शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत प्रचाराचा धुरळा; आचारसंहितेची होतेय ऐशीतैशी..! प्रचारावर नियंत्रण कोणाचे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2022 15:16 IST

आक्रमक भाषांनी पडतेय वादाची ठिणगी, प्रशासनाची करडी नजर

देवानंद नंदेश्वर

भंडारा : जिल्ह्यातील ३०५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला आहे. प्रत्येक मतदाराला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे गावोगावी प्रचाराचा धुरळा उडत आहे. आचारसंहितेची अंमलबजावणी असली तरी, सोशल मीडियावरील प्रचाराला निर्बंध कोणाचे? हा प्रश्न निर्माण झाला आहे. आचारसंहितेस न जुमानता सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू आहे.

निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आचारसंहिता लागू होते. ग्रामपंचायत निवडणुकीत तहसीलदार निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करीत आहेत. तालुकापातळीवर स्वतंत्र आचारसंहिता कक्षही स्थापन आहे. मात्र तरीही नियमांना न जुमानता सोशल मीडियावर अत्यंत आक्रमकपणे प्रचार रंगला आहे. दरम्यान, अनेक ठिकाणी चुरशीची निवडणूक होत आहे. निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली असल्याने तिला चांगलाच रंग भरत असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रचारतोफा शुक्रवारी थंडावणार असल्या तरी आता प्रत्यक्ष भेटींवर भर दिला जाणार आहे.

एजन्सी मालामाल, नियमांना मात्र हरताळ! 

उमेदवारांना सोशल मीडियावरील पोस्ट तयार करून देण्यासाठी अनेकजणांनी व्यवसाय सुरू केला आहे. या एजन्सीनी गावातील पॅनेलच्या प्रचाराचे काम हाती घेत स्टेटससाठी पोस्ट तयार करून देणे. त्या व्हायरल करणे. ही कामे सुरू केली आहेत. परिणामी: आदर्श आचारसंहितेला मात्र अशा कृत्याने हरताळ फासला गेला आहे.

होऊन जाऊ दे खर्च, विचारतो कोण?

सोशल मीडियावर प्रचार करण्यासाठी खास टीम नेमण्यात आलेल्या आहेत. उमेदवारांना निवडणुकीच्या खर्चासाठी मर्यादा घालून देण्यात आली आहे. खर्चाचे हिशोब तहसील कार्यालयात जमा करावयाचे आहेत. त्याच वेळी सोशल मीडियावर पेड जाहिराती केल्या तरीही त्याचा हिशोबच विचारला जात नसल्याने अनेक जणांनी याचा गैरफायदा घेण्यास मोठ्या प्रमाणात सुरुवात केली आहे.

आक्रमक प्रचार वाद निर्माण करतील

सोशल मीडियावर विशेषतः स्टेटसच्या माध्यमातून निवडणुकीचा प्रचार आक्रमकपणे सुरू आहे. विरोधी उमेदवारावर थेट आरोप करीत प्रचार सुरू आहे. त्यामुळे यातून सध्या तरी किरकोळ वादावादीचे प्रकार घडले आहेत. याचे गंभीर परिणाम होणार नाहीत, यावर प्रशासनाने नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPoliticsराजकारणElectionनिवडणूकbhandara-acभंडारा