शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

१४ व्या वित्त आयोगात ग्रामपंचायती होणार मालामाल

By admin | Updated: October 1, 2015 00:44 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगात ग्रामपंचायतीच्या विकासावर भर देण्यात आला असून ...

१०० टक्के निधी मिळणार : खात्यात निधी थेट जमा होणारसाकोली : स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामीण भागाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींना १४ व्या वित्त आयोगात ग्रामपंचायतीच्या विकासावर भर देण्यात आला असून अधिकाधिक थेट अनुदान ग्रामपंचायतींना मिळणार आहे. केंद्र शासनाने ग्रामीण भागाच्या विकासाकरिता १४ व्या वित्त आयोगाची स्थापना केली. या आयोगाअंतर्गत स्थानिक स्वराज संस्थांना २०१५ ते २० यावर्षात १५.३५ हजार कोटी रुपयांचे अनुदान मिळणार आहे. राज्यातील ग्रामपंचायतींना बळकटी मिळणार आहे. १४ व्या वित्त आयोगाचे १०० टक्के अनुदान थेट ग्रामपंचायतींना मिळणार असल्याने पंचायत समिती, जिल्हा परिषदेतील अडसर दूर होणार आहे. यापूर्वी ग्रामपंचायतींना देण्यात येणारे अनुदान प्रथम जिल्हा परिषद नंतर पंचायत समिती आणि मग ग्रामपंचायतींना देण्यात येत होते. ग्रामपंचायत पातळीवर अनेक विकासात्मक समस्या आहेत. ग्रामीण भागातील नागरिक मुलभूत सुविधांपासून वंचित आहेत. गावाच्या विकासात कधी प्रशासन तर कधी राजकारण आडवे येते. यामुळे ग्रामीण भागातील विकसाला अडचण येते. आता केंद्र व राज्य शासनाने ग्रामपंचायतींना बळकटी देण्यासाठी थेट अनुदान देण्याची योजना आखली आहे. पाच वर्षाच्या कालावधीत प्रत्येक ग्रामपंचायतींना ५० लाखाहून अधिकचा निधी १४ व्या वित्त आयोगातून मिळणार आहे. गाव विकासाकरिता आता स्थानिक पदाधिकाऱ्यांना व नागरिकांना खासदार, आमदार, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याची मनधरणी करावी लागणार नाही. यापूर्वी जिल्हा परिषद व पंचायत समितीला प्रत्येकी २५ टक्के तर ग्रामपंचायतीला २० टक्के निधी दिला जात होता. आता पूर्ण १०० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना उपलब्ध होणार असल्याने विकासाबाबत सर्व निर्णय घेण्याचा अधिकार ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांना मिळणार आहे. या निर्णयामुळे जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्याच्या ठेकेदारीला आळा बसणार आहे. (तालुका प्रतिनिधी)