शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

दमदार पावसाने धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:28 IST

जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.

ठळक मुद्देपावसाच्या झडीने शेतकरी सुखावला : पाणी पातळीत अल्पवाढ, शेतशिवार गजबजले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसासाठी चिंतीत झाला होता. परंतु याच दरम्यान वरूणराजाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे धान रोवणीसह शेतीच्या ईतर कामांना चांगला वेग आला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आर्द्रा व पुनर्वसू ही दोन नक्षत्रे कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडेच लागलेले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना तब्बल जुलै अखेरची प्रतीक्षा करावी लागली.मात्र मोठ्या प्रतिक्षेनंतर गेल्या दोन दिवसापासून अनेक ठिकाणी पावसाची संततधार झड कायम असल्याने शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा खरीप हंगामातील धानपिकांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या आगमनासाठी अनेक गावांमध्ये पूजा अर्चा करण्यात येत होत्या. ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वी धानाचे पऱ्हे टाकले आहेत. त्यांचे पऱ्हे धान रोवणी योग्य झाले आहेत. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखांदूर या तालुक्यांमध्ये रोवणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यावर्षीतरी अपेक्षीत उत्पन्न होणार का, या विवंचनेत असताना पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटी का असेना रोवणीला प्रारंभ झाला. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या धान उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पºह्यांचे योग्य नियोजन करून फक्त एक रोप वीस बाय वीस अंतरावर रोवणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे पऱ्हे कमी असले तरी बचत होणार आहे.मजुरीच्या दरात वाढपावसाच्या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली होती. त्यातच पावसाने आगमन केल्याने सर्वच शेतकऱ्यांची मजूरांसाठी मागणी असल्याने मजुरांसह ट्रॅक्टरचे चिखलनीचे दर वाढले आहेत. बैलजोड्या कमी झाल्याने शेतकऱ्यांना चिखलनीसाठी वेळेवर ट्रॅक्टर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे आता रोवणीच्या कामांमुळे गावातील शेतकरी, शेतमजूर महिलांना सुगीचे दिवस आले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती