शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

स्वच्छता अभियानापासून सर्वसामान्य अद्याप दूरच !

By admin | Updated: February 23, 2015 01:03 IST

महाराष्ट्राला संत गाडगेबाबा हे थोर व्यक्तिमत्त्व लाभले. त्यांनी राबविलेली स्वच्छता अभियान आता देशभरात राबविण्यात येत आहे....

प्रशांत देसाई भंडारामहाराष्ट्राला संत गाडगेबाबा हे थोर व्यक्तिमत्त्व लाभले. त्यांनी राबविलेली स्वच्छता अभियान आता देशभरात राबविण्यात येत आहे. मात्र, स्वच्छता अभियानात ग्रामीण भागापेक्षा शहरी भाग मागासलेला आहे. केवळ १६ टक्केच शहरवासीयांनी या अभियानात सहभाग घेतला असल्याचे समोर आले आहे. त्यांच्या तुलनेत शालेय विद्यार्थ्यांनी यात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून परिसर स्वच्छतेवर भर दिला. या आकडेवारीवरून सर्वसामान्य अद्याप अभियानापासून दूरच असल्याचे चित्र दिसून येत आहे.गाडगेबाबांनी ज्यावेळी हे कार्य केले त्यावेळी लोकांनी त्यांना हशात काढले. मात्र, त्यांनी स्वच्छतेचा ध्यास सोडला नाही. त्यांच्या कार्याची दखल घेऊन राज्यात तत्कालीन ग्रामीण विकास मंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांनी त्यांच्या नावाने 'संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान' सुरू केली. यासोबतच निर्मल ग्राम योजनाही शासनाने अंंमलात आणली आहे. अनेक गावे यातून स्वच्छ झालीत, पुरस्कार मिळाला मात्र त्यानंतर काय? पुढे पाठ मागे सपाट अशीच परिस्थिती सर्वत्र दिसून येत आहे.अमरावती जिल्ह्यातील एका धोबी कुटूंबात गाडगेबाबांचा जन्म १८७६ मध्ये झाला. त्यांनी आयुष्यभर स्वच्छतेचा संदेश देऊन चळवळ राबविली. १९५७ मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर ही चळवळ थंडावली. मात्र, त्यांनर आर. आर. पाटील यांच्या रूपात असलेले ग्रामीण विकास मंत्री यांनी गाडगेबाबांच्या नावाने अभियानाला जीवंत रूप देण्याचा विळा उचलला. गाडगेबाबांची 'ती' चळवळ आता देशभरात प्रेरणादायी ठरून एका शिखरावर पोहचली आहे.'स्वच्छ भारत' अभियानांतर्गत येणाऱ्या पाच वर्षामध्ये संपूर्ण देश स्वच्छ करण्याचा निर्धार शासनाने केला आहे. हे अभियान सुरू होऊन सुमारे पाच महिन्याचा कालावधी लोटला आहे. मात्र, शहरातील नागरिक या अभियानापासून अद्यापही कोसोदूर असल्याचे चित्र दिसून येत आहे. प्रशासनातर्फे विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविल्यानंतरही शहरातील तब्बल ८४ टक्के लोकांनी अद्यापही या अभियानात सहभाग घेतलेला नाही. अभियानाच्या जनजागृतीसाठी शासनाने विविध उपक्रम राबविले. प्रत्येकाकडून कचरा निर्माण होत असतो. मात्र, निर्माण झालेला कचरा दुसरा कोणीतरी उचलावा, अशी मानसिकता नागरिकांची असते. यामध्ये बदल होत असला तरी, आपल्या परिसरातील कचरा आपणच उचलावा, आणि आपणच आपले आरोग्य राखण्यासाठी पुढाकार घ्यावा, ही मानसिकता रूजविण्याची आवश्यकता आहे.कचरा विलगीकरणाकडे कानाडोळासुक्या कचऱ्यामध्ये काच, चामड्यांच्या वस्तू, कागद, प्लास्टिक, थर्माकोल, लाकूड सामानासह अन्य वस्तू येतात. तर फळे, खाद्यपदार्थ, भाजीपाला, अंडी तसेच टाकाऊ पदार्थ या बाबीला ओला कचरा असे म्हटले जाते. घरात निर्माण झालेला कचरा घंटागाडीमध्ये टाकण्यापूर्वी या कचऱ्याचे ओला आणि सुका असे विलगीकरण करण्याची आवश्यकता असते. मात्र, याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.२ आॅक्टोबर २०१४ पासून देशभरात सुरू झालेले स्वच्छ भारत अभियान २ आॅक्टोबर २०१९ रोजी संपणार आहे. या पाच वर्षात या योजनेसाठी १ लाख ९६ हजार ९ कोटी रूपये खर्चाचे नियोजन आहे. ग्रामीण आणि शहरी भागात सार्वजनिक शौचालयांची संख्या वाढविणे, प्रत्येक घरामध्ये शौचालय उभारणे, याबरोबरच स्वच्छ पाणी पुरवठा करणे तसेच विविध वस्त्यांबरोबरच रस्ते, फुटपाथ आदी स्वच्छ ठेवण्यारचा यात समावेश आहे.