शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:52 IST

जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे.

ठळक मुद्देरेती तस्करीला उधाण : खनिकर्म व महसूल विभागाचे साटेलोटे, रेतीचे प्रचंड साठे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे. खनिकर्म आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी रेती तस्करांच्या दावणीला बांधल्याचे दिसत आहे. कारवाईचा केवळ फार्स करून तस्करांना रेतीघाट मोकळे करून दिले जात आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या विशाल पात्रात रेतीचा प्रचंड खजाना आहे. वैनगंगेतील रेतीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच या रेतीचे उत्खनन करण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु असते. वैनगंगेसोबतच जिल्ह्यातील चुलबंद, सुरनदी, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नाल्यांमधूनही रेतीचे उत्खनन केले जाते. रेती उत्खननासाठी महसूल विभाग लिलावाच्या माध्यमातून कंत्राट दिले जाते. नियमानुसार याठिकाणी उत्खनन करणे गरजेचे असते. यातील महत्वाचा नियम म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त असेच उत्खनन करावे लागते. रात्रीच्यावेळी उत्खनन करता येत नाही. तसेच ट्रेझर बोर्ड अथवा जेसीबी मशीनच्या साहायाने उत्खननावर प्रतिबंध असतो. पंरतु एकदा कंत्राट मिळाले की मनमानेल त्या पध्दतीने रेतीचे उत्खनन केले जाते. यंदा तर एकाही रेती घाटाचा लिलाव अद्याप झाला नाही. मात्र रेतीचे खुलेआम उत्खनन सुरु आहे. अहोरात्र रेतीचे वाहने धावत असतात. अनेकांनी तर घाटाचा नजिक रेतीचे साठे तयार केले आहे. या ठिकाणावरुन रेतीची विक्री केली जाते.अवैध रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागाची असते. उपविभागीय अधिकारी ते तलाठी यांची या रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी असते. त्यासाठी महसूल विभाग पथकही तयार करते. तहसीलदारांच्या नेतृत्वातील भरारी पथक कारवाई करते. पंरतू या कारवाईचेही मोठे गोडबंगाल असते. पोलीस विभागही या कारवाईत सहभागी होतात. परंतू अद्यापपर्यंत रेतीतस्करांवर मोठी कारवाई झाली नाही.भंडारा जिल्ह्यासह सर्वत्र वैनगंगेची रेती उपलब्ध होत आहे. लिलाव झाले नसतांनाही बांधकाम जोमात सुरु असल्याने ही रेती नेमकी कुणाच्या आशीर्वादाने पोहचते हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांचेच यात हात ओले केल्या जातात. मात्र या सर्व प्रकारात पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे.पर्यावरणप्रेमींचे दुर्लक्षवन्यजीवांचा संदर्भात गळा काढणारे पर्यावरण प्रेमी राज्यात सुरु असलेल्या रेती तस्करहीबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही. पर्यावरण विभागाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव करता येत नाही. मात्र भंडारा जिल्ह्यात लिलावापूर्वीच उत्खनन सुरु आहे. त्यामुळे पर्यारणाचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहतुकीमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. नद्यांची नैसर्गिक संरक्षण भिंत थडीही वाहतूकीसाठी खचविल्या जात आहे. हा सर्व प्रकार बिनबोभाट सुरु असतांना पर्यावरण प्रेमी मूग गिळून आहेत.