शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

पावसाचा कहर, हलका धान धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2022 22:29 IST

भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कधी नव्हे, ते यंदा धानाचे बंपर पीक हाती येण्याची अपेक्षा असताना पाऊस त्यावर पाणी फेरत आहे. गत आठवडाभरापासून जिल्ह्यात पाऊस कोसळत असून, सोमवारपासून तर सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे काढणीला आलेला हलका धान धोक्यात आला आहे. हाताशी आलेला घास निसर्ग हिरावून तर नेणार नाही ना, अशी धास्ती शेतकऱ्यांना आहे.भंडारा जिल्ह्यात सुरुवातीला यंदा समाधानकारक पाऊस कोसळला. या पावसाने धान पीक चांगले बहरून आले. सतत कोसळत असलेल्या पावसाने किडींचे प्रमाणही घटले. ओलितासाठी शेतकऱ्यांना प्रकल्पाच्या पाण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळही आली नाही. यंदा धानाचे अपेक्षेपेक्षा अधिक पीक होईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, निसर्गाने पुन्हा यावर पाणी फेरले. गत आठ दिवसांपासून जिल्ह्यात परतीचा पाऊस सुरू आहे. सोमवारपासून तर जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसत आहे. गत २४ तासांत जिल्ह्यात १६.६ मिमी पावसाची नोंद झाली. त्यात भंडारा १९.२ मिमी, मोहाडी २०.२ मिमी, तुमसर ३६.२ मिमी, पवनी २.६ मिमी, साकोली ३.२ मिमी, लाखांदूर १४.४ मिमी आणि लाखनी तालुक्यात २०.६ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या ११७ टक्के पाऊस कोसळला आहे. जिल्ह्याची वार्षिक सरासरी ११६४.७ मिमी असून, आतापर्यंत जिल्ह्यात १५९१.४ मिमी पाऊस कोसळला आहे.तीन दिवस येलो अलर्टहवामान खात्याने भंडारा जिल्ह्यासाठी ११ ते १३ ऑक्टोबर या तीन दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. मंगळवारी सकाळी ७.३० वाजतापासून जिल्ह्यात सर्वत्र जोरदार पाऊस बरसला. दुपारी ३ वाजेपर्यंत पाऊस कोसळत होता. जिल्ह्यातील साकोली, तुमसर, भंडारा, मोहाडी, पवनी, लाखांदूर आणि लाखनी तालुक्यात हा पाऊस कोसळला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले.

बावनथडीचे चार तर गोसेचे दोन गेट उघडले

- जिल्ह्यात सर्वत्र पाऊस कोसळत असल्याने, प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणात जलसाठा झाला आहे. सध्या गोसेखुर्द प्रकल्पात ७१.६८ टक्के जलसाठा असून, या प्रकल्पाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहे. बावनथडी प्रकल्प १०० टक्के भरला असून, मंगळवारी चार दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, तर गोंदिया जिल्ह्यातील धापेवाडा प्रकल्पाचे तीन दरवाजे उघडले आहे. यासोबतच संजय सरोवरमध्ये ९६.१४ मिमी, पुजारीटोला प्रकल्पात ९३.४३ मिमी जलसाठा आहे.

 

टॅग्स :RainपाऊसFarmerशेतकरी