शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:57 IST

सुरुवातीपासूनच रोगराईचे सावट, मालाला भाव नाही : ४० रुपये किलो दराने हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री

मंगेश सेलोकरलोकमत न्यूज नेटवर्कधुसाळा (कांद्री): जिल्ह्यात मिरचीचे पीक घेतले जाते. यावर्षी मिरचीचे पीक उत्तम होऊन चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले आहे.

जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून मिरचीचे पीक घेतले जाते. धान कापणीनंतर काही शेतकरी उन्हाळी पीक म्हणून हिरव्या मिरचीची लागवड करतात. मिरची उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या किमतीत फार मोठी घसरण झाली होती. सात ते आठ रुपये प्रतिकिलो या भावाने शेतकऱ्याला मिरची विकावी लागली. परिणामी, मिरची तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरीसुद्धा शेतकऱ्याला खिशातून द्यावे लागले. येत्या दिवसात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती; पण मिरचीचे भाव अजूनही वाढले नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाचा चिंतेत सापडला आहे.

धानाच्या शेतीपेक्षा मिरचीच्या शेतीला खर्च आणि मेहनत जास्त लागते. यंदा सुरुवातीपासूनच मिरचीच्या बागाला रोगराईने घेरले होते. दिवाळीनंतर अनेकदा वातावरणाच्या अदलाबदलीमुळे हलक्या पावसाचा मिरची पिकाला चांगलाच फटका बसला. रासायनिक फवारण्या करून बागांना सावरता आले नाही.

कुटुंबाप्रमाणे जपावे लागते पिकालामिरची झाडाची दर दिवस पाहणी करावी लागते. एखाद्या झाडाला रोग दिसल्यास रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. एका फवारणी परिणाम न झाल्यास त्यावर पुन्हा जास्त किमतीचे औषध फवारले जातात. आठवड्यातून दोनदा पाणी, रासायनिक खते, वारंवार फवारण्या शेतकऱ्यांना कराव्या लागतात.

चांगला भाव मिळेना, शेतकरी चिंतेतहिव्या मिरचीला व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतीचा भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्याची बोळवण होत आहे. चांगल्या भावाची आशा असताना पुन्हा मिरचीने शेतकऱ्यांना रडविलं, असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.

तीन वर्षांपासून उत्पादन व दराची घसरण कायमदरवर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. पण, मागील दोन-तीन वर्षांपासून मिरचीच्या उत्पादनात आणि भावात खूप मोठी घट बघायला मिळते. शेतकऱ्यांनी लावलेला खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. खर्च जास्त, उत्पादन कमी अशी अवस्था आहे. बागायती जागा कमी करून पुन्हा धनाची शेती करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत.

"वातावरणाच्या बदलीमुळे बागावर रोगराईचे सावट पसरले आहे. लाखो रुपयांच्या औषधांचा फवारण्या केल्या, पण पाहिजे तेवढा उत्पन्न मिळाला नाही. अल्प भावामुळे मिरची बागांना लावलेला खर्चही निघेनासा झाला आहे. खर्चाचे बजेट वाढत असून, कर्जाचे ओझे कायम आहे."- गुरुदेव सेलोकर, शेतकरी, धुसाळा.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती