शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संघटित व्हावे

By admin | Updated: May 7, 2015 00:23 IST

घर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकांनी कार्य करण्याची गरज आहे. ग्राम विकासासाठी प्रत्येकाची जबाबदारी

सुधाकर आडे यांचे प्रतिपादन : वैयक्तिक शौचालयाबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षणभंडारा : घर, गाव, परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येकांनी कार्य करण्याची गरज आहे. ग्राम विकासासाठी प्रत्येकाची जबाबदारी वाढली आहे. प्रत्येक नागरिक जोपर्यंत प्रत्येक कामात सहभागी होणार नही तोपर्यंत कार्याला गती मिळणार नाही. त्यामुळे ग्रामविकासासाठी सचिव व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी संघटीत होऊन कार्य करावे, असे प्रतिपादन उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) सुधाकर आडे यांनी केले. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, स्वच्छ भारत मिशन जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सभागृहात पार पडलेल्या जिल्हास्तरीय विस्तार अधिकारी, ग्रामसेवक, गट समन्वयक, समूह समन्वयक प्रशिक्षण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी आडे, गणेशपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच माधुरी देशकर, साधनव्यक्ती नाना कुंदावार, कार्यक्रम व्यवस्थापक डी.एस. बिसेन, मनुष्यबळ विकास सल्लागार अंकुश गभणे, क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे व जिल्हा कक्षाचे इतर सल्लागार उपस्थित होते. याप्रसंगी वैयक्तीक शौचालय बांधकामाकरिता अधिकारी, पदाधिकारी, नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे. शौचालय बांधकाम व वापर करण्याकरिता नागरिकांची मानसिकता बदलविण्याची मोठी जबाबदारी आहे. यासाठी ध्येय, धोरण, विचार स्पष्ट करावे लागेल. जोपर्यंत सचिव सर्वगुण संपन्न होणार नाही तोपर्यंत गावविकास होणार नाही. याकरिता सचिव व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आपापसात मधुर संबंध तयार करून स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमाला यशस्वी करावे, असे आवाहन केले. कौशल्याच् या माध्यमातून स्वच्छ भारत मिशन सारख्या कार्यक्रमाला यश्सवी करणे कठीण जाणार नसल्याचे सांगितले. सरपंच माधुरी देशकर यांनी सरपंच पदाबाबतच्या ग्रामविकासातील अनुभव कथन करून सचिव व पदाधिकारी यांच्यातील समन्वयावर भर दिला. गावविकासात महत्वाची भूमिका ही सचिवांची असते. त्यांच्या कार्याला पदाधिकाऱ्यांनी सहमती दिली तर गावविकास करणे कठीण जाणार नसल्याचे सांगितले. कार्यक्रम व्यवस्थापक बिसेन यांनी सन २०१५-१६ आराखड्यामधील ग्रामपंचायतीतील वैयक्तिक शौचालय बाबतची माहिती सादर केली. शौचालयाचे बांधकाम, वापर आयईसी यासाठी बीआरसीसीआरसी यांची भूमिका विषद केली. तत्पूर्वी अंकुश गभणे यांनी राष्ट्रीय कार्यक्रम पेयजल कार्यक्रमाबाबतची माहिती व प्रपत्राबाबत माहिती दिली. प्रशिक्षणाच्या शेवटच्या सत्रात सचिवांनी सन २०१५-१६ च्या आराखड्यातील ग्राम पंचायतीमधील वैयक्तिक शौचालयाच्या बांधकामाबाबत नियोजन सादर केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार क्षमता बांधणी तज्ज्ञ अजय गजापुरे यांनी मानले.(शहर प्रतिनिधी)