शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
2
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
3
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
4
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
5
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
6
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
7
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
8
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
9
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
10
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
11
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर
12
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
13
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
14
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
15
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
16
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
17
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
18
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
19
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
20
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा

ग्रामपंचायत प्रचाराचा धुरळा; आचारसंहितेची होतेय ऐशीतैशी..! प्रचारावर नियंत्रण कोणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:16 IST

आक्रमक भाषांनी पडतेय वादाची ठिणगी, प्रशासनाची करडी नजर

देवानंद नंदेश्वर

भंडारा : जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. प्रत्येक मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे गावोगावी प्रचाराचा धुरळा उडत आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी असली तरी, सोशल मीडियावरील प्रचाराला निर्बंध कोणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आचारसंहितेस न जुमानता सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता लागू होते. ग्रामपंचायत निवडणुकीत तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. तालुकापातळीवर स्वतंत्र आचारसंहिता कक्षही स्थापन आहे. मात्र तरीही नियमांना न जुमानता सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे प्रचार रंगला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी चुरशीची निवडणूक होत आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असल्याने तिला चांगलाच रंग भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारतोफा शुक्रवारी थंडावणार असल्या तरी आता प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जाणार आहे.

एजन्सी मालामाल, नियमांना मात्र हरताळ! 

उमेदवारांना सोशल मीडियावरील पोस्ट तयार करून देण्यासाठी अनेकजणांनी व्यवसाय सुरू केला आहे. या एजन्सीनी गावातील पॅनेलच्या प्रचाराचे काम हाती घेत स्टेटससाठी पोस्ट तयार करून देणे. त्या व्हायरल करणे. ही कामे सुरू केली आहेत. परिणामी: आदर्श आचारसंहितेला मात्र अशा कृत्याने हरताळ फासला गेला आहे.

होऊन जाऊ दे खर्च, विचारतो कोण?

सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी खास टीम नेमण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. खर्चाचे हिशोब तहसील कार्यालयात जमा करावयाचे आहेत. त्याच वेळी सोशल मीडियावर पेड जाहिराती केल्या तरीही त्याचा हिशोबच विचारला जात नसल्याने अनेक जणांनी याचा गैरफायदा घेण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.

आक्रमक प्रचार वाद निर्माण करतील

सोशल मीडियावर विशेषतः स्टेटसच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार आक्रमकपणे सुरू आहे. विरोधी उमेदवारावर थेट आरोप करीत प्रचार सुरू आहे. त्यामुळे यातून सध्या तरी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले आहेत. याचे गंभीर परिणाम होणार नाहीत, यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणElectionनिवडणूकbhandara-acभंडारा