शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

दमदार पावसाने धान रोवणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 22:28 IST

जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.

ठळक मुद्देपावसाच्या झडीने शेतकरी सुखावला : पाणी पातळीत अल्पवाढ, शेतशिवार गजबजले

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जुलै महिन्याच्या अखेर पावसाने जिल्ह्यात हजेरी लावल्याने शेतशिवारात शेतकऱ्यांची रोवणीसाठी एकच धावपळ सुरू झाली आहे. अनेक ठिकाणी शेतकरी मिळेल त्या साधनांनी चिखलणी करून मजुरांच्या सहाय्याने रोवणी करीत आहेत.गेल्या काही दिवसांपासून बळीराजा पावसासाठी चिंतीत झाला होता. परंतु याच दरम्यान वरूणराजाने पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावल्यामुळे धान रोवणीसह शेतीच्या ईतर कामांना चांगला वेग आला आहे. पावसाचे आगमन झाल्याने शेतकरी सुखावला आहे. आर्द्रा व पुनर्वसू ही दोन नक्षत्रे कोरडे गेल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडेच लागलेले होते. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांना तब्बल जुलै अखेरची प्रतीक्षा करावी लागली.मात्र मोठ्या प्रतिक्षेनंतर गेल्या दोन दिवसापासून अनेक ठिकाणी पावसाची संततधार झड कायम असल्याने शेती कामांना वेग आला आहे. काही ठिकाणी संततधार पावसामुळे जिल्ह्यातील नदी-नाले, तलाव, बोड्या आदी जलसाठ्यांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे या जलसाठ्याचा खरीप हंगामातील धानपिकांना फायदा होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाच्या आगमनासाठी अनेक गावांमध्ये पूजा अर्चा करण्यात येत होत्या. ज्या शेतकऱ्यांनी यापुर्वी धानाचे पऱ्हे टाकले आहेत. त्यांचे पऱ्हे धान रोवणी योग्य झाले आहेत. जिल्ह्यातील साकोली, पवनी, लाखांदूर या तालुक्यांमध्ये रोवणी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. गेल्या तीन-चार वर्षापासून पावसाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे अनेक शेतकरी यावर्षीतरी अपेक्षीत उत्पन्न होणार का, या विवंचनेत असताना पावसाच्या पुनरागमनामुळे शेतकरी आनंदीत झाला आहे. जुलै महिन्याच्या शेवटी का असेना रोवणीला प्रारंभ झाला. त्यामुळे सध्यातरी शेतकऱ्यांचे दुबार पेरणीचे संकट टळले आहे. परंतु शेतकऱ्यांच्या धान उत्पादनाला फटका बसण्याची शक्यता दिसून येत आहे. कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना पºह्यांचे योग्य नियोजन करून फक्त एक रोप वीस बाय वीस अंतरावर रोवणीसाठी मार्गदर्शन केले जात आहे. त्यामुळे पऱ्हे कमी असले तरी बचत होणार आहे.मजुरीच्या दरात वाढपावसाच्या विलंबामुळे अनेक शेतकऱ्यांची रोवणी खोळंबली होती. त्यातच पावसाने आगमन केल्याने सर्वच शेतकऱ्यांची मजूरांसाठी मागणी असल्याने मजुरांसह ट्रॅक्टरचे चिखलनीचे दर वाढले आहेत. बैलजोड्या कमी झाल्याने शेतकऱ्यांना चिखलनीसाठी वेळेवर ट्रॅक्टर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे आता रोवणीच्या कामांमुळे गावातील शेतकरी, शेतमजूर महिलांना सुगीचे दिवस आले आहेत.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती