शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

दोन मीटरने घटली भूजल पातळी

By admin | Updated: November 7, 2015 00:23 IST

भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी सरासरीच्या सुमारे दोन मीटरने घटली असल्याचे दिसून आले आहे.

पावसाळ्यात ८० टक्केच पाऊस : ४३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईचे संकेतलोकमत विशेषइंद्रपाल कटकवार  भंडाराभूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी सरासरीच्या सुमारे दोन मीटरने घटली असल्याचे दिसून आले आहे. सरासरीपेक्षा पावसाची कमी हजेरी तसेच पाण्याचा सतत होणारा उपसा, त्यामुळे भूजलात आणखी घट होऊन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने वेळीच पाऊल उचलने महत्वाच आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या जवळपास केवळ ८० टक्के पाऊस बरसला. मुसळधार पावसामुळे आलेला पाणी नदी, नाल्याव्दारे वाहून गेला. मात्र भूगर्भात कमी प्रमाणात पाणी झिरपले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गासह नागरिकांनी विंधन विहीर, विहीर आदींच्या माध्यमातून भूगभार्तील पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली. इंजीन लावून नाले, बोड्या पूर्णपणे आटविण्याचा प्रकारही करण्यात आला. मान्सुन काळात झळ न बरसल्याने भूजलात पाणी झिरपण्याचे प्रमाणही कमी झाले. परिणामी यानंतरही भूजलाच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने तीन महिन्यातून एकदा भूजलाचे सर्वेक्षण करून भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजल पातळी तपासण्यासाठी जिल्हाभरातील ७४ विहिरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० विहिरींच्या भूजल पातळीत घट तर ४४ विहिरींच्या भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळी २.०२ मिटरने घटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सप्टेंबर २०१५ मध्ये भूजल पातळी सरासरी १.५७ मीटर इतकी आहे.मागील पाच वर्षात सरासरी भूजल पातळी २.०२ तर यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील भूजल पातळी मात्र १.५७ असल्याने यात ०.४६ टक्के घट झाल्याचे आढळते. कमी पावसामुळे जलसिंचनासाठी पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे भूजलात आणखी घट होऊन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्यावतीने जलसंधारणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शासनाचे शेकडो कोटी रुपए खर्च करण्यात येत आहेत. मात्र यानंतरही भूजलाची पातळी वाढण्याऐवजी दरवर्षी घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलसंधारणाचे शेकडो कोटी रुपए जातात कुठे, असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या कमी आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानही चांगले आहे. त्यामुळे भूजलाची पातळी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक असली तरी घटत चाललेली भूजल पातळी चिंता वाढविणारी आहे. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही, याकरिता संबंधित यंत्रणा कामात लागली आहे. पाऊस कमी व पाण्याचा सतत उपसा यामुळे भूजल पातळीत घट होण्याची प्रमुख करणे सर्वेक्षणात आढळून आली. पाण्याचा वापर जपून करणे महत्वाचे आहे.- पी. आर. साल्पेकर,भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण भंडारा.