शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले !

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 14:57 IST

सुरुवातीपासूनच रोगराईचे सावट, मालाला भाव नाही : ४० रुपये किलो दराने हिरव्या मिरचीची किरकोळ विक्री

मंगेश सेलोकरलोकमत न्यूज नेटवर्कधुसाळा (कांद्री): जिल्ह्यात मिरचीचे पीक घेतले जाते. यावर्षी मिरचीचे पीक उत्तम होऊन चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. पण, मिरची उत्पादक शेतकऱ्यांना यंदाही हिरव्या मिरचीने रडविले आहे.

जिल्ह्यात शेतीला जोडधंदा म्हणून मिरचीचे पीक घेतले जाते. धान कापणीनंतर काही शेतकरी उन्हाळी पीक म्हणून हिरव्या मिरचीची लागवड करतात. मिरची उत्पन्नातून कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हिरव्या मिरचीच्या किमतीत फार मोठी घसरण झाली होती. सात ते आठ रुपये प्रतिकिलो या भावाने शेतकऱ्याला मिरची विकावी लागली. परिणामी, मिरची तोडणाऱ्या मजुरांच्या मजुरीसुद्धा शेतकऱ्याला खिशातून द्यावे लागले. येत्या दिवसात चांगला भाव मिळेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती; पण मिरचीचे भाव अजूनही वाढले नसल्याने शेतकरी वर्ग चांगलाचा चिंतेत सापडला आहे.

धानाच्या शेतीपेक्षा मिरचीच्या शेतीला खर्च आणि मेहनत जास्त लागते. यंदा सुरुवातीपासूनच मिरचीच्या बागाला रोगराईने घेरले होते. दिवाळीनंतर अनेकदा वातावरणाच्या अदलाबदलीमुळे हलक्या पावसाचा मिरची पिकाला चांगलाच फटका बसला. रासायनिक फवारण्या करून बागांना सावरता आले नाही.

कुटुंबाप्रमाणे जपावे लागते पिकालामिरची झाडाची दर दिवस पाहणी करावी लागते. एखाद्या झाडाला रोग दिसल्यास रासायनिक औषधांची फवारणी करावी लागते. एका फवारणी परिणाम न झाल्यास त्यावर पुन्हा जास्त किमतीचे औषध फवारले जातात. आठवड्यातून दोनदा पाणी, रासायनिक खते, वारंवार फवारण्या शेतकऱ्यांना कराव्या लागतात.

चांगला भाव मिळेना, शेतकरी चिंतेतहिव्या मिरचीला व्यापाऱ्यांकडून उत्तम प्रतीचा भाव मिळत नसल्याने जिल्ह्यातील शेतकरी चिंताग्रस्त आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही शेतकऱ्याची बोळवण होत आहे. चांगल्या भावाची आशा असताना पुन्हा मिरचीने शेतकऱ्यांना रडविलं, असे चित्र संपूर्ण जिल्ह्यात आहे.

तीन वर्षांपासून उत्पादन व दराची घसरण कायमदरवर्षी मिरची लागवडीचे क्षेत्र वाढत आहे. पण, मागील दोन-तीन वर्षांपासून मिरचीच्या उत्पादनात आणि भावात खूप मोठी घट बघायला मिळते. शेतकऱ्यांनी लावलेला खर्चसुद्धा निघेनासा झाला आहे. खर्च जास्त, उत्पादन कमी अशी अवस्था आहे. बागायती जागा कमी करून पुन्हा धनाची शेती करण्याचा विचार शेतकरी करीत आहेत.

"वातावरणाच्या बदलीमुळे बागावर रोगराईचे सावट पसरले आहे. लाखो रुपयांच्या औषधांचा फवारण्या केल्या, पण पाहिजे तेवढा उत्पन्न मिळाला नाही. अल्प भावामुळे मिरची बागांना लावलेला खर्चही निघेनासा झाला आहे. खर्चाचे बजेट वाढत असून, कर्जाचे ओझे कायम आहे."- गुरुदेव सेलोकर, शेतकरी, धुसाळा.

 

टॅग्स :bhandara-acभंडाराfarmingशेती