शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

अतिवृष्टीची झळ; शेतकरी वळले पीक विम्याकडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2024 12:27 IST

७९,०८० संख्येने वाढ : यंदा १.९७ लाख शेतकऱ्यांनी काढला पीक विमा

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : गतवर्षी खरीप हंगामात १,१८,०९८ शेतकऱ्यांनी एक रुपयात पीक विमा काढला होता. यंदा हंगामाच्या प्रारंभीच अतिवृष्टी व पुराचा फटका बसला. त्यामुळे यंदा १,९७,१७८ शेतकऱ्यांनी एकूण ८६ हजार ६५९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. गतवर्षापेक्षा यंदा ७९,०८० शेतकरी संख्या वाढली असून पिकांना सुरक्षा कवच मिळाले आहे; परंतु गतवर्षी पिकांचे नुकसान होऊनही विमा मिळालेला नव्हता. निदान यंदा तरी नुकसानीचा विमा मिळावा, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. 

भंडारा जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करावा लागतो. अतिवृष्टी व महापुरामुळे शेतकरी देशोधडीला लागला आहे. अशा विपरीत परिस्थितीत पिकांना विम्याचे संरक्षण लाभावे, यासाठी यावर्षी १ लाख ९७ हजार १७८ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेत आपला सहभाग नोंदविला आहे. पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांत मोहाडी तालुका आघाडीवर आहे. यावर्षी एकूण विमा संरक्षित रक्कम ४१६.०१ कोटी एवढी आहे, तर विमा काढणाऱ्या शेतकऱ्यात कर्जदार शेतकरी संख्या १,३८,०९९ तर बिगर कर्जदार शेतकऱ्यांची संख्या ४१,०७९ एवढी आहे. 

पीक विमा काढलेले तालुकानिहाय शेतकरी तालुका                                   शेतकरी संख्या भंडारा                                           २३६९० मोहाडी                                          ३१६७८ तुमसर                                           १९८५४ पवनी                                             २५२४७ साकोली                                         २६७६० लाखनी                                          २७७४० लाखांदूर                                         २४५०९ एकूण                                        १,९७,१७८

या पिकांना विमा लागू खरीप हंगामात धान या पिकासाठी सर्व ४० महसूल मंडळे अधिसूचित आहेत. तसेच सोयाबीनसाठी भंडारा, मोहाडी, लाखांदूर व पवनी तालुक्यांतील २६ महसूल मंडळे अधिसूचित आहेत. धान व सोयाबीन पिकासाठी विमा लागू आहे. केंद्र शासनाने गेल्यावर्षीपासून प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत एक रुपयात विमा उतरण्याची सुविधा केली आहे. 

लाडकी बहीण' मुळे वाढली होती मुदत यंदा शासनाने पीक विमा काढण्यासाठी १५ जुलैपर्यंत मुदत दिली होती; परंतु याच कालावधीत मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण योजना सुरू झाली. पीक विमा काढण्यास अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे विमा काढण्याची मुदत शासनाने ३१ जुलैपर्यंत वाढवली होती.

शेतकऱ्यांत निराशेचे वातावरणदरवर्षी पीक विमा उतरवूनही नुकसान भरपाई मिळत नाही, अशी ओरड शेतकऱ्यांमध्ये आहे. यामुळे यावर्षी पीक विमा उतरविण्यासाठी शेतकरी तयार होत नव्हते. मागील वर्षी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना अद्यापही नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांत निराशेचे वातावरण दरवर्षी पाहावयास मिळते, हे विशेष. 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेतीFarmerशेतकरी