शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
Saurabh Bharadwaj: आप नेते सौरभ भारद्वाज यांच्या घरासह १३ ठिकाणी ईडीचे छापे, नेमकं प्रकरण काय?
3
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
4
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
5
लग्नानंतरही विवाहितेला भेटायला गेला बॉयफ्रेंड; मुलीच्या बापाने दोघांनाही हात बांधून विहिरीत फेकलं
6
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
7
बँकिंग-फायनान्स क्षेत्रात बंपर भरती! मिळणार तब्बल २.५० लाख नोकऱ्या, छोटी शहरे केंद्रस्थानी
8
८ शुभ योगात गणपती २०२५: ८ राशींना अष्टविनायक वरदान, समृद्धी-ऐश्वर्य; वैभव-सुबत्ता, मंगल-कल्याण!
9
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
10
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
11
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
12
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
13
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
14
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
15
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
16
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
17
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
18
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
19
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
20
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!

लाभार्थ्यांना हक्काचे घरकूल द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:31 IST

मोहाडी : येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकूल योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना ...

मोहाडी : येत्या २०२२ पर्यंत प्रत्येक गरिबाला घरकूल योजनेचा लाभ देण्याची केंद्र सरकारची योजना आहे. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना सुरू करण्यात आली आहे. परंतु मोहाडी तालुक्यातील ७७ ग्रामपंचायतींच्या घरकुलाच्या ‘ड’ यादीचा ग्रामपंचायत ऑपरेटर व सचिवांनी सर्व्हे करते वेळी दुजाभाव करून खऱ्या लाभार्थ्यांना डावलून त्यांचे अर्ज ऑनलाइन केले नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या ‘ड’ यादीनुसार खऱ्या लाभार्थ्यांची नावे सुटल्याने घरकुलांच्या ‘ड’ यादीत मोठा घोळ झाला आहे. तरी तत्काळ दुरुस्ती करून ग्रामपंचायीच्या ठरावानुसार ‘ड’ यादीतील नाव सुटलेल्या लाभार्थीचे नाव ऑनलाइन करून गरजवंत लाभार्थींचा ‘ब’ यादीत समावेश करण्याची मागणी अखिल भारतीय ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष व माजी ग्रा.प. सदस्य नितीन लिल्हारे यांनी केली आहे.

मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द, पिंपळगाव, उसर्रा, आंधळगाव, बडेगाव, डोंगरगाव, काण्हळगाव, टांगा, ताडगाव, धोप, जांब, हिवरा, हरदोली, काटी, कान्द्री आदी गावांत नाव सुटलेल्या लाभार्थींबरोबर सरपंच यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

सालई खुर्द येथील रामदास लिल्हारे, दिलीप मांढरे, कुशवलाल लिल्हारे, भगवान नागपुरे, शिवलाल मांढरे, प्रभू लिल्हारे, फिरतलाल सव्वालाखे, मनोज आंबाडारे, रवींद्र चचिरे, दुलीचंद उरकुडे, संकपाल ठाकरे, विठोबा मेश्राम, राजेंद्र मेश्राम, अर्जुन लिल्हारे, राजू अटराहे आदी लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ न मिळाल्याने हे लोक अजूनही कच्च्या घरातच वास्तव्यास आहेत.

ज्यांचे बीपीएल यादीत नाव असेल, अशा लाभार्थ्यांनाच पूर्वी घरकुलाचा लाभ मिळत असे. त्यामुळे पात्र असूनही अनेक लोकांना घरकुलाच्या लाभापासून वंचित राहावे लागत होते. परंतु आता ज्यांचे कौलारू घर असेल, मातीचे, कुडाचे किंवा कच्च्या विटांचे असेल, अशा लाभार्थ्यांना सरसकट घरकुलाचा लाभ देण्याचे प्रधानमंत्र्यांनी जाहीर केले. त्यासाठी पंतप्रधान आवास योजना, रमाई घरकूल योजना व शबरी घरकूल योजना तयार केली आहे. परंतु, मोहाडी तालुक्‍यातील सालई खुर्द येथील शेकडो लाभार्थी अल्पभूधारक शेतकऱ्यांचे घर मातीचे व कौलारू आहे. पावसाळ्यात जागोजागी गळत असल्याने घरावर झाकण्यासाठी पाल घ्यावे लागत असल्याने आर्थिक झळ सोसावी लागते.

अनेकांना पक्‍के घर असूनही घरकुलाचा लाभ मिळाला आहे. परंतु, पात्र असूनही काही नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळाला नाही. त्यामुळे त्यांना आपल्या मोडक्‍या, कच्च्या घरातच दिवस कंठावे लागत आहेत.

खोट्यांना लाभ, खरे वंचित

सरकारने दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना अनेक सवलती व विविध योजनांचे लाभ दिले आहेत. पण, काही जणांनी आर्थिकदृष्ट्या सधन असतानाही दारिद्र्यरेषेखालील अर्थात बीपीएल यादीत आपले नाव चढविले आहे. असे नागरिक घरकूल व इतर अनेक योजनांचा लाभ घेत आहेत. अशा खोट्यांना लाभ मिळत असताना खरे गरीब नागरिक लाभापासून वंचित आहेत. जिल्हाभरात अशी अनेक प्रकरणे असून, याची व्यापक चौकशी करण्याची मागणी अखिल भारतीय ओबीसी संघाचे तालुका अध्यक्ष व मा. ग्रामपंचायत सदस्य नितीन लिल्हारे यांनी केली आहे.