शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
3
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
4
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
5
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
6
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
7
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
8
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
9
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
10
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
11
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
12
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
13
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
15
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
16
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर
17
गुरुचरित्रात ‘असे’ येते गणेशाचे अद्भूत वर्णन; बाप्पाच्या महात्म्याचा संदर्भ कुठे, कसा येतो?
18
BMC School: १३ वर्षांत मुंबई महापालिकेच्या १३१ मराठी शाळा बंद!
19
मुलांच्या उच्च शिक्षणाची चिंता सतावतेय? SIP, SSY आणि PPF मधून करा करोडपती होण्याची तयारी!
20
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!

घंटानाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:40 IST

३१ आॅक्टोबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करण्यात यावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजुनी पेन्शनची मागणी : पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ३१ आॅक्टोबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांची जुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी, २३ आॅक्टोबर २०१७ चा अन्यायकारक शासननिर्णय रद्द करण्यात यावे या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटन जिल्हा शाखेच्या वतीने जिल्हा परिषद समोर घंटानाद आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी मागण्यांचे निवेदन पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना सोपविल्यानंतर या आंदोलनाची सांगता करण्यात आली.या आंदोलनाचे नेतृत्व संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष मडामे यांनी केले. या आंदोलनात जिल्ह्यातील शेकडो कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषद समोर आयोजित आंदोलनाला विविध संघटनांच्या पदाधिकाºयांनी मार्गदर्शन केले. शासनसेवेत ३१ आॅक्टोबर २००५ रोजी व नंतर नियुक्त होणाºया कर्मचाºयांना महाराष्ट्र नागरी सेवा अधिनियमांतर्गत पेंशन योजना बंद करून नवीन परिभाषीत अंशदायी पेंशन योजना व राष्ट्रीय योजना लागू करण्यात आली. नागपूर अधिवेशनात ५० हजार कर्मचाºयांसह संघटनेच्या पदाधिकाºयांनी मुंडन आक्रोश मोर्चा काढला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी सर्व कर्मचाºयांना जुनी पेंशन योजना लागू करण्याचा विचार करू असे आश्वासन दिले होते. या आश्वासनाला तीन महिन्यांचा काळ उलटला असला तरी त्याबाबत अद्यापही कुठलाही शासननिर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे कर्मचाºयांमध्ये असंतोष पसरला आहे.ईश्वराला जागे करण्यासाठी त्यांच्यासमोर घंटानाद करावा लागतो त्याप्रमाणे शनिवारला शेकडो कर्मचाºयांच्या उपस्थितीत घंटानाद करून आश्वासनाची आठवण करून देण्यात आली.शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याशी चर्चा करून निवेदन दिले. आंदोलनात माजी खासदार नाना पटोले, जि.प. सभापती धनेंद्र तुरकर, जि.प. सदस्य होमराज कापगते यांनी आंदोलनकर्त्यांशी भेट घेऊन चर्चा केली. आंदोलनात महाराष्ट्र राज्य जुनी पेंशन हक्क संघटनेचे जिल्हा पदाधिकारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले होते.नियोजित स्थळ बदलल्याने तारांबळजुनी पेंशन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभर घंटानाद आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्याचे ठरविण्यात आले होते. मात्र आंदोलनकर्त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे आंदोलनकर्त्यांना सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करावे लागले.