शहरं
Join us  
Trending Stories
1
१३ चेंडूंत चोपल्या ६४ धावा! 'Virat' पराक्रम करताना चौकार-षटकारांचा पाऊस, थोडक्यात हुकले शतक
2
Air India च्या कर्मचाऱ्यांचा संप मागे; हकालपट्टी झालेल्या 25 कर्मचाऱ्यांना कामावर परत घेणार...
3
मतदान झालं, बारामतीत लीड कोणाला?; सुनेत्रा पवारांच्या विजयाबद्दल अजित पवार म्हणाले...
4
शिवसेना नेते सुरेशदादा जैन यांचा उद्धवसेनेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
5
"खलिस्तानवर नियंत्रण ठेवण्याची गरज", ब्रिटनच्या NSA सोबत अजित डोवालांची चर्चा
6
ही निवडणूक राहुल गांधी vs नरेंद्र मोदी अन् जिहाद विरुद्ध...; अमित शाह यांचा मोठा हल्ला
7
PBKS vs RCB सामन्यात गारांचा पाऊस! सामना झालाच नाही तर कोण होईल 'गार'? चाहत्यांची वाढलीय चिंता
8
फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट, 8 ठार, 3 गंभीर; शिवकाशीत भीषण दुर्घटना
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ७०० महिलांनी तक्रार केलीय का? NCW ने सांगितलं यामागील सत्य...
10
"अदानी, अंबानींची चौकशी करा; सत्य बाहेर येईल"; पंतप्रधान मोदींच्या टीकेवर काँग्रेसकडून पलटवार
11
धक्कादायक! चार दिवसांत दोन मातांनी गमावले प्राण, अहेरीत आरोग्यसेवेचा बोजवारा
12
तुफान राडा अन् लाथा-बुक्क्यांची जुगलबंदी! बसच्या दरवाज्यात दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी (Video)
13
अब की बार, मतदान जोरदार!... कोल्हापुरातील वाढलेला टक्का कुणाला देणार धक्का? 
14
महिला डॉक्टरचा पाठलाग अन् सातत्याने मिस कॉल; आरोपीला ठोकल्या बेड्या
15
श्रीलंकेने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी वनिंदू हसरंगाच्या नेतृत्त्वाखाली तगडा संघ उतरवला; CSK, MI ला दिला धक्का 
16
'12th Fail' फेम विक्रांत मेसीने टॅक्सी ड्रायव्हरला केली शिवीगाळ? अभिनेत्यावर गंभीर आरोप, व्हिडिओ व्हायरल
17
मोठी बातमी : एक चूक काय झाली, LSG च्या मालकांनी लोकेश राहुलच्या हकालपट्टीची तयारी सुरू केली
18
"निवडणूक प्रचार हा मूलभूत अधिकार नाही", केजरीवाल यांच्या जामीन अर्जाला ईडीचा विरोध
19
विराट कोहलीला पंजाबविरूद्धच्या सामन्यात मोठ्या विक्रमाची संधी; ठरू शकतो पहिलाच भारतीय!
20
अखेर एअर इंडियाचा संप मिटला, हकालपट्टी झालेल्या २५ कर्मचाऱ्यांनाही परत कामावर घेतले

गारपीटग्रस्त शेतकऱ्यांना हवी तातडीने मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:35 AM

भंडारा : गत पाच दिवसात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरोना ...

भंडारा : गत पाच दिवसात जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीपिकांचे प्रचंड नुकसान झाले. या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोरोना संकटात दिलासा देण्यासाठी मदतीची अपेक्षा आहे. प्रशासनाने सर्वेक्षण सुरु केले असले तरी तत्काळ मदत देण्याची गरज आहे.

जिल्ह्यातील लाखनी, साकोली, मोहाडी, भंडारा, तुमसर आदी तालुक्यांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. हाताशी आलेला धान यात उद्ध्वस्त झाला. भाजीपाला पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. आधीच शेतकरी कोरोनामुळे आर्थिक अडचणीत आले आहेत. अशा स्थितीत प्रशासकीय यंत्रणेने तत्काळ मदत देण्याची गरज आहे. त्यासाठी तातडीने सर्वेक्षण करुन अवकाळी पाऊस आणि गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देणे गरजेचे आहे. यासोबतच वादळात अनेकांच्या घरावरील छप्पर उडाले. लाखनी, लाखांदूर तालुक्याला मोठा तडाखा बसला आहे. या नुकसानग्रस्त कुटुंबांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र सध्या प्रशासन कोरोना संसर्ग निर्मूलनासाठी उपाययोजना करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे मदत केव्हा मिळेल असा प्रश्न आहे.