शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तलाव स्वच्छतेसाठी सरसावले सामाजिक बांधिलकीचे हाथ

By admin | Updated: October 1, 2015 00:46 IST

श्रद्धा आणि मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन झाले असले तरी ज्याठिकाणी विसर्जन केले...

लोकमत शुभ वर्तमान : वरठीत स्वच्छतेचा ध्यासतथागत मेश्राम वरठीश्रद्धा आणि मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाचे विसर्जन झाले असले तरी ज्याठिकाणी विसर्जन केले त्याठिकाणी मूर्तीचे अवशेष पाण्यावर तरंगत होते. हा प्रकार लक्षात येताच विरेंद्र देशमुख, पुष्पा भुरे व बंडू निंबार्ते यांनी सामाजिक बांधिलकी जोपासत तलावातून ते बाहेर काढून स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. यापूर्वी विसर्जनाच्या पूर्वसंध्येला त्यांनी या तलावाची स्वच्छता केली होती. दहा दिवस अपार श्रद्धा मनात ठेवून बाप्पाच्या सेवेत तरुणाचे जत्थे कार्यरत दिसतात. ज्या भागात आगमन होते तिथे उत्सव आणि मनोभावे पूजा केली जाते. अनंत चतुर्दशीपासून विसर्जन सुरु होते. या दरम्यान ही बाप्पांप्रती असलेली श्रद्धा बाळगून असतात. विसर्जन करताना कंठ दाटून येतो. पण ज्याठिकाणी विसर्जन होते, त्याठिकाणी दुसऱ्या दिवशी कुणी ढुंकुनही पाहत नाही. श्रद्धेने पूजलेले दैवत आणि त्यासाठी वापरलेले साहित्य पाण्यात गटांगळ्या खाताना दिसतात. वरठीतही असे भयानक दृश्य होते. गावातील तिघांनी पुढाकार घेऊन तलाव स्वच्छ केले. हजारोंच्या दानातून विसर्जीत झालेल्या बाप्पाला गावात तीनच हात उपयोगाचे सापडले. वरठी येथे सार्वजनिक उत्सवादरम्यान सर्व मूर्तीचे विसर्जन रेल्वेच्या तलावात होते. सदर तलाव गावाच्या मध्यभागी आहे. रेल्वे विभागाच्या दुर्लक्षित धोरणाचा फटका गावकऱ्यांना बसत आहे. तलावात घाणच घाण पसरली आहे. या तलावात पाणी मोठ्या प्रमाणात असले तरी तलावातील घाण उपसा न झाल्यामुळे सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. नाईलाजास्तव गावकऱ्यांना मूर्तीचे विसर्जन या तलावात करावे लागते. अनंत चतुर्दशीपासून सुरु झालेले विसर्जन काल संपले. पण ज्याठिकाणी हे विसर्जन झाले त्या भागात विसर्जीत मूर्तीचा इतर भाग, हार व पुजेसाठी वापरलेले सर्व साहित्य पाण्यावर तरंगत होते. मूर्तीचे अवशेष पाण्यावर तरंगतांना पाहून ओबीसी सेवा संघाचे तालुकाध्यक्ष विरेंद्र देशमुख, पंचायत समिती सदस्य पुष्पा भुरे व गावात घरोघरी जावून ब्रेड विकणारे बंडू निंबार्ते यांनी तलावाची स्वच्छ करण्याची मोहीम हातात घेतली. यासाठी त्यांनी अनेकांना येण्याचे आवाहन केले. पण श्रद्धेने व्याकुळ, बाप्पांना निरोप देणारे आणि डी.जे.च्या तालात नाचणारे एकही यात सहभागी झाले नाही. परंतु ज्या श्रद्धेने बाप्पाचे पूजन होते त्याच श्रद्धेने सेवा करण्यासाठी तरुणाईसमोर आली पाहिजे.