शहरं
Join us  
Trending Stories
1
"काँग्रेसचे १५ खासदार विकले गेले, मुख्यमंत्री रेड्डींच्या आदेशामुळे भाजपच्या उमेदवाराला केले मतदान"; कोणत्या आमदाराने केला गौप्यस्फोट?
2
"नक्की कोण जिंकलं? आणि…’’, राज ठाकरेंचा व्यंगचित्रातून शाह पिता-पुत्रावर टीकेचा बाऊन्सर 
3
केवळ ₹१ विकली जाणार होती अपोलो टायर्स; आज आहे टीम इंडियाची ओळख, कोण आहेत मालक, किती आहे संपत्ती?
4
Janta Darshan: किडनी, हृदय रुग्णांना मोठा दिलासा; उपचाराचा खर्च उचलणार योगी सरकार!
5
शेअर बाजारात पुन्हा तेजी, सेन्सेक्स २०४ अंकांनी वधारला; Nifty २५,३०० च्या जवळ, 'हे' स्टॉक्स वधारले
6
नक्षलवादी संघटनांकडून केंद्र सरकारला शांततेचा प्रस्ताव; १ महिना सशस्त्र संघर्ष विरामाची मागणी
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्सवर सूट, ITC वर कठोर भूमिका; पाहा २२ सप्टेंबरपासून काय-काय बदलणार?
8
३१ जानेवारीपर्यंत निवडणुका पार पाडा; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य निवडणूक आयोगाला सुनावले खडेबोल
9
केवळ संशयामुळे लाेकांची झडती घेता येणार नाही, अपवादात्मक परिस्थितीत लेखी कारणे बंधनकारक : कोर्ट
10
सोशल मीडियावर ‘फोटो एडिट’ ॲपची धूम; सुरक्षित ठेवा तुमचे फोटो, फसवणूक वाढली
11
मुलाच्या वाढदिवसादिवशी पोहोचलं वडिलांचं शेवटचं गिफ्ट, कुटुंबीयांना झाले अश्रू अनावर
12
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार!
13
"इथं काम करणं आता कठीण..."; रस्त्यांवरील खड्डे अन् वाहतूक कोंडीमुळे बंगळुरूतील कंपनी शिफ्ट होणार
14
Crime: "माझ्या बहिणीपासून दूर राहा", वारंवार समजावूनही मित्र ऐकत नव्हता; मग...
15
Today's Horoscope : शेअर्स बाजारात लाभ होईल, आर्थिक स्थिती सुधारेल; वाचा तुमचे आजचे राशीभविष्य काय?
16
मोदी हाच जगातील सर्वांत मोठा ब्रँड; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : भाजप कार्यकर्त्यांचा ब्रँड निर्माण करून देणारा पक्ष
17
अभियांत्रिकीचे यंदा विक्रमी १ लाख ६६ हजार प्रवेश; कॉम्प्युटर, आयटी, एआयच्या ८८ टक्के जागा भरल्या
18
छगन भुजबळांना कोर्टाचा दणका, बेनामी मालमत्तेचा खटला पुन्हा चालविण्याचे आदेश
19
परशुराम महामंडळाच्या अध्यक्षांना दिला मंत्रिदर्जा; अजित पवार गटाचे आशिष दामले आहेत अध्यक्ष
20
विना‘आधार’ आडमुठेपणा...ती नामुष्की निवडणूक आयोगामुळे सरकारवर ओढवेल

स्वच्छतेच्या कामाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळ परिस्थितीवर ग्रामपंचायत सातत्याने लक्ष देत आहे. यात कुठलीही शंका नाही. मात्र गावातील किती नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला या नियोजनाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअड्याळ येथील प्रकार : अन्यथा जीवाला धोका

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळचे नाव घेतले जाते. मात्र विद्यमान स्थितीत गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. ज्या प्रकारे नाली व रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष दिले जाते तसेच लक्ष स्वच्छतेच्या कामाकडेही देण्यात यावे अशी चर्चा गावात सुरु आहे. नाली स्वच्छतेच्या कामाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या जीवालाही धोका उत्पन्न होऊ शकतो.गावात मोठ्या नाल्यासह अनेक लहान नाल्यांचा समावेश आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी गावात स्वच्छता केली जाते, यात दुमत नाही. परंतु नेहमीच्या जागी स्वच्छता करुन काही नाल्यांमधील गाळ उपसण्यात येत नाही.याबाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे सपेशल दुर्लक्ष दिसून येत आहे.स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोना काळ परिस्थितीवर ग्रामपंचायत सातत्याने लक्ष देत आहे. यात कुठलीही शंका नाही. मात्र गावातील किती नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला या नियोजनाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. गावात जिथे रस्ता आहे तिथे नाली नाही आणि जिथे नाल्यांची अत्यंत आवश्यकता आहे तिथे काम हाती घेण्यात आले नाही.त्यामुळे अंतर्गत रस्त्याहून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. पावसाळ्यात ही समस्या अधिकच बिकट बनते. घाणीने तुंबलेल्या नाल्यांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.ज्या वॉर्डांमध्ये नाल्या नाहीत अशा ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. काही नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला नाही. ज्या ठिकाणी पाणी साचले असते तिथे विषारी श्वापदांचाही धोका कायम असतो. या संदर्भात गावातील शांतीनगरात अशी स्थिती पहायला मिळत आहे. पाणी निघण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लोकसंख्येच्या मानाने पदाधिकाऱ्यांची जबाबदारीही मोठी आहे. या समस्येकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी लक्ष देवून नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत