शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 22:16 IST

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या लाखांदूर तालुक्यातूनच सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू झाली आहे. आपल्या देशात विवाह सोहळ्यांकरीता लाखो रूपयांची उधळण केली जात आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : मोहरणा येथे सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या लाखांदूर तालुक्यातूनच सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू झाली आहे. आपल्या देशात विवाह सोहळ्यांकरीता लाखो रूपयांची उधळण केली जात आहे. त्यामुळेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतून सामूहिक विवाह सोहळ्याची संकल्पना मांडली. त्यांच्या विचारांशी एकरूप होऊन मागील १२ वर्षांपासून आपण विवाह सोहळ्याचे आयोजन करत आहोत. आर्थिक व सामाजिक विषमता संपविण्यासाठी सामूहिक विवाह सोहळा काळाची गरज आहे, असे प्रतिपादन माजी खासदार तथा काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी केले.मोहरना येथे सर्वधर्मिय सामूहिक विवाह सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. ओबिसी संग्राम परिषद व छावा संग्राम परिषद तथा नाना पटोले मित्र परीवार यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारला आयोजित सामूहिक विवाह सोहळ्यात २१ जोडपी विवाहबद्ध झाली. यात १५ जोडपी हिंदुधर्मीय, तर ६ जोडपी बौद्ध धर्मीय होती. जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर पाच हजार वऱ्हाड्यांच्या उपस्थितीत वधू-वरांना आशीर्वाद देण्यात आले.सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी माजी खासदार नाना पटोले होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य मनोहर राऊत, प्रदीप बुराडे, प्रणाली ठाकरे, शुद्धमता नंदागवळी, सरपंच प्रभाकर मेंढे, उपसरपंच बबन नागोसे, राँका जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे, काँग्रेस तालुकाध्यक्ष भुमेश्वर महावाडे, भागवत नाकाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वामन बेदरे, मनोज मेश्राम, संजय कोरे, पं.स. उपसभापती शिवाजी देशकर, रमेश भैय्या, प्रा.पि.एम. ठाकरे, न.पं. गटनेता रामचंद्र राऊत, पं.स. सदस्य वासुदेव तोंडरे, ईश्वर घोरमडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाष राऊत, ताराचंद मातेरे, नगरसेवक निकेश दिवटे, तुलशिदास खरकाटे, अभियंता रमेश भेंडारकर, भाजपा उपाध्यक्ष विजय खरकाटे, निशांद लांजेवार, भाजपा महामंत्री पप्पु मातेरे, उत्तम भागडकर आदी उपस्थित होते.पटोले म्हणाले, समाजात पुरूष व महिला यांना समान हक्क देणे गरजेचे आहे. समाजात बलात्कारासारखा दुर्देवी व निंदनीय घटना घडत आहेत. त्यासाठी चांगले विचार व सकारात्मक दृष्टीकोन ठेवणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावेळी बंडूभाऊ सावरबांधे यांनी युवकांना रोजगार नसल्याने प्रचंड बरोजगारी वाढल्याचे सांगून सामूहिक विवाह सोहळा आदर्श व स्तुत्य उपक्रम असल्याचे सांगितले.जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी मुलींचा जन्मदर कमी झाल्याने मुलांना मुली मिळत नाहीत. त्यासाठी मुलीकडे सकारात्मक दृष्टीकोणाने पाहून स्त्री-भ्रूणहत्या थांबवावी. यावेळी जि.प.अध्यक्ष रमेश डोंगरे, माजी आमदार सेवक वाघाये, राँका जिल्हाध्यक्ष मधुकर कुकडे यांनी समयोचित मार्गदर्शन केले.प्रारंभी बौद्ध धर्माच्या रितीप्रमाणे सहा जोडप्यांचे लग्न, त्यानंतर १५ हिंदू जोडप्यांचे लग्न यावेळी लावून देण्यात आले. छावा संग्राम परिषद व नाना पटोले मित्र परीवाराच्यावतीने वर-वधुंना एलईडी भेट देण्यात आली. त्यानंतर नाना पटोले यांनी २१ जोडप्यांचे पालकत्व स्विकारून कन्यादान केले. या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्या प्रत्येक वऱ्हाडी मंडळींसाठी जेवण व पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.संचालन यशवंत नखाते यांनी केले. प्रास्ताविक नाना पिलारे यांनी केले. आभार रामचंद्र राऊत यांनी मानले. कार्यक्रमाकरिता सुभाष खिलवानी, राजु पालिवाल, मधुकर भोयर, प्रभाकर राऊत, विलास पिलारे, बबलु राऊत, मंगेश राऊत, मेहबुब पठान, फिरोज छवारे यांनी सहकार्य केले. यावेळी हजारो वऱ्हाडी सोहळ्यात सहभागी झाले होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले