराचा सामना करावा लागत आहे. वातावरणात बदल होत असल्याने त्याचा थेट खरीप हंगामाच्या पिकावरही परिणाम पडत आहे. पाऊस उशिरा व तेही अल्प पडल्यामुळे शेतकऱ्यांनी लगबगीने खरीप हंगामाची पेरणी तर उरकुन घेतली, पण पाऊस असाच दगा देत राहील तर खरीप हंगामाचे काही खरे नाही. .शेतात पिक निघाले की त्याला भावही मिळत नसते. शेतकºयांना पिकाच्या उत्पादन खचार्साठी सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. त्याचे व्याज वाढू नये यासाठी मिळेल त्या भावात व्यापाऱ्यांना आपला माल विक्री करावा लागतो. अव्वाच्या सव्वा व्याज आकारून सावकार शेतकऱ्यांची पिळवणुक करतो. त्यामुळेच पिक निघाल्यावरही इकडे आड तिकडे विहिर अशी स्थिती शेतकऱ्यांची झाली असते.आता मागील तीन वर्षांपासून कर्जाच्या ओझ्याखाली शेतकरी दबून बेजार झाला आहे. यावर्षी काहीतरी हातात पडेल अशी आशा असतांना आता त्या बिजा अंकुराला निसर्गाच्या पावसाची गरज आहे. त्यामुळेच पुन्हा केव्हा पाऊस येईल, यासाठी शेतकºयांची नजर आकाशाकडे लागली आहे.शेती व्यवसाय धोक्याचानिसर्गाच्या लहरीपणामुळे पिकाच्या उत्पादनात सातत्याने घट येत आहे. आता रासायनिक खताचे भावही गगनाला गेले आहे. शेतमजूर मिळेनासे झाले आहेत. शेतात काम करणे कठीण झाले आहे. शेतीचा व्यवसाय धोक्याचा झाला आहे. आतापासून दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. दरवर्षी शेतकरी हा विविध कारणांमुळे दुखावला जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस