शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
3
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
4
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
5
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
6
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
7
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
8
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
9
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
10
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
11
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
12
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
13
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
14
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
15
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
16
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
17
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
18
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
19
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
20
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!

घाटांचा लिलाव नाही, बांधकाम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2018 23:52 IST

जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे.

ठळक मुद्देरेती तस्करीला उधाण : खनिकर्म व महसूल विभागाचे साटेलोटे, रेतीचे प्रचंड साठे

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील एकाही रेती घाटाचा लिलाव झाला नसतांना सर्वत्र बांधकाम मात्र जोमात सुरू आहे. या बांधकामासाठी येणारी रेती नेमकी कोठून येते, हे सांगायला कुण्या तज्ज्ञांची गरज नाही. लिलावापूर्वीच रेतीघाटांमध्ये मशीनच्या सहाय्याने खनन सुरू आहे. खनिकर्म आणि महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी रेती तस्करांच्या दावणीला बांधल्याचे दिसत आहे. कारवाईचा केवळ फार्स करून तस्करांना रेतीघाट मोकळे करून दिले जात आहे.भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या विशाल पात्रात रेतीचा प्रचंड खजाना आहे. वैनगंगेतील रेतीला प्रचंड मागणी आहे. त्यामुळेच या रेतीचे उत्खनन करण्यासाठी प्रचंड स्पर्धा सुरु असते. वैनगंगेसोबतच जिल्ह्यातील चुलबंद, सुरनदी, बावनथडी या मोठ्या नद्यांसह अनेक लहान नाल्यांमधूनही रेतीचे उत्खनन केले जाते. रेती उत्खननासाठी महसूल विभाग लिलावाच्या माध्यमातून कंत्राट दिले जाते. नियमानुसार याठिकाणी उत्खनन करणे गरजेचे असते. यातील महत्वाचा नियम म्हणजे सूर्योदय ते सूर्यास्त असेच उत्खनन करावे लागते. रात्रीच्यावेळी उत्खनन करता येत नाही. तसेच ट्रेझर बोर्ड अथवा जेसीबी मशीनच्या साहायाने उत्खननावर प्रतिबंध असतो. पंरतु एकदा कंत्राट मिळाले की मनमानेल त्या पध्दतीने रेतीचे उत्खनन केले जाते. यंदा तर एकाही रेती घाटाचा लिलाव अद्याप झाला नाही. मात्र रेतीचे खुलेआम उत्खनन सुरु आहे. अहोरात्र रेतीचे वाहने धावत असतात. अनेकांनी तर घाटाचा नजिक रेतीचे साठे तयार केले आहे. या ठिकाणावरुन रेतीची विक्री केली जाते.अवैध रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी महसूल विभागाची असते. उपविभागीय अधिकारी ते तलाठी यांची या रेती तस्करीवर आळा घालण्याची जबाबदारी असते. त्यासाठी महसूल विभाग पथकही तयार करते. तहसीलदारांच्या नेतृत्वातील भरारी पथक कारवाई करते. पंरतू या कारवाईचेही मोठे गोडबंगाल असते. पोलीस विभागही या कारवाईत सहभागी होतात. परंतू अद्यापपर्यंत रेतीतस्करांवर मोठी कारवाई झाली नाही.भंडारा जिल्ह्यासह सर्वत्र वैनगंगेची रेती उपलब्ध होत आहे. लिलाव झाले नसतांनाही बांधकाम जोमात सुरु असल्याने ही रेती नेमकी कुणाच्या आशीर्वादाने पोहचते हे कुणालाही सांगण्याची गरज नाही. कनिष्ठांपासून वरिष्ठांपर्यंत सर्वांचेच यात हात ओले केल्या जातात. मात्र या सर्व प्रकारात पर्यावरणाची प्रचंड हानी होत आहे.पर्यावरणप्रेमींचे दुर्लक्षवन्यजीवांचा संदर्भात गळा काढणारे पर्यावरण प्रेमी राज्यात सुरु असलेल्या रेती तस्करहीबद्दल एक शब्दही बोलायला तयार नाही. पर्यावरण विभागाची परवानगी असल्याशिवाय कोणत्याही रेतीघाटाचा लिलाव करता येत नाही. मात्र भंडारा जिल्ह्यात लिलावापूर्वीच उत्खनन सुरु आहे. त्यामुळे पर्यारणाचे प्रचंड नुकसान होत आहे. वाहतुकीमुळे बांधकाम विभागाच्या रस्त्यांचेही नुकसान झाले आहे. नद्यांची नैसर्गिक संरक्षण भिंत थडीही वाहतूकीसाठी खचविल्या जात आहे. हा सर्व प्रकार बिनबोभाट सुरु असतांना पर्यावरण प्रेमी मूग गिळून आहेत.