शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

जिल्ह्यात दमदार पावसाने भात पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. नर्सरीतील पऱ्हे पिवळे पडून वाळायला लागले होते. तर रोवणी झालेल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत होते. शेकडो हेक्टरवरील रोवणी उलटणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अशातच रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली.

ठळक मुद्देसरासरी ४३ मीमी पावसाची नोंद : भंडारा आणि साकोली तालुक्यात अतिवृष्टी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पावसाने दडी मारल्याने धोक्यात आलेल्या भात पिकाला रविवारी झालेल्या दमदार पावसाने जीवदान मिळाले आहे. २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४३.९ मिमी पावसाची नोंद झाली असून भंडारा आणि साकोलीत अतिवृष्टी झाली. अवघ्या दोन तासात भंडारा शहरात १०४ मिमी पाऊस तर साकोलीत ७०.८ मिमी पाऊस कोसळला.गत दहा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. नर्सरीतील पऱ्हे  पिवळे पडून वाळायला लागले होते. तर रोवणी झालेल्या शेतातील पीक वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसत होते. शेकडो हेक्टरवरील रोवणी उलटणार की काय, अशी शंका निर्माण झाली होती. अशातच रविवारी जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पावसाला सुरूवात झाली.भंडारा तालुक्यात १०४ मिमी पाऊस अवघ्या दोन तासात कोसळला. तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तालुक्याची वार्षिक सरासरी १२६०.८ असून १ जून ते ६ जुलैपर्यंत २७६.२ मिमी पाऊस अपेक्षित असतो. गतवर्षी याच कालावधीत ३३२.९ मिमी पावसाची नोंद झाली होती. यावर्षी या कालावधीत ४५०.८ मिमी म्हणजे १४३ टक्के पाऊस कोसळला. त्या खालोखाल साकोली तालुक्यात ७०.८ मिमी पावसाची नोंद झाली. तालुक्यात आतापर्यंत ३१४.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ११२ टक्के पाऊस झाला आहे. मोहाडी तालुक्यात गत २४ तासात २३ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २४८.७ मिमी म्हणजे सरासरीच्या ९० टक्के, तुमसर तालुक्यात २५.१ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २२३.२ मिमी म्हणजे सरासरीच्या ८१ टक्के, पवनी तालुक्यात ५.४ टक्के पाऊस कोसळला असून आतापर्यंत ३३३.९ मिमी, लाखांदूर तालुक्यात ३९.२ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत २८६.८ मिमी आणि लाखनी तालुक्यात ३९.८ मिमी पाऊस कोसळला असून आतापर्यंत ३८१ मिमी पावसाची नोंद झाली आहे.पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांच्या रोवण्या रखडल्या होत्या. सिंचनाची सोय असलेले शेतकरी रोवणीचे काम करीत होते. परंतु पाऊस आल्याशिवाय रोवणी करायची कशी, असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला होता. धान उत्पादक शेतकºयांनी शेतात पऱ्ह्यांची नर्सरी टाकली होती. पऱ्हे रोवणीयोग्य झाले होते. परंतु पाऊस नसल्याने पऱ्हे पिवळे पडून वाळायला लागले होते. अशा स्थितीत रविवारी झालेल्या पावसाने भात पिकाला जीवदान मिळाले आहे.भात पिकासाठी पावसाची मोठ्या प्रमाणात गरज आहे. दोन दिवसांपासून दमदार पाऊस पडत असल्याने शेतशिवारात रोवणीच्या कामाला वेग आला असून शेतकरी आणि मजुरांनी शेतशिवार गजबजून गेले आहे.प्रकल्पांमध्ये २७ टक्के जलसाठाजिल्ह्यातील मध्यम, लघु आणि माजी मालगुजरी तलावांमध्ये सध्या २७.८३ टक्के जलसाठा आहे. विशेष म्हणजे गतवर्षी याच कालावधीत केवळ १०.४२ टक्के जलसाठा होता. जिल्ह्यातील मध्यम प्रकल्प असलेल्या चांदपूर प्रकल्पात २०.१० टक्के, बघेडा प्रकल्पात ५५.६१ टक्के, बेटेकर बोदली प्रकल्पात २०.०७ टक्के पाणी साठा आहे. चार मध्यम प्रकल्पात ९.०६३ दलघमी जलसाठा असून तो २१.१६ टक्के आहे. जिल्ह्यातील ३१ लघुप्रकल्पात २९.५१ टक्के जलसाठा आहे. सर्वाधिक जलसाठा तुमसर तालुक्यातील डोंगरला प्रकल्पात ७६.२६ टक्के आहे तर २८ माजी मालगुजारी तलावात सद्यस्थिती ३५.२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षीच्या तुलनेत सद्यस्थितीत तीन पट जलसाठा आहे. त्यामुळे सिंचणासाठी उपलब्ध होण्यास आगामी काळात अडचण जाणार नाही.रविवारी झालेल्या दमदार पावसानंतर दुसऱ्या दिवशीही दुपारी ४ वाजताच्या सुमारास भंडारा शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. तब्बल तासभर पाऊस कोसळला. या पावसाने रस्ते निर्मनुष्य झाले होते. रात्री उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरुच होती. रविवारी झालेल्या पावसाने शहरातील अनेक सखल भागात पाणी शिरले होते. अनेकांच्या घरातही पाणी शिरल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :agricultureशेती