शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे हादरले! टीव्ही बंद करण्यावरुन वाद, बापाची मुलाकडून हत्या; कोथरुडमधील घटना
2
मला पुरस्कार द्या...! पठ्ठ्याने फास्टॅग पास आल्यापासून २५ दिवसांत ११,००० किमी थार चालविली, वाचले एवढे रुपये...
3
BSNL ने लॉन्च केली eSIM सेवा: आता फिजिकल सिम कार्डशिवाय करा कॉल आणि वापरा इंटरनेट!
4
'IIT कानपूरने माझ्या मुलाचा घास घेतला'; इंजिनिअरिंग करणाऱ्या धीरजचा रूममध्ये मिळाला मृतदेह, बापाचा आक्रोश
5
जर्मनीतील म्युनिक विमानतळावर ड्रोन दिसला, १७ उड्डाणे रद्द; युरोपमध्ये घबराट पसरली
6
‘शटडाऊन’च्या पहिल्याच दिवशी अमेरिकेत संकट; देशातील अनेक महत्त्वाची पर्यटनस्थळे तात्पुरती बंद
7
'युरोपने चिथावणी दिली तर योग्य उत्तर मिळेल,तेल खरेदीबाबत भारत अमेरिकेच्या दबावाला झुकणार नाही';पुतिन यांचा स्पष्ट इशारा
8
आजचे राशीभविष्य- ०३ ऑक्टोबर २०२५, धनलाभ होईल, प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल
9
‘बाबा’कडे तसले टॉय, पॉर्न सीडी, अश्लील चॅट अन्... चैतन्यानंदच्या चौकशीतून धक्कादायक माहिती बाहेर
10
Kantara Chapter 1: प्रदर्शित होताच अख्खं मार्केट खाल्लं! 'कांतारा चॅप्टर १'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
11
श्वासात, ध्यासात गांधी विचार जगलेला स्वातंत्र्य संग्रामातील तारा निखळला; ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी डॉ. जी. जी. पारीख कालवश
12
सर्व राज्यांत मतदार यादीतून हटवणार मृत व्यक्तींची नावे; जन्म-मृत्यू नोंदणी कार्यालयाचा डेटा निवडणूक यंत्रणेशी जोडणार
13
‘अनैतिकते’मुळे अफगाणमध्ये ब्लॅकआउट! इंटरनेटबंदीमागे तालिबानचा नेमका हेतू काय?
14
तेजीचे दिवस; अर्थव्यवस्थेची मरगळ झटकली, नोकऱ्या आणि गिग कामगारांसाठी 'अच्छे दिन' का?
15
सोने खरेदीची लगीनघाई; दसऱ्याच्या मुहूर्तावर मुंबईतील बाजारात संध्याकाळी तेजी; चांदी फॉर्मात
16
शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा
17
विधान भवनातील मारहाण प्रकरण तपासाला स्थगिती; मरिन लाइन्स पोलिसांना उच्च न्यायालयाचे आदेश
18
हिंसा हे प्रश्नांचे उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य आहे : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत
19
संकटात जो घरी बसतो तो कसला आला शिवसैनिक? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
20
संघ मेहनतीला लागलेले भाजप हे विषारी फळच! उद्धव ठाकरे यांचा दसरा मेळाव्यात घणाघात

दमदार पावसाने धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:28 IST

जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.

ठळक मुद्देपावसाच्या झडीने शेतकरी सुखावला : पाणी पातळीत अल्पवाढ, शेतशिवार गजबजले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसासाठी चिंतीत झाला होता. परंतु याच दरम्यान वरूणराजाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे धान रोवणीसह शेतीच्या ईतर कामांना चांगला वेग आला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आर्द्रा व पुनर्वसू ही दोन नक्षत्रे कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडेच लागलेले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना तब्बल जुलै अखेरची प्रतीक्षा करावी लागली.मात्र मोठ्या प्रतिक्षेनंतर गेल्या दोन दिवसापासून अनेक ठिकाणी पावसाची संततधार झड कायम असल्याने शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा खरीप हंगामातील धानपिकांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या आगमनासाठी अनेक गावांमध्ये पूजा अर्चा करण्यात येत होत्या. ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वी धानाचे पऱ्हे टाकले आहेत. त्यांचे पऱ्हे धान रोवणी योग्य झाले आहेत. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखांदूर या तालुक्यांमध्ये रोवणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यावर्षीतरी अपेक्षीत उत्पन्न होणार का, या विवंचनेत असताना पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटी का असेना रोवणीला प्रारंभ झाला. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या धान उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पºह्यांचे योग्य नियोजन करून फक्त एक रोप वीस बाय वीस अंतरावर रोवणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे पऱ्हे कमी असले तरी बचत होणार आहे.मजुरीच्या दरात वाढपावसाच्या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली होती. त्यातच पावसाने आगमन केल्याने सर्वच शेतकऱ्यांची मजूरांसाठी मागणी असल्याने मजुरांसह ट्रॅक्टरचे चिखलनीचे दर वाढले आहेत. बैलजोड्या कमी झाल्याने शेतकऱ्यांना चिखलनीसाठी वेळेवर ट्रॅक्टर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे आता रोवणीच्या कामांमुळे गावातील शेतकरी, शेतमजूर महिलांना सुगीचे दिवस आले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती