शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

वन्यप्राण्यांसाठी सरसावले हात

By admin | Updated: May 31, 2017 00:41 IST

भीषण उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी मनुष्य तथा वन्यप्राणी वणवण भटकत आहे. चिखला गाव टेकड्यांच्या मध्यभागी वसला असून....

तलावात खड्डा खोदून पाणी पुरवठा : मॉयल प्रशासन व चिखला ग्रामस्थांचा पुढाकारमोहन भोयर । लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : भीषण उन्हाळ्यात घोटभर पाण्यासाठी मनुष्य तथा वन्यप्राणी वणवण भटकत आहे. चिखला गाव टेकड्यांच्या मध्यभागी वसला असून सातपुडा पर्वत रांगातील गावात पाणी समस्या कायम आहे. मंगळवारी पाण्याविना तलावाच्या गाळात फसून हरिणाचा तडफडून मृत्यू झाला. मॉयल प्रशासनासह चिखला ग्रामस्थांनी वन्यप्राण्यांकरिता तलावात खड्डा खोदून त्यात दररोज एक टँकर पाणी घालणे सुरू केले आहे. येथे वन्यप्राण्यांची तृष्णा भागविण्याकरिता मॉयल प्रशासनासह ग्रामस्थ सरसावले. वनविभागाचे मात्र दुर्लक्ष दिसत आहे.मागील तीन वर्षापासून सातपुडा पर्वत रांगातील अनेक गावात पाऊस कमी पडल्याची शासनदफ्तरी नोंद आहे. चिखला परिसरातील १५ ते २० गावातील तलाव, बोड्या कोरड्या पडल्या आहे. चिखला गावाजवळील सिंधी तलावात पाणी कधीच कमी होत नव्हते. सध्या ते पूर्णत: कोरडे पडले आहे. जंगलव्याप्त परिसरात तलाव असल्याने वन्यप्राणी येथे आपली तृष्णा भागविण्याकरिता येतात. एका आठवड्यापूर्वी सदर तलाव कोरडा पडला.मंगळवारी सकाळच्या सुमारास सिंधी तलावातील चिखलात एका हरणाचा तडफडून मृत्यू झाला. पाण्याच्या शोधात हे हरिण येथे आले होते. हृदय पिळवून टाकणारी ही घटना चिखला ग्रामस्थ तथा मॉयल प्रशासनाला कळली. अनेकांनी तलावाकडे धाव घेतली. नंतर तलावात खड्डा खोदून पाणी घालण्याची संकल्पना पुढे आली. चिखल्याचे सरपंच दिलीप सोनवाने तथा मॉयल प्रशासनाने येथे खड्डा खोदण्याची तयारी दर्शविली. याची माहिती तुमसरच्या उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, तहसीलदार बालपांडे, नायब तहसीलदार एन. पी. गौंड, मोहतुरे, स्थानिक तलाठी कदम यांच्या निर्देशानुसार तलावात खड्डा खोदत चिखल बाहेर काढण्याकरिता जेसीबी मशीन बोलाविण्यात आली. महसूल प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तलावाला भेट दिली.चिखला मॉईल प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी भट्टाचार्य, खाण प्रबंधक अमीन, रहांगडाले, चालक सार्वे, संजय मसराम पाण्याचा टँकर उपलब्ध करून दिला. मॉईल, महसूल, चिखला ग्रामस्थांनी येथे पुढाकार घेतल्याने त्यांचे कौतूक केले जात आहे. तर दुसरीकडे वनविभागाबद्दल ग्रामस्थांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. वनविभागाचे येथे दुर्लक्ष दिसत असून केवळ कागदोपत्री प्राणी सुरक्षित दाखविण्यात येत आहे.चिखला शिवारात दररोज वाघ, चिता, भालू, मोर, हरण, सांबर, चितळ, ससे, रानडुक्कर, माकडे तथा अन्य पक्षी येथे दररोज तृष्णा भागविण्याकरिता येतात. परंतु वनविभागाने तलाव कोरडा पडल्यानंतरही दखल घेतली नाही. नाकाडोंगरी वनपरिक्षेत्रात कृत्रिम पानवठे केवळ दोनच आहेत हे विशेष. ४० पेक्षा जास्त वनविभागाचे कर्मचारी येथे कार्यरत आहेत. जंगलासह प्राण्यांचे रक्षण करण्याची जबाबदारी वनविभागाची आहे. पाण्याविना वन्यप्राण्यांचा मृत्यूबद्दल त्यांना विचारणा करण्याची गरज आहे. केवळ कागदी कागदपत्रांपुरतीच वनविभाग आहे काय असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. वनविभागाच्या विरोधात रोष व्यक्त होत आहे.