शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत अजित पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली डरकाळी; ३७ उमेदवारांची यादी जाहीर!
2
INDW vs SLW: Smriti Mandhana चा ऐतिहासिक पराक्रम! Team India ची लेक बनली '१० हजारी' मनसबदार
3
VIDEO: बांगलादेशात आणखी एका हिंदूची हत्या; घरात कोंडून जाळले, अमित मालवीयंचा दावा...
4
Chhatrapati Sambhajinagar: छ. संभाजीनगरमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर; १८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
5
मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीसाठी महायुतीबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा- प्रताप सरनाईक
6
Amit Shah: "राहुल बाबा, इतक्यात थकू नका! अजून बंगाल- तामिळनाडूतही पराभव बघायचा आहे" अमित शहांचा टोला
7
रीलची हौस महागात! Video बनवण्याच्या नादात सत्यानाश; गॅस सुरू, किचनच्या ओट्यावर चढली अन्...
8
दिग्विजय सिंह यांच्या 'त्या' पोस्टमुळे काँग्रेस खासदार संतापले; RSS ची थेट अल-कायदाशी केली तुलना
9
'शरद पवार माझे मार्गदर्शक..' गौतम अदानींकडून बारामतीत पवारांच्या कार्याचे भरभरून कौतुक
10
PMC Elections : अदानी बारामतीत, मंचावर बसलेल्या साहेब अन् दादांची चर्चा..! एकत्र येण्याच्या चर्चांना पुन्हा बळ
11
Mumbai: तरुणींना अर्ध्या रस्त्यातच उतरवलं आणि...; वाद्र्यांत रिक्षाचालकाचं लज्जास्पद कृत्य!
12
भारतीय आजारी असण्याला आई-वडील जबाबदार, डॉक्टरांचं विधान; तुम्हीच ठरवा कोण बरोबर?
13
गौतम गंभीरमुळे टीम इंडियाच्या ड्रेसिंग रूममध्ये भीतीचे वातावरण? खेळाडू तणावात असल्याची चर्चा
14
भयानक! गहू साफ करायला सांगताच सून भडकली, सासूवर वीट फेकली; पतीवरही जीवघेणा हल्ला
15
IAS प्रेमकथा: IIT मधून शिकलेला IAS नवरदेव अन् IRS अधिकारी वधू; कोण आहेत विकास आणि प्रिया?
16
संरक्षण क्षेत्रात अदानी समूहाचा मोठा डाव! १.८ लाख कोटींची गुंतवणूक करणार; काय आहे मेगा प्लॅन?
17
"काँग्रेसकडे सत्ता नसली, तरीही आमचा पाठीचा कणा अजून ताठ आहे," मल्लिकार्जुन खरगेंची टीका
18
Giriraj Singh : "ममता बॅनर्जींनी बांगलादेशात जाऊन पंतप्रधान व्हावं"; घुसखोरांवरुन गिरिराज सिंह यांचा खोचक टोला
19
Mehbooba Mufti: "गांधी- नेहरूंचा हिंदुस्थान आता 'लिंचिस्तान' झालाय!", मेहबूबा मुफ्तींचा केंद्र सरकारवर प्रहार
20
जेवण आणि झोप यामध्ये नेमकं किती अंतर असावं? निरोगी आयुष्यासाठी पाळा 'हा' सोपा नियम
Daily Top 2Weekly Top 5

दोन मीटरने घटली भूजल पातळी

By admin | Updated: November 7, 2015 00:23 IST

भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी सरासरीच्या सुमारे दोन मीटरने घटली असल्याचे दिसून आले आहे.

पावसाळ्यात ८० टक्केच पाऊस : ४३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईचे संकेतलोकमत विशेषइंद्रपाल कटकवार  भंडाराभूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने जिल्हाभरात करण्यात आलेल्या पाहणीदरम्यान पाच वर्षांच्या तुलनेत भूजल पातळी सरासरीच्या सुमारे दोन मीटरने घटली असल्याचे दिसून आले आहे. सरासरीपेक्षा पावसाची कमी हजेरी तसेच पाण्याचा सतत होणारा उपसा, त्यामुळे भूजलात आणखी घट होऊन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकरिता जिल्हा प्रशासनाने वेळीच पाऊल उचलने महत्वाच आहे.यावर्षीच्या पावसाळ्यात सरासरीच्या जवळपास केवळ ८० टक्के पाऊस बरसला. मुसळधार पावसामुळे आलेला पाणी नदी, नाल्याव्दारे वाहून गेला. मात्र भूगर्भात कमी प्रमाणात पाणी झिरपले. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्गासह नागरिकांनी विंधन विहीर, विहीर आदींच्या माध्यमातून भूगभार्तील पाण्याचा उपसा करण्यास सुरुवात केली. इंजीन लावून नाले, बोड्या पूर्णपणे आटविण्याचा प्रकारही करण्यात आला. मान्सुन काळात झळ न बरसल्याने भूजलात पाणी झिरपण्याचे प्रमाणही कमी झाले. परिणामी यानंतरही भूजलाच्या पातळीत आणखी घट होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा भूजल सर्वेक्षण विभागाच्या मार्फतीने तीन महिन्यातून एकदा भूजलाचे सर्वेक्षण करून भूजल पातळीचा अभ्यास केला जातो. भूजल पातळी तपासण्यासाठी जिल्हाभरातील ७४ विहिरींची तपासणी करण्यात आली. यामध्ये २० विहिरींच्या भूजल पातळीत घट तर ४४ विहिरींच्या भूजल पातळीत वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. मागील पाच वर्षाच्या सरासरीच्या तुलनेत भूजल पातळी २.०२ मिटरने घटली असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र सप्टेंबर २०१५ मध्ये भूजल पातळी सरासरी १.५७ मीटर इतकी आहे.मागील पाच वर्षात सरासरी भूजल पातळी २.०२ तर यावर्षीच्या सप्टेंबर महिन्यातील भूजल पातळी मात्र १.५७ असल्याने यात ०.४६ टक्के घट झाल्याचे आढळते. कमी पावसामुळे जलसिंचनासाठी पाण्याचा उपसा वाढला आहे. त्यामुळे भूजलात आणखी घट होऊन उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्यावतीने जलसंधारणासाठी अनेक योजना राबविण्यात येत आहेत. त्यासाठी शासनाचे शेकडो कोटी रुपए खर्च करण्यात येत आहेत. मात्र यानंतरही भूजलाची पातळी वाढण्याऐवजी दरवर्षी घटत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलसंधारणाचे शेकडो कोटी रुपए जातात कुठे, असाही प्रश्न उपस्थित केल्या जात आहे. जिल्ह्यात विंधन विहिरींची संख्या कमी आहे. त्याचबरोबर पर्जन्यमानही चांगले आहे. त्यामुळे भूजलाची पातळी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत समाधानकारक असली तरी घटत चाललेली भूजल पातळी चिंता वाढविणारी आहे. यासाठी वेळीच उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. भविष्यात पाणीटंचाई भासणार नाही, याकरिता संबंधित यंत्रणा कामात लागली आहे. पाऊस कमी व पाण्याचा सतत उपसा यामुळे भूजल पातळीत घट होण्याची प्रमुख करणे सर्वेक्षणात आढळून आली. पाण्याचा वापर जपून करणे महत्वाचे आहे.- पी. आर. साल्पेकर,भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण भंडारा.