शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:57 IST

सुरुवातीपासूनच रोगराईचे सावट, मालाला भाव नाही : ४० रुपये किलो दराने हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री

मंगेश सेलोकरलोकमत न्यूज नेटवर्कधुसाळा (कांद्री): जिल्ह्यात मिरचीचे पीक घेतले जाते. यावर्षी मिरचीचे पीक उत्तम होऊन चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले आहे.

जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून मिरचीचे पीक घेतले जाते. धान कापणीनंतर काही शेतकरी उन्हाळी पीक म्हणून हिरव्या मिरचीची लागवड करतात. मिरची उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या किमतीत फार मोठी घसरण झाली होती. सात ते आठ रुपये प्रतिकिलो या भावाने शेतकऱ्याला मिरची विकावी लागली. परिणामी, मिरची तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरीसुद्धा शेतकऱ्याला खिशातून द्यावे लागले. येत्या दिवसात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती; पण मिरचीचे भाव अजूनही वाढले नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाचा चिंतेत सापडला आहे.

धानाच्या शेतीपेक्षा मिरचीच्या शेतीला खर्च आणि मेहनत जास्त लागते. यंदा सुरुवातीपासूनच मिरचीच्या बागाला रोगराईने घेरले होते. दिवाळीनंतर अनेकदा वातावरणाच्या अदलाबदलीमुळे हलक्या पावसाचा मिरची पिकाला चांगलाच फटका बसला. रासायनिक फवारण्या करून बागांना सावरता आले नाही.

कुटुंबाप्रमाणे जपावे लागते पिकालामिरची झाडाची दर दिवस पाहणी करावी लागते. एखाद्या झाडाला रोग दिसल्यास रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. एका फवारणी परिणाम न झाल्यास त्यावर पुन्हा जास्त किमतीचे औषध फवारले जातात. आठवड्यातून दोनदा पाणी, रासायनिक खते, वारंवार फवारण्या शेतकऱ्यांना कराव्या लागतात.

चांगला भाव मिळेना, शेतकरी चिंतेतहिव्या मिरचीला व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतीचा भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्याची बोळवण होत आहे. चांगल्या भावाची आशा असताना पुन्हा मिरचीने शेतकऱ्यांना रडविलं, असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.

तीन वर्षांपासून उत्पादन व दराची घसरण कायमदरवर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. पण, मागील दोन-तीन वर्षांपासून मिरचीच्या उत्पादनात आणि भावात खूप मोठी घट बघायला मिळते. शेतकऱ्यांनी लावलेला खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. खर्च जास्त, उत्पादन कमी अशी अवस्था आहे. बागायती जागा कमी करून पुन्हा धनाची शेती करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत.

"वातावरणाच्या बदलीमुळे बागावर रोगराईचे सावट पसरले आहे. लाखो रुपयांच्या औषधांचा फवारण्या केल्या, पण पाहिजे तेवढा उत्पन्न मिळाला नाही. अल्प भावामुळे मिरची बागांना लावलेला खर्चही निघेनासा झाला आहे. खर्चाचे बजेट वाढत असून, कर्जाचे ओझे कायम आहे."- गुरुदेव सेलोकर, शेतकरी, धुसाळा.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती