शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
4
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
5
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
6
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
7
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
8
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
9
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
10
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
11
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
12
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
13
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
14
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
15
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
16
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
17
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
18
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
19
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
20
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!

खाद्य पदार्थातील भेसळ आरोग्यासाठी घातक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 00:27 IST

ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे.

ठळक मुद्देअन्न पुरवठा विभागाची डोळेझाक, तेलातून होतेय भेसळ

भंडारा : सध्या सणासुदीचे दिवस सुरू आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात खाद्य सामग्री व तेलाची विक्री होते. या दिवसांत भेसळीला उधाण येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष नसून अन्न भेसळ विभागाचे अधिकारीसुध्दा याकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उपाहारगृहात स्वच्छतेचा अभाव दिसून येत असला तरी याकडे प्रशासन डोळेझाक करीत आहे.ठोक व्यापाऱ्यांकडून तर चिल्लर विके्रत्यांपर्यंत अगदी भेसळयुक्त खाद्य पदार्थ भेसळ होत असल्याने अनेकांना अंगावर पूरळ येणे तर काहींना अंगावर खाज सुटल्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. सणासुदीच्या दिवसांत तेलात पामोलीयन तेलाची भेसळ होत असल्याने थंडी पडताच तल गोठायला सुरुवात होते. भेसळीचा प्रकार उघडकीस येत आहे. काहींनी आता गोठणारे पामोलीयन तेल तूर्तास भेसळ करणे थांबविल्याचे सुध्दा सांगितले जाते.तांदूळ, साखर, डाळ, रवा, बेसन, पीठ, एवढेच नव्हेतर गव्हामध्येसुध्दा सर्रास भेसळ सुरू आहे. रेशनचा गहू खुल्या बाजारात विक्रीकरिता दिसायला लागला आहे. भेसळ करणारे कोट्यधीश झाले तर गोरगरीबांचे आरोग्य धोक्यात येत आहे. मात्र अन्न , भेसळ विभागाचे अधिकारीच मूग गिळून बसले आहे. एखाद्या दुकानात धाड टाकलीच तर शुध्द आणि नामांकित कंपनीच्या पुड्यातील तेल किंवा अन्नपदार्थ नमुनादाखल घेऊन प्रयोग शाळेकडे पाठविले जात आहे. यामळे हे नमुने कधी बदलले याबाबत ग्राहकांच्या लक्षात येतच नाही.केवळ खिसेभरू धोरण असल्याने गोरगरीबांच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार सर्रास सुरू आहे. यामुळे गरिबांच्या पैशातून वेतन घेणाºया निर्ढावलेल्या अधिकाऱ्यांना कोण आवळणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेकांना या अन्नभेसळीमुळे आजाराला आमंत्रण द्यावे लागत आहे. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन संबधित विभागाने धडक मोहिम राबविण्याची मागणी आहे.उपहारगृहात नियमांना तिलांजलीशहरासह जिल्ह्यातील उपहारगृहामध्ये हजारो ग्राहक नास्ता, जेवण घेतात. मात्र स्वच्छतेचा अभाव दिसून येतो. कामावरील मानसांचे आरोग्य तपासणी केल्या जात नाही. तर नियमांना तिलांजली देऊन उपाहारगृहाचे सर्रास व्यवसाय सुरु आहे. असे असतानाही प्रशासन मात्र दुर्लक्ष करुन वेळ मारुन नेत असल्याचा प्रकार सुरु आहे, असा सूर अनेकांनी व्यक्त केला.

टॅग्स :foodअन्न