शहरं
Join us  
Trending Stories
1
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
2
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
3
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
4
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
5
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
6
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
7
House Arrest Ullu app: एजाज खानच्या अडचणी वाढल्या! 'हाउस अरेस्ट शो' प्रकरणात पोलिसांकडून पहिली अ‍ॅक्शन
8
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?
9
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
10
गोव्यातील लईराई जत्रोत्सवात चेंगराचेंगरी, CM प्रमोद सावंतांची प्रतिक्रिया; म्हणाले, “५० हजार लोक...”
11
रोज १२ तास मोबाईलवर गेम खेळायचा मुलगा; पाठीच्या कण्याचे वाजले तीन तेरा, परिस्थिती गंभीर
12
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईक कुठेही दिसला नाही, जर बॉम्ब पडला तर…"; काँग्रेस नेत्याने मागितले पुरावे
13
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
14
मुकेश अंबानींची 'ही' कंपनी IPO साठी करतेय तयारी, नफ्यासाठी रणनीतीमध्ये केला बदल
15
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
16
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
17
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
18
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
19
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
20
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?

जिल्ह्यात दमदार पाऊस; बळीराजा सुखावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:24 IST

उशिरा का असेना वरुण राजाची कृपा भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे.

ठळक मुद्देचार तालुक्यात अतिवृष्टी : सरासरी ६९ मि.मी. पावसाची नोंद, खोळंबलेल्या रोवणीला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : उशिरा का असेना वरुण राजाची कृपा भंडारा जिल्ह्यावर बरसली आहे. मागील २४ तासात जिल्ह्यात सरासरी ६९.३ मि.मी. पाऊस बरसला असून चार तालुक्यांमध्ये अतिवृष्टी झाली. यात लाखनी, लाखांदूर, तुमसर व मोहाडी तालुक्याचा समावेश आहे. काही ठिकाणी घरांची पडझड झाल्याचीही प्राथमिक माहिती आहे.आॅगस्ट महिन्याच्या दुसºया आठवड्याच्या शेवटी पावसाने हजेरी लावली होती. त्यानंतर पाऊस बेपत्ता झाला होता. दरम्यान दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पावसाने जिल्ह्यात दमदार एन्ट्री मारली. यात भंडारा तालुक्यात ४० मि.मी., मोहाडी ९२.४, तुमसर ७७.४, पवनी २७.२, साकोली ६२.८, लाखांदूर ९३.६, लाखनी तालुक्यात ९१.८ मि.मी. पाऊस बरसला.पावसाची कधी दीर्घ तर कधी कमी दिवसांच्या विश्रांतीमुळे धान रोवणीला खोळंबा होत होता. २५ आॅगस्ट पर्यंत जिल्ह्यात जवळपास फक्त ६० टक्के रोवणी झाली होती. मात्र मागील दोन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसांमुळे खोळंबलेल्या रोवणीला जोमात प्रारंभ झाला आहे. असे असले तरी पाऊस उशिरा बरसल्याने धान उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यताही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.सद्यस्थितीत पोषक वातावरणामुळेही धान पिकांवर रोगांचा प्रादूर्भाव दिसून येत आहे.पालांदूर परिसरातील धानपिक गर्भावस्थेत येत असल्याने अशा रिमझीम पावसाचा लाभ पिकाला होत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पावसाचा आधार राहू शकतो. दरवर्षीच्या तुलनेत काही ठिकाणी खोडकिडी व साधा करपाची लागण झाली असून फवारणी सुरु करण्यात आली आहे.नदी काठावरील गावांना सतर्कतेची सूचनापवनी : गोसेखुर्द धरणातील वाढलेली पाण्याची पातळी लक्षात घेऊन सायंकाळी ५.२० वाजता या धरणाचे एकूण ३३ पैकी २९ दरवाजे अर्धा मीटरने उघडण्यात आले आहेत. त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढलेला असून नदीकाठावरील गावातील नागरिकांना अतिदक्षतेचा ईशारा देण्यात आला असून सतर्कता बाळगण्याची अशी सूचना प्रशासनाने दिली आहे. धरणातील पाण्याची पातळी २४२ मीटर ईतकी असून ३०२० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आतापर्यंत ६०६.७० मि.मी. पाऊस झालेला असल्याने धरणातील जलसाठा वाढला आहे.संततधार पावसामुळे घर कोसळलेसासरा : सासरा येथे गेल्या दोन दिवसापासून पडत असलेल्या संततधार पावसाने येथील मोहन खर्डेकर यांचे राहते घर कोसळले. यात कोणत्याही प्रकारची प्राणहानी झालेली नाही. सदर कोसळलेल्या घरांचा पंचनामा करण्यासाठी पोलीस पाटील माणिक धांडे, ग्रामपंचायत सदस्य, शालीक खर्डेकर व अन्य पदाधिकारी घटनास्थळी आले. त्यांनी पडलेल्या प्रकाराची माहिती तलाठी खोब्रागडे यांना कळविली. घर कोसळण्याचा प्रकार संततधार पावसाने घडला असून यात मोहन खर्डेकर यांचे दोन लाखांचे जवळपास नुकसान झाले आहे. कोसळलेले घर मातीच्या भिंतीचे असून कौलारू छपराचे होते. घराला लागून गुरांचा गोठा होता. तोही या पावसाच्या फटक्याने कोसळला. घराचे छप्पर व भिंतीही कोसळल्या आहेत. सदर घर एका शेतकºयाचे आहे.