शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सकारात्मक बदल घडविण्याचे ध्येय बाळगा

By admin | Updated: January 7, 2015 22:46 IST

ज्या व्यक्तीला ध्येय नाही तो चालत्या फिरत्या प्रेतासमान आहे. तो स्वत:करिता जगतो त्याच्या जगण्याला अर्थ नाही. तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन : समर्थ महाविद्यालयाचे सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे उद्घाटनलाखनी : ज्या व्यक्तीला ध्येय नाही तो चालत्या फिरत्या प्रेतासमान आहे. तो स्वत:करिता जगतो त्याच्या जगण्याला अर्थ नाही. तुम्ही किती वर्षे जगलात यापेक्षा तुम्ही कसे जगलात याला महत्व आहे. ध्येय म्हणजे डॉक्टर इंजिनिअर बनणे नव्हे तर समाजात सकारात्मक परिवर्तन घडविणे, हे आपले ध्येय असले पाहिजे, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.समर्थ महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सवी समारोहाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी खा.नाना पटोले होते. अतिथी म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, कुलगुरू डॉ.विनायक देशपांडे, प्र-कुलगुरू डॉ.मुरलीधर चांदेवार, प्रभू देशपांडे, आ. राजेश काशिवार, आ. चरण वाघमारे, आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, आ. संजय पुराम, आ. नागो गाणार, आ. अनिल सोले, तारिक कुरैशी, राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर, कार्यवाह न.ता. फरांडे मंचावर होते.तत्पूर्वी त्यांच्या हस्ते विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन करण्यात आले. एन.सी.सी. उपक्रमांची मानवंदना स्वीकारली. कार्यक्रमाची सुरुवात विद्यापीठगीत व राष्ट्र आराधनेने करण्यात आली. यावेळी ना. फडणवीस यांनी स्वामी विवेकानंदाचे मद्रास विद्यापीठातील भाषणाचा संदर्भ देऊन विद्यार्थ्यांना देशभक्तीचे धडे दिले. देशभक्त कोण तर सिमेवर लढणारा, राष्ट्रीय यज्ञात सहभागी होणारा हे खरे आहे. त्याही पलिकडे खरा देशभक्त कोण आहे, याचे तीन सोपान त्यांनी सांगितले. समाजाची विदारक समस्या बेकारी, अंधश्रद्धा, कुपोषण, भुखमरी बघून मन व्यथित मनाला वेदना होत असतील तर देशभक्तीचे पहिले सोपान आपण पार केले. अशी अवस्था बदलविण्याची जबाबदारी आपली आहे, असे विचार येणे हे दुसरे सोपान आहे. समाजातील दारिद्र्य, जातीव्यवस्था, विषमता बघुन मन द्रवित होत असेल आणि त्याकरीता कोणती योजना केली पाहिजे. आपल्या क्षमतेप्रमाणे काही ना काही काम केले पाहिजे, हे तिसरे सोपान असल्याचे त्यांनी सांगितले. स्वराज्य मिळाले सुराज्य, सुशासन निर्माण करणे महत्वाचे आहे. जनतेच्या भरवशावर सुराज्य निर्माण होते. योग्य समाजव्यवस्था व राज्यव्यवस्था सुराज्याकडे घेऊन जात असते. समाजाने व्यवस्था निर्माण केली. व्यवस्थेमुळे शिक्षण मिळाले, रोजगार मिळाले. आपण घेतच राहतो देत काहीच नाही, यामुळे संधी मिळेल तेवढे समाजासाठी देण्याची भावना रुजली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.यावेळी खा. पटोले म्हणाले, भंडारा जिल्ह्यात शैक्षणिक हब व्हावे, अशी मागणी केली. धान उत्पादक शेतकऱ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी वैद्यकीय महाविद्यालय अभियांत्रिकी महाविद्यालय आवश्यक आहे. कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज असून देशात दरवर्षी पाच लाख इंजिनिअर तयार होतात. त्यातील २५ हजारांना नोकरी मिळते. त्यामुळे रोजगाराभिमुख शिक्षण महत्वाचे आहे. समर्थ महाविद्यालयाच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शाल-श्रीफळ, मानपत्र व स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांच्या धरणीकंप या कवितासंग्रहाचे प्रकाशन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर यांनी बापूसाहेब लाखनीकर जन्मशताब्दी सोहळा साजरा केला जाणार असल्याचे सांगितले. समर्थ महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी गोपीचंद नवखरे यांनी १९७५ च्या आणीबाणीमध्ये सत्याग्रही म्हणून सहभागी झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. संजय पोहरकर यांनी केले. आभारप्रदर्शन उपप्राचार्य राम आर्विकर यांनी केले. (तालुका प्रतिनिधी)