शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेच्या कामाकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2020 05:01 IST

स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोना काळ परिस्थितीवर ग्रामपंचायत सातत्याने लक्ष देत आहे. यात कुठलीही शंका नाही. मात्र गावातील किती नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला या नियोजनाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे.

ठळक मुद्देअड्याळ येथील प्रकार : अन्यथा जीवाला धोका

विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळचे नाव घेतले जाते. मात्र विद्यमान स्थितीत गावातील मूलभूत समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. ज्या प्रकारे नाली व रस्त्याच्या बांधकामाकडे लक्ष दिले जाते तसेच लक्ष स्वच्छतेच्या कामाकडेही देण्यात यावे अशी चर्चा गावात सुरु आहे. नाली स्वच्छतेच्या कामाकडे स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यात नागरिकांच्या जीवालाही धोका उत्पन्न होऊ शकतो.गावात मोठ्या नाल्यासह अनेक लहान नाल्यांचा समावेश आहे. मान्सूनच्या आगमनापूर्वी गावात स्वच्छता केली जाते, यात दुमत नाही. परंतु नेहमीच्या जागी स्वच्छता करुन काही नाल्यांमधील गाळ उपसण्यात येत नाही.याबाबीकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे सपेशल दुर्लक्ष दिसून येत आहे.स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमांतर्गत ही बाब पूर्णत्वास जायला हवी होती. मात्र या मिशनचा रेकॉर्ड मेंटेन करण्यातच वेळ जात असल्याचे दिसून येत आहे. या संदर्भात ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी गंभीरतेने पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.कोरोना काळ परिस्थितीवर ग्रामपंचायत सातत्याने लक्ष देत आहे. यात कुठलीही शंका नाही. मात्र गावातील किती नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला या नियोजनाकडे लक्ष केंद्रीत करणे गरजेचे आहे. गावात जिथे रस्ता आहे तिथे नाली नाही आणि जिथे नाल्यांची अत्यंत आवश्यकता आहे तिथे काम हाती घेण्यात आले नाही.त्यामुळे अंतर्गत रस्त्याहून घाण व दुर्गंधीयुक्त पाणी वाहत असते. पावसाळ्यात ही समस्या अधिकच बिकट बनते. घाणीने तुंबलेल्या नाल्यांमुळे मानवी आरोग्यावरही परिणाम होऊ शकतो.ज्या वॉर्डांमध्ये नाल्या नाहीत अशा ठिकाणी दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. काही नाल्यांमधील गाळ उपसण्यात आला नाही. ज्या ठिकाणी पाणी साचले असते तिथे विषारी श्वापदांचाही धोका कायम असतो. या संदर्भात गावातील शांतीनगरात अशी स्थिती पहायला मिळत आहे. पाणी निघण्याची व्यवस्था नसल्याने पावसाळ्यात रस्त्यावरील पाणी घरात शिरण्याची शक्यताही नाकारता येत नाही. लोकसंख्येच्या मानाने पदाधिकाऱ्यांची जबाबदारीही मोठी आहे. या समस्येकडे ग्रामपंचायतीच्या पदाधिकाºयांनी लक्ष देवून नागरिकांच्या मागणीची पूर्तता करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत