शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

जीवनातील काही क्षण दुसऱ्यांना द्या

By admin | Updated: October 13, 2014 23:18 IST

परमेश्वराने दिलेले आयुष्य अमुल्य आहे. प्रत्येकजण स्वत:साठी जगतो. पण दुसऱ्यासाठी जगण्यात खरा अर्थ दडलेला आहे. जो दुसऱ्यासाठी जिवन जगतो त्याला खरा आनंद व सुख मिळतो.

सत्कार कार्यक्रम : राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी दिदी यांचे प्रतिपादनवरठी : परमेश्वराने दिलेले आयुष्य अमुल्य आहे. प्रत्येकजण स्वत:साठी जगतो. पण दुसऱ्यासाठी जगण्यात खरा अर्थ दडलेला आहे. जो दुसऱ्यासाठी जिवन जगतो त्याला खरा आनंद व सुख मिळतो. प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयात दुसऱ्यासाठी जीवन जगणाऱ्या अनेकानी आपले आयुष्य समर्पित केले आहे. जगातील दु:ख दूर करण्यासाठी व मानवकल्याण हे ध्येय ठेवून जिवन जगणाऱ्यात या केंद्राचे मोठे योगदान आहे. म्हणून प्रत्येकाने स्वत:च्या सुख दुख:च्या चक्रव्यूहात न अडकता आपल्या जीवनातील काही क्षण हे ईश्वरीय सेवेत द्यावे, असे आवाहन राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी यांनी केले.प्रजापिता ब्रह्मकुमारीज ईश्वरीय विश्वविद्यालयात १५ वर्षापेक्षा जास्त काळ सेवा देणाऱ्या भारतातील २५ हजार ब्रह्मकुमारीजचा सत्कार मुख्य केंद्र राजस्थानातील माऊंट आबू येथे करण्यात आला. यात वरठी येथील चार ब्रह्मकुमारी यांचा समावेश होता. त्याप्रित्यर्थ त्यांचा सत्कार वरठी केंद्राच्या वतीने करण्यात आला.प्रमुख पाहुणे म्हणून सनफ्लॅग स्कूलचे प्राचार्य सी.जे. धर, एन.जे. पटेल महाविद्यालय मोहाडीचे प्राचार्य डॉ. ज्योती पांडे, सरपंच संजय मिरासे, पंचायत समिती सदस्य रवि येळणे उपस्थित होते.यावेळी ब्रह्मकुमारी रेखा दिदी, राधा दीदी, लता दिदी व चन्द्रकला दिदी यांचा राजयोगिनी ब्रह्मकुमारी पुष्पाराणी यांच्या हस्ते सत्कार करून भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमाचे आयोजन प्रजापिता ब्रह्मकुमारी विद्यालयाच्या प्रमुख राजयोगिनी ब्रह्मकुमारी उषा दिदी यांनी केले होते. कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व केंद्राचे सेवक उपस्थित होते. (वार्ताहर)