शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

जलयुक्त शिवारने भूजल पातळीत अर्धा मीटर वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2018 21:29 IST

राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.

ठळक मुद्दे१८७ गावे जलपूर्ण : २०१ गावात चार हजार ३५६ कामे पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी राबविलेल्या जलयुक्त शिवार अभियानाने भंडारा जिल्ह्यात जलक्रांती घडवून आणली. चार वर्षात सरासरीपेक्षा २८ टक्के पाऊस कमी होऊनही भूजलपातळीत मात्र अर्धा मीटरने वाढ झाली आहे. याचा फायदा शेतकऱ्यांना शाश्वत सिंचनासाठी होणार आहे.जिल्ह्याचे सरासरी पर्जन्यमान १२८०.०३ मी.मी. आहे. जून ते सप्टेंबर २०१८ या कालावधीत १०२५ मी.मी. पाऊस झाला. सामान्य पर्जन्यमानाच्या तुलनेत २५४.३३ मीमी म्हणजे १९८७ टक्के घट झाली. गत चार वर्षात साधारणत: २८ टक्के घट नोंदविण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्याच्या भुजलपातळीत वाढ झाल्याचे दिसून येते. भुजल सर्व्हेक्षण आणि विकास यंत्रणेने जिल्ह्याची २५ पानलोट क्षेत्रात विभागणी केली आहे. पाणलोट क्षेत्रातील उताºयानुसार प्रत्येक पाणलोट क्षेत्र तीन भागात रन आॅफ झोन रिजार्ज, स्टोरेज झोनमध्ये विभागणी करण्यात आली. अशा प्रत्येक झोनमध्ये ७४ निरीक्षण विहिरी निश्चित करण्यात आल्या. सदर निरीक्षण विहिरींची सप्टेंबर २०१८ मध्ये नोंद घेण्यात आली. या नोंदीवरून भुजल पातळीत ०.४० मीटर वाढ झाल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पाच वर्षाची भुजल सरासरी पातळी २.५२ मीटर आहे. सप्टेंबर महिन्यात २.४७ मीटर पातळी असून यात ०.५० मीटर पाणी पातळी वाढली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी या तालुक्यात सरासरी शून्य ते एक मीटर भुजल पातळी वाढलेली आहे.ही किमया केवळ जलयुक्त शिवार योजनेमुळे साधता आला. २०१४ मध्ये भंडारा जिल्ह्याची भुजलपातळी २.८७ मीटर होती. आता जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सप्टेंबरमध्ये भुजल पातळी २.४७ मीटर झाली आहे. भंडारा, मोहाडी, तुमसर, लाखनी, पवनी, लाखांदूर या तालुक्यात सरासरी ०.५० मीटर पातळीत वाढ झाली आहे. जलयुक्त शिवार योजनेने तालुक्यात जलक्रांती केली असून दुष्काळावर मात करण्यास मदत होणार आहे.८१ हजार टीसीएम पाणीसाठाभंडारा जिल्ह्यात चार वर्षात २०१ गावामध्ये जलयुक्त शिवारांची चार हजार ३५४ कामे पूर्ण झाली. या कामांमुळे ८१ हजार ५३९ टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला आहे. यातून ३८ हजार ३३२ हेक्टर संरक्षीत सिंचन निर्माण झाले आहे. तर चार वर्षात १८७ गावे जलपरिपूर्ण झाली आहे. जलयुक्त शिवारमुळे शेतकºयांना वेळेवर पाणी उपलब्ध होत आहे.