शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

‘गोसेखुर्द’ 372 कोटींवरुन 18 हजार कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 10:30 IST

 भंडारा जिल्ह्यात जलस्रोतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वैनगंगासह तिच्या तीन उपनद्याही आहेत.  याच आधारावर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सिंचन व्यवस्थेअंतर्गत प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसी खुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ चार दशकांपूर्वी रोवण्यात आली. मात्र चार दशकानंतरही हा  प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. अजूनही पुनर्वसनाची कामे रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. जमीन, घरांचा  मोबदलाही अनेकांना मिळायचा आहे.

ठळक मुद्देनिधीची प्रतीक्षा : कालव्यांची कामे अपुर्ण, पुनर्वसनाचाही प्रश्न कायम

इंद्रपाल कटकवारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा :  विदर्भातील महत्त्वकांक्षी प्रकल्प म्हणून संबोधल्या जाणाऱ्या पवनी तालुक्यातील गोसी खुर्द प्रकल्पाला आता पूर्णत्वास नेण्यासाठी १८ हजार कोटींची गरज आहे. सुरुवातीला ३७४ कोटी रुपयांच्या भूमिपूजनपासून सुरुवात झालेला हा प्रकल्प हजारो कोटींपर्यंत पोहोचल्याने परिसरातील शेतकऱ्यांना हव्या त्याप्रमाणे सिंचनाची सुविधा उपलब्ध झालेली नाही. भंडारा जिल्ह्यात जलस्रोतांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. वैनगंगासह तिच्या तीन उपनद्याही आहेत.  याच आधारावर जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये सिंचन व्यवस्थेअंतर्गत प्रकल्पांची उभारणी करण्यात आली. महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या गोसी खुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ चार दशकांपूर्वी रोवण्यात आली. मात्र चार दशकानंतरही हा  प्रकल्प पूर्णत्वास गेलेला नाही. अजूनही पुनर्वसनाची कामे रेंगाळलेल्या अवस्थेत आहे. जमीन, घरांचा  मोबदलाही अनेकांना मिळायचा आहे.  विशेष म्हणजे अनेक ठिकाणी कालवे व त्यांची कामे अपूर्णावस्थेत असल्याने खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना सिंचनाचा लाभ मिळू शकलेला नाही. यावर निर्णय होणे अत्यंत गरजेचे झाले आहे.

भीमलकसा प्रकल्प  साकोली तालुक्यातील हजारो हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली आणण्याची क्षमता असलेला भीमलकसा प्रकल्प तीन दशकांपासून रखडलेल्या स्थितीत आहे. हा सिंचन प्रकल्प पूर्ण झाल्यास साकोली व अन्य तालुका लागलेल्या परिसरातही या प्रकल्पाचा फायदा होऊ शकतो. मात्र हाही प्रकल्प  पूर्णत्वास जाऊ शकला नाही, हीच साकोली तालुक्‍याची खरी शोकांतिका म्हणावी लागेल.

निम्न चूलबंद प्रकल्प साकोली तालुक्यातील महत्त्वकांक्षी दुसरा प्रकल्प म्हणजे निम्न चूलबंद प्रकल्प.  चूलबंद नदीवर आधारलेला हा प्रकल्प अजूनही पूर्णत्वास गेलेला नाही. लहानमोठी कामे अजूनही रखडलेली आहे. अपूर्णत्व कामामुळे शेतकऱ्यांना सिंचन घेण्यास अडचण निर्माण होत आहे. हा प्रकल्पही निधी वाढल्यामुळे रखडलेला आहे. याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्यानेच प्रकल्प रखडला आहे.

करचखेडा उपसा सिंचन  भंडारा तालुकांतर्गत येणाऱ्या वैनगंगा नदीपात्रात उभारण्यात आलेल्या करचखेडा  सिंचन प्रकल्पही अजूनही पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेला नाही. या प्रकल्पांतर्गत कालव्याची कामे व अन्य तांत्रिक कामे रखडलेली आहेत. या प्रकल्पालाही निधीचा फटका बसला असून, ही कामे पूर्ण करण्यासाठी निधीची मागणी होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

राज्य शासनाने सिंचन प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यायला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने आम्हाला सिंचन सुविधा उपलब्ध होऊ शकेल.-शरद भुते, शेतकरी खुटसावरी 

साकोली तालुक्यातील निम्न चूलबंद प्रकल्प पूर्णत्वास गेला असता तर आज खऱ्या अर्थाने त्याचा लाभ झाला असता. मात्र हा प्रकल्पही पूर्ण होऊ शकला नाही.-यादोराव नंदेश्वर, शेतकरी, पिंडकेपार

टप्प्याटप्प्याने का होईना शासनाने प्रकल्पांसाठी निधी उपलब्ध करून द्यायला हवा. मात्र अनुदानाची रक्कम मिळायला वर्ष-वर्ष लागत असतील तर सिंचन प्रकल्पासाठी निधी कुठून येणार.- प्रभू साखरे, शेतकरी दवडीपार बा.

अन्य प्रकल्पांची दुरवस्था   जिल्ह्यात अनेक लहान-मोठे प्रकल्प निधीअभावी तर काही ठिकाणी तांत्रिक कारणांनी रखडले आहेत. यात बावनथडी प्रकल्प, काळा गोटा प्रकल्प, नेरला उपसा सिंचन योजना यासह अनेक प्रकल्प थंडबस्त्यात आहेत. अनेक ठिकाणी कालव्यांची व पाटांची दुरुस्ती होणे गरजेचे आहे.

 

टॅग्स :Gosekhurd Projectगोसेखुर्द प्रकल्प