शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
6
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
7
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
8
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
9
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
10
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
11
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
12
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
13
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
14
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
15
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
16
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
17
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
18
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
19
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य नागरिक हाच आमचा केंद्रबिंदू

By admin | Updated: November 1, 2015 00:46 IST

मागील वर्षभरात राज्य सरकारने शेतकरी, शेतमजूर आणि तळागाळातील जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वर्षभरात अनेक महत्वाचे निर्णय घेतले.

राज्य सरकारची वर्षपूर्ती : आमदारांचा पत्रपरिषदेत आशावादभंडारा : मागील वर्षभरात राज्य सरकारने शेतकरी, शेतमजूर आणि तळागाळातील जनतेला केंद्रबिंदू मानून त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी वर्षभरात अनेक महत्वाचे निर्णय घेतले. सरकारने महिला, तरुण, विद्यार्थी, दलित, आदिवासी, उद्योजक, अल्पसंख्यांक अशा विविध घटकांसाठी काम केले. पहिल्याच वर्षात सर्वसामान्यांपर्यंत कायम नाळ जुळून राहिलेले भाजप सरकार यापुढेही सामान्यांसाठीच काम करणार असल्याचा विश्वास तुमसरचे आमदार चरण वाघमारे, साकोलीचे आमदार राजेश काशीवार, भंडाऱ्याचे आमदार रामचंद्र अवसरे यांनी व्यक्त केला. राज्य सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त या आमदारद्वयींनी स्थानिक विश्रामगृहात संयुक्त पत्रपरिषद घेऊन वर्षभरातील कामांचा आढावा सांगितला. यावेळी आ.वाघमारे म्हणाले, राज्य सरकारने वर्षभरात जलयुक्त शिवार अभियान राबवून लाखो शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा करून दिली. पहिल्याच वर्षात राज्यातील साडे सहा हजार गावामध्ये ही योजना राबवून या योजनेतून गावे दुष्काळमुक्त करण्याचा प्रयत्न केला. ही योजना भंडारा जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. आमदार काशीवार म्हणाले, राज्य सरकारने सावकारी कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे सांगून भंडारा जिल्ह्यातील ९९४ शेतकऱ्यांचे १.५४ कोटी रुपये माफ केले. यापूर्वीच्या कोणत्याही सरकारने हा निर्णय घेतला नव्हता. हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे आ.काशीवार यांनी सांगितले.आ.काशीवार म्हणाले, धान उत्पादक शेतकऱ्यांसाठी कधी नव्हे ते पहिल्यांदा राज्य सरकारने २५० रुपयांचा बोनस जाहीर केला. आतापर्यंतच्या सरकारच्या काळात केंद्र शासन धानाला बोनस देत होते. यावर्षीपासून राज्य सरकारने धानाला हमीभाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे. ज्या शेतकऱ्यांची मत्स्यबिजे वाहून गेली होती अशा मासेमार बांधवांना २.१६ कोटींची मदत राज्य शासनाने दिल्याचे आमदार काशीवार यांनी सांगितले. आ.अवसरे म्हणाले, जात वैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी जाती पडताळणी समिती स्थापण्याचा निर्णय सरकारने घेतला. लोकसहभागावर आधारित वन्यजीवांचा विकास साधण्यासाठी जन वन योजना आखण्यात आली. व्याघ्र वन व वन्यजीव संरक्षणासाठी पुढाकार घेतल्याचे सांगितले. पत्रपरिषदेला डॉ.प्रकाश मालगावे, तारीक कुरेशी, प्रदीप पडोळे, विकास मदनकर यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)