शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पावसाचा कहर, हलका धान धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:29 IST

भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी नव्हे, ते यंदा धानाचे बंपर पीक हाती येण्याची अपेक्षा असताना पाऊस त्यावर पाणी फेरत आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पाऊस कोसळत असून, सोमवारपासून तर सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला हलका धान धोक्यात आला आहे. हाताशी आलेला घास निसर्ग हिरावून तर नेणार नाही ना, अशी धास्ती शेतकऱ्यांना आहे.भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. सोमवारपासून तर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात भंडारा १९.२ मिमी, मोहाडी २०.२ मिमी, तुमसर ३६.२ मिमी, पवनी २.६ मिमी, साकोली ३.२ मिमी, लाखांदूर १४.४ मिमी आणि लाखनी तालुक्यात २०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११७ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिमी असून, आतापर्यंत जिल्ह्यात १५९१.४ मिमी पाऊस कोसळला आहे.तीन दिवस येलो अलर्टहवामान खात्याने भंडारा जिल्ह्यासाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजतापासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. दुपारी ३ वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. जिल्ह्यातील साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडी, पवनी, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात हा पाऊस कोसळला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

बावनथडीचे चार तर गोसेचे दोन गेट उघडले

- जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने, प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. सध्या गोसेखुर्द प्रकल्पात ७१.६८ टक्के जलसाठा असून, या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्प १०० टक्के भरला असून, मंगळवारी चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले आहे. यासोबतच संजय सरोवरमध्ये ९६.१४ मिमी, पुजारीटोला प्रकल्पात ९३.४३ मिमी जलसाठा आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी