शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
4
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
5
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
6
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
7
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
8
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
9
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
10
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
11
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
12
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
13
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
14
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
15
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
16
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
17
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
18
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
19
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
20
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवारने भूजल पातळीत अर्धा मीटर वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:29 IST

राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.

ठळक मुद्दे१८७ गावे जलपूर्ण : २०१ गावात चार हजार ३५६ कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८०.०३ मी.मी. आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत १०२५ मी.मी. पाऊस झाला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २५४.३३ मीमी म्हणजे १९८७ टक्के घट झाली. गत चार वर्षात साधारणत: २८ टक्के घट नोंदविण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्याच्या भुजलपातळीत वाढ झाल्याचे दिसून येते. भुजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्याची २५ पानलोट क्षेत्रात विभागणी केली आहे. पाणलोट क्षेत्रातील उताºयानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र तीन भागात रन आॅफ झोन रिजार्ज, स्टोरेज झोनमध्ये विभागणी करण्यात आली. अशा प्रत्येक झोनमध्ये ७४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये नोंद घेण्यात आली. या नोंदीवरून भुजल पातळीत ०.४० मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पाच वर्षाची भुजल सरासरी पातळी २.५२ मीटर आहे. सप्टेंबर महिन्यात २.४७ मीटर पातळी असून यात ०.५० मीटर पाणी पातळी वाढली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यात सरासरी शून्य ते एक मीटर भुजल पातळी वाढलेली आहे.ही किमया केवळ जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आला. २०१४ मध्ये भंडारा जिल्ह्याची भुजलपातळी २.८७ मीटर होती. आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सप्टेंबरमध्ये भुजल पातळी २.४७ मीटर झाली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, लाखांदूर या तालुक्यात सरासरी ०.५० मीटर पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेने तालुक्यात जलक्रांती केली असून दुष्काळावर मात करण्यास मदत होणार आहे.८१ हजार टीसीएम पाणीसाठाभंडारा जिल्ह्यात चार वर्षात २०१ गावामध्ये जलयुक्त शिवारांची चार हजार ३५४ कामे पूर्ण झाली. या कामांमुळे ८१ हजार ५३९ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून ३८ हजार ३३२ हेक्टर संरक्षीत सिंचन निर्माण झाले आहे. तर चार वर्षात १८७ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवारमुळे शेतकºयांना वेळेवर पाणी उपलब्ध होत आहे.