शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

पाच वर्षात गोसेखुर्दला दमडीही नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2018 21:30 IST

साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : आसगाव येथे शेतकरी जनजागृती मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कआसगाव चौ. : साधन संपत्तीने नटलेल्या भंडारा जिल्ह्याला राज्य सरकारने संकटाचा खाईत नेवून ठेवले आहे. शेतकरी, शेतमजुरांच्या जीवनात कुठलाही आमुलाग्र बदल झालेला नाही. आघाडी सरकारने गोसेखुर्द धरणाला राष्ट्रीय प्रकल्पाचा दर्जा दिला होता. मात्र मागील पाच वर्षात केंद्र सरकारने गोसेखुर्द धरणासाठी एक दमडीही दिलेली नाही. परिणामी येथील शेतकरी अस्मानी व सुलतानी संकटात सापडला आहे. असे प्रतिपादन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा खासदार प्रफुल्ल पटेल यांनी केले.आसगाव येथे मध्यवर्ती बँक शाखेच्या एटीएम केंद्राचे उद्घाटन व शेतकरी जनजागृती मेळाव्याप्रसंगी उद्घाटक म्हणून खा. पटेल बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री विलास श्रृंगारपवार होते. विशेष अतिथी म्हणून माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, नाना पंचबुध्दे, माजी आमदार सेवक वाघाये, जिल्हा दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे, उपाध्यक्ष विवेकानंद कुर्झेकर, पालक संचालक अशोक मोहरकर, बाजार समितीचे सभापती लोमेश वैद्य, जि.प. सदस्य चित्रा सावरबांधे, पं.स. सदस्य मंगेश पाटील ब्राम्हणकर, खरेदीविक्री संस्थेचे अध्यक्ष माणिक ब्राम्हणकर, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष पुंडलिक हत्तीमारे, सरपंच विपीन बोरकर, जि.प चे माजी सदस्य विजय सावरबांधे, माजी संचालक किशोर पालांदूरकर, मोहन सुरकर, अर्चना वैद्य, पंढरीनाथ सावरबांधे, गोपाल सावरबांधे, मोहन पंचभाई, हिरालाल खोब्रागडे, यादव डोये, बँकेचे उपाध्यक्ष सदाशिव वलथरे, सरव्यवस्थापक संजय बर्डे आदी उपस्थित होते.प्रफुल्ल पटेल म्हणाले, काँग्रेस सत्तेत असतांना आम्ही सरसकट कर्जमुक्ती केली. मात्र विद्यमान सरकारने जाचक अटी लावून शेतकऱ्यांना वेटीस धरले आहे. आजघडीला भेल कारखान्याची अवस्था सर्वांना माहित आहे. बेरोजगारांना नोकरी देण्याचे आश्वासनही हवेत विरले आहेत. विदर्भातील सर्वच जिल्हे विकास कामापासून मागे आहेत.विदर्भाचे मुख्यमंत्री असतांनाही त्याच विदर्भावर सातत्याने अन्याय होत आहे. भाजप सरकारने जनसामान्यांसाठी काय केले. असा प्रश्न उपस्थित करुन शेतकºयाना या सरकारने सर्वात मागे टाकले आहे. शेतकरी पुन्हा कर्जबाजारी झाला आहे. जिल्हा परिषद, पंचायत समितीचे अधिकार कमी केल्यामुळे यापुढे या संस्थांचा निवडणूकीत उभे राहावे की नाही असा प्रश्न उमेदवारांसमोर उभा राहणार आहे. धर्माचा नावावर मत मागणाऱ्यांना नागरिकांनी धडा शिकविला पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.यावेळी प्रफुल्ल पटेल यांच्या मुख्य उपस्थितीत एटीएम चे उद्घाटन करण्यात आले. संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचालन जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी तर आभार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर यांनी मानले.

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल