शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

गोसेखुर्द धरण भूमिपूजनस्थळाची दुर्दशा

By admin | Updated: April 29, 2015 00:39 IST

२७ वर्षापूर्वी मागासलेल्या पुर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण तयार...

पवनी : २७ वर्षापूर्वी मागासलेल्या पुर्व विदर्भाला सुजलाम सुफलाम करण्याकरिता गोसेखुर्द येथे वैनगंगा नदीवर गोसीखुर्द धरण तयार करण्याकरिता माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या हस्ते लाखो जनतेच्या उपस्थित भूमिपूजन करण्यात आले. पण, या भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. धरण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष असल्यामुळे या भूमिपूजन स्थळाची उपेक्षा होत आहे.हरीतक्रांती आणण्याची क्षमता असणाऱ्या गोसीखुर्द धरणाचे भुमिपूजन २२ एप्रिल १९८८ ला करण्यात आले. या धरणाच्या कामावर आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हे धरण अनेक कंत्राटदारांसाठी एक प्रकारे लॉटरीच ठरली आहे. या धरणाच्या राजीव गांधी टेकडीवरील भूमिपूजन स्थळाची पुर्णत: दुर्दशा झाली आहे. या भूमिपूजन स्थळाच्या कोनशिलेवर लावलेल्या टाईल्स निघून खाली पडलेल्या आहेत. कोनशिलेवरील लिहिण्यात आलेली नावे पुर्णत: मिटलेले आहेत. त्यामुळे दररोज येणाऱ्या शेकडो पर्यटकांना धरणाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला उपस्थित मान्यवरांचे नावे किंवा धरणाच्या विस्ताराची माहिती होऊ शकत नाही. कोनशिलेवरील माहिती प्राप्त झाल्यास पर्यटकांना ती विद्यार्जनात काही येऊ शकते. इतके दिवस होवून या भूमिपूजन स्थळाची दुर्दशा झाली असतानाही धरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिसू नये, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. (शहर प्रतिनिधी)