शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
3
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
4
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
5
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
6
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
7
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
8
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
9
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
10
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
11
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
12
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
13
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
14
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
15
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
16
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
17
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
18
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
19
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
20
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
Daily Top 2Weekly Top 5

तस्करी थांबविण्यासाठी ग्रामसभेचा ठराव

By admin | Updated: February 10, 2016 00:41 IST

पाचगाव रेती घाटावरुन नियमित सुरु असलेल्या अवैध रेती चोरांच्या विरोधात गावकऱ्यांनी दंड थोपटले आहे.

पाचगाव येथील प्रकार : फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी, प्रकरण रेतीच्या अवैध उत्खननाचे वरठी : पाचगाव रेती घाटावरुन नियमित सुरु असलेल्या अवैध रेती चोरांच्या विरोधात गावकऱ्यांनी दंड थोपटले आहे. यासंबंधी झालेल्या ग्रामसभेत रेती माफियांवर कारवाई करुन त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करुन रेतीचे अवैध उत्खनन बंद करण्यात यावे असा ठराव पारित करण्यात आला. यासंदर्भात मुख्यमंत्री यांच्यासह संबंधित विभागाला ठरावाची प्रत देण्यात आली आहे. आता यांच्यावर कोणती कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.दोन महिन्यापासून पाचगाव येथील राजकीय वातावरण तापले आहे. अनेक वर्षांपासून सत्तेत असलेल्यांना यावेळी सत्तेपासून हद्दपार व्हावे लागले. सत्तेत येण्यासाठी प्रयत्नरताच्या हाती प्रथमच सत्तेची किल्ली मिळाली. पण त्यांना ते चालवणे जमले नाही. क्षुल्लक कारणावरुन झालेल्या भांडणाचे पडसाद त्यांच्या संबंधावर पडले आणि त्याचेच परिणाम म्हणून गावात सुरु असलेले अवैध रेती उत्खननाच्या तक्रारीवरुन दिसून येते.गावाला लागुन सुरु नदी वाहते. या नदीच्या पात्रात गावाला पिण्याचे पाणी पुरवठा योजनेचे पम्पहाऊस आहे. परिसरातील शेतकऱ्यांचे शेत नदीपात्राला लागून असल्यामुळे नदीच्या पाण्यामुळे शेतकरी सुखावत होता. पण नियमित होणाऱ्या अवैध रेती उत्खननामुळे नदीचे पात्र धेक्यात आले आहे. पाणी पुरवठा योजनेच्या पम्पहाऊस जवळची रेती उपसल्यामुळे पम्पहाऊस धोकादायक स्थितीत आहे. उत्खननामुळे नदीच्या पात्रातील रेतीचे प्रमाण कमी झाले. यामुळे नदीत साठवून असणाऱ्या पाण्याची पातळी कमी झाली. नदीच्या काठावर बसलेल्या गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई भासण्याची शक्यता निर्माण झाली आहे.अनेक दिवसापासून या घाटचे लिलाव झाले नाही. पण रेतीचे उत्खनन नियमित सुरु आहे. गावातून दररोज शेकडो वाहनाने रेती चोरी सर्रास सुरु आहे. यामुळे गावअंतर्गत रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. दिवसभर रात्र बेभान धावणाऱ्या वाहनामुळे गावकऱ्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. बेभान धावणाऱ्या रेतीच्या वाहनामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून त्यांच्या कर्कश आवाजामुळे जिवन जगने कठीण झाले आहे. रेती चोरावर आळा न घातल्यास भविष्यात वाईट परिणाम भोगावे लागतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात संतुलाल गजभिये यांनी ग्राम सभेत रेती चोरावर कारवाईचा मुद्दा उचलून धरला व त्यांच्या मुद्याला श्रीराम भिवगडे यांनी अनुमोदन दिले. यावेळी सभेला उपस्थित ग्रामस्थांनी पाचगाव रेती घाटावरुन सुरु असलेल्या रेती चोरांना धडा शिकवण्यासाठी त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करुन कडक शासन होण्याचा ठराव बहुमताने पारित करण्यात आला. (वार्ताहर)