शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीची झळ; शेतकरी वळले पीक विम्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:27 IST

७९,०८० संख्येने वाढ : यंदा १.९७ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गतवर्षी खरीप हंगामात १,१८,०९८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला होता. यंदा हंगामाच्या प्रारंभीच अतिवृष्टी व पुराचा फटका बसला. त्यामुळे यंदा १,९७,१७८ शेतकऱ्यांनी एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. गतवर्षापेक्षा यंदा ७९,०८० शेतकरी संख्या वाढली असून पिकांना सुरक्षा कवच मिळाले आहे; परंतु गतवर्षी पिकांचे नुकसान होऊनही विमा मिळालेला नव्हता. निदान यंदा तरी नुकसानीचा विमा मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा विपरीत परिस्थितीत पिकांना विम्याचे संरक्षण लाभावे, यासाठी यावर्षी १ लाख ९७ हजार १७८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांत मोहाडी तालुका आघाडीवर आहे. यावर्षी एकूण विमा संरक्षित रक्कम ४१६.०१ कोटी एवढी आहे, तर विमा काढणाऱ्या शेतकऱ्यात कर्जदार शेतकरी संख्या १,३८,०९९ तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४१,०७९ एवढी आहे. 

पीक विमा काढलेले तालुकानिहाय शेतकरी तालुका                                   शेतकरी संख्या भंडारा                                           २३६९० मोहाडी                                          ३१६७८ तुमसर                                           १९८५४ पवनी                                             २५२४७ साकोली                                         २६७६० लाखनी                                          २७७४० लाखांदूर                                         २४५०९ एकूण                                        १,९७,१७८

या पिकांना विमा लागू खरीप हंगामात धान या पिकासाठी सर्व ४० महसूल मंडळे अधिसूचित आहेत. तसेच सोयाबीनसाठी भंडारा, मोहाडी, लाखांदूर व पवनी तालुक्यांतील २६ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. धान व सोयाबीन पिकासाठी विमा लागू आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात विमा उतरण्याची सुविधा केली आहे. 

लाडकी बहीण' मुळे वाढली होती मुदत यंदा शासनाने पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पीक विमा काढण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विमा काढण्याची मुदत शासनाने ३१ जुलैपर्यंत वाढवली होती.

शेतकऱ्यांत निराशेचे वातावरणदरवर्षी पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे यावर्षी पीक विमा उतरविण्यासाठी शेतकरी तयार होत नव्हते. मागील वर्षी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण दरवर्षी पाहावयास मिळते, हे विशेष. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी