शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प झाला ३० वर्षांचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 22:58 IST

पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प २२ एप्रिल रोजी आपला ३० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. हा राष्ट्रीय प्रकल्प ऐन तारुण्यात आहे. प्रकल्पाची किंमत प्रकाशाच्या वेगाने वाढली. परंतु सिंचन क्षमता वाढविण्यात प्रशासनाला यश मिळू शकले नाही.

ठळक मुद्देनिधीअभावी कामे प्रलंबित : १५ टक्केपेक्षा अधिक सिंचन होवू शकले नाही

अशोक पारधी ।लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प २२ एप्रिल रोजी आपला ३० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. हा राष्ट्रीय प्रकल्प ऐन तारुण्यात आहे. प्रकल्पाची किंमत प्रकाशाच्या वेगाने वाढली. परंतु सिंचन क्षमता वाढविण्यात प्रशासनाला यश मिळू शकले नाही.१९८३ ला प्रकल्पाची प्रशासकीय मान्यता ३७२ कोटी रुपयांची होती. ३० वर्षानंतर प्रकल्पाची सुधारित प्रशासकीय मान्यता किंमत १८,४९४ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. साधारणत: चार हजार नऊशे पट किमतीत वाढ झाली असली तरी सिंचन मात्र १५ टक्के पेक्षा अधिक होवू शकले नाही.गोसेखुर्द प्रकल्पाला सन २००९ मध्ये राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आला. त्यामुळे केंद्र शासनाचा निधी प्राप्त होत असल्याने गोसेखुर्द प्रकल्पाचे कामास गती मिळालेली आहे. मुख्य धरणाचे काम १०० टक्के पूर्ण झालेले असून धरणातील पाणी साठवण क्षमता ११४६ दलघमी आहे. तलांक २४२.५० मी पर्यंत पाणीसाठा करण्यात येत आहे. शासकीय आकडेवारीनुसार उजव्या मुख्य कालव्याचे काम ९८ टक्के पूर्ण झालेले आहे. शाखा कालवे ५० टक्के पूर्ण झालेले आहेत.निर्मित सिंचन क्षमता १३,९२६ हेक्टर असली तरी प्रत्यक्ष वापर ७,२१० हेक्टर एवढेच आहे. उजवा मुख्य कालवा ३० कि.मी. अंतरापर्यंत पूर्ण झालेला असून त्यामुळे सेध असल्याने ३० कि.मी. पर्यंतचा क्षेत्रात हरित पट्टा निर्माण झाला आहे. उन्हाळी भात व काही क्षेत्रात ऊसाची लागवड करण्यात आलेली आहे. पवनी, कोदुर्ली, रेवणी, धानोरी, भोजापूर, गुडेगाव, खातखेडा, सावरला गावालगतच्या लाभक्षेत्रात शेतकरी, शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झालेला आहे.डावा मुख्य कालवा पूर्ण झालेला असला तरी मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे कामात प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे उघडकीस आले. प्रकरण न्यायालयापर्यंत पोहोचले. आता पूर्ण अस्तरीकरणाचे काम सुरु करण्यात आलेले आहे. खरीप हंगामात ११ हजार हेक्टर क्षेत्रात सिंचन करण्यात आल्याचे शासकीय आकडे सांगत आहेत. मात्र रब्बी हंगामात डावा मुख्य कालवा कोरडा ठेवण्यात आलेला आहे. उजवा मुख्य कालवा आसोला मेंढा जलाशयापर्यंत पोहचला. त्यामुळे जलाशयात पाणी पाठविण्याचा प्रायोगिक प्रयत्न करण्यात आलेला आहे. प्रत्यक्ष सिंचन क्षमता वाढविण्यासाठी आसोला मेंढा जलाशय मुख्य कालवा व वितरण प्रणालीच्या कामाचे नूतनीकरण करण्यात येत आहे.प्रकल्पाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा देण्यात आलेला असला तरी २०१३-१४ पासून प्रकल्पाला केंद्राकडून निधी देण्यात आलेला नाही. त्यामुळे कित्येक कामे निधीअभावी प्रलंबित आहेत. यापुढे एनबीसीसी (नॅशनल बिल्डींग कन्स्ट्रक्शन कार्पोरेशन) मार्फत प्रकल्पाचे उर्वरित काम करण्यात येणार आहे. दर्जेदार पुनर्वसन, उजवा मुख्य कालवा, नेरला उपसा सिंचन योजना, मोखाबर्डी उपसा सिंचन योजना व नवीन प्रस्तावित उपसा सिंचन योजना ही सर्व कामे एनबीसीसी मार्फत करण्याचा करार करण्यात आलेला आहे.उपसा सिंचन योजनागोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पावर आधारित टेकेपार उपसा सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून प्रत्यक्ष पाणी वापर ५,५१४ हेक्टर क्षेत्रात करण्यात येत आहे. आंभोरा उपसा सिंचन योजना कार्यान्वित झालेली असून प्रत्यक्ष पाणी वापर ४,२५८ हेक्टर क्षेत्रात करण्यात येत आहे. नेरला उपसा सिंचन योजना आॅगस्ट २०१६ ला कार्यान्वित करण्यात आली. परंतु खरीप हंगामात ४,२३२ हेक्टर क्षेत्रात पाणी वापर झालेला आहे. रब्बी हंगामात शेतीला पाणी मिळू शकले नाही. मोखाबर्डी उपसा सिंचन योजना एप्रिल २०१८ अखेर कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे समजते. शिवनाळा, आकोट, पवनी, शेळी व गोसी उपसा सिंचन योजना शासनदरबारी प्रलंबित आहेत.पुनर्वसन व स्थलांतरप्रथम टप्प्यातील १८ गावापैकी १८ गावे, दुसऱ्या टप्प्यातील ४० पैकी १७ गावे, तिसºया टप्प्यातील २७ गावापैकी ६ गावे स्थलांतरीत झालेले आहेत. एकुण ८५ गावठाणापैकी ४१ गावठाणे पूर्णपणे स्थलांतरीत झालेली आहेत. ४४ गावाच्या पुनर्वसन व स्थलांतरणाचा प्रश्न अद्याप कायम आहे. पवनी तालुक्यातील खापरी (रेहपाडे) गावासाठी अद्याप गावठाण उपलब्ध करून देण्यात आलेले नाही व स्वेच्छा पुनर्वसनाला हिरवी झेंडी देण्यात आलेली नाही.