शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

शासन धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठिशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 06:00 IST

या बैठकीत धान खरेदी केंद्रात वाढ व शेतकरी नुकसान भरपाईचा मुद्दा आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी लावून धरला. यावर पालकमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रस्तावित करण्यात येणाºया विकास कामांबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी व त्यांच्या संमतीनेच कामे मंजूर करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.

ठळक मुद्देविश्वजीत कदम : जिल्हा नियोजन समितीची बैठक

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या धान उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून धान खरेदी व नुकसान भरपाई या विषयांवर मुख्य लोकप्रतिनिधींसह मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून शेतकऱ्यांना न्याय मिहवून देवू, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिली.जिल्हा परिषदेच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, खासदार सुनील मेंढे, आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम.जे. प्रदीपचंद्रन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड व जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते. या बैठकीत पालकमंत्री कदम यांनी धान खरेदी केंद्र वाढविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी पाच दिवसात सकारात्मक अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. शेतकरी व सामान्य माणूस यांच्या विकासासाठी शासन कटीबद्ध असून आपण स्वत: या विषयावर लक्ष केंद्रीत करणार असल्याचे त्यांची सांगितले.या बैठकीत धान खरेदी केंद्रात वाढ व शेतकरी नुकसान भरपाईचा मुद्दा आमदार डॉ. परिणय फुके, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजू कारेमोरे यांनी लावून धरला. यावर पालकमंत्र्यांनी सभागृहाला आश्वस्त केले. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून प्रस्तावित करण्यात येणाºया विकास कामांबाबत लोकप्रतिनिधींशी चर्चा करावी व त्यांच्या संमतीनेच कामे मंजूर करावीत, असे निर्देश त्यांनी दिले.जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० च्या पुनर्विनियोजन प्रस्तावात यावेळी मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण २०१९-२० अंतर्गत कार्यवाही यंत्रनेकडून पुनर्विनियोजन प्रस्ताव मागविण्यात आले होते. महसूली क्षेत्रांतर्गत गाभा क्षेत्रातील बचत रूपये ६७ लाख व बिगर गाभा क्षेत्रातील बचत रूपये दीड लाख मिळून बचत रूपये ६८ लाख ५२ हजार रूपये लक्ष आहे. सदर संपूर्ण बचत गाभा क्षेत्रामध्ये पुनर्विनियोजीत करण्याचे प्रस्तावित आहे.अनुसूचित जाती उपाययोजनेंतर्गत अंतरसंकल्पीय तरतूद ४९ कोटी १७ लाख रूपये एवढी आहे. अनुसूचित जाती उपाययोजनेकरीता पुनर्विनियोजन प्रस्ताव कार्यवाही यंत्रणेकडून मागविण्यात आले होते. प्राप्त प्रस्तावानुसार गावाक्षेत्रामध्ये तीन कोटी २७ लाख व बिगर गाभा क्षेत्रात एक कोटी रूपये मिळून चार कोटी २७ लाख रूपये आहे. अतिरिक्त मागणी सहा कोटी ७५ लाखांची आहे. बिगर गाभा क्षेत्रामध्ये यंत्रणांकडून मागणी नसल्यामुळे सदर संपूर्ण बचत रूपये चार कोटी २७ लाख गाभाक्षेत्रामध्येच पुनर्विनियोजन करण्याचे या बैठकीत प्रस्तावित करण्यात आले.जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा परिषदेकडून मंजुरी करण्यात आलेल्या कामांच्या आराखड्यावर चर्चा करण्यात आली.जिल्ह्याच्या विकासासाठी हवे ३२१ कोटीआगामी आर्थिक वर्षात भंडारा जिल्ह्यातील विकास कामांसाठी ३२१ कोटी १७ लाख रूपयांची आवश्यकता असून सरकारद्वारे निर्धारित केलेल्या मर्यादेत १५३ कोटी रूपयांच्या प्रारूप आराखड्याला शुक्रवारी झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. तर अतिरिक्त १६८ कोटी रूपयांची मागणी शासनाकडे नोंदविण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजना २०१९-२० अंतर्गत २१९ कोटी ३९ लाख नियतवेय मंजूर आहे. यापैकी डिसेंबर २०१९ पर्यंत १२८ कोटी ३४ लाख प्राप्त झाले आहे. कार्यवाही यंत्रणांना ९३ कोटी ३२ लाख रूपयांचा निधी वितरित करण्यात आला असून कार्यवाही यंत्रणांनी डिसेंबर २०१९ पर्यंत ७८ कोटी ८५ लाख रूपये खर्च केले आहे. वितरित तरतुदीशी खर्चाची टक्केवारी ८४.५० टक्के आहे.विकासात पक्षपात करणार नाही -विश्वजीत कदमशेतकरी आणि सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून विकासात पक्षपात केला जाणार नाही. प्रशासनाला काम पारदर्शक करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून भ्रष्ट कारभार खपवून घेणार नाही, असे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी येथे आयोजित पत्र परिषदेत सांगितले.

टॅग्स :Vishwajeet Kadamविश्वजीत कदमFarmerशेतकरी