शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Kanchenjunga Express Train Accident: बंगालमध्ये ट्रेनचा मोठा अपघात! कंचनजंगा एक्स्प्रेसला भरधाव मालगाडीची धडक, ५ जणांचा मृत्यू
2
बापरे! महागाईचा सर्जिकल स्ट्राइक; पाकिस्तानात टोमॅटो २०० रुपये किलो
3
अनंत अंबानी-राधिका मर्चंटचे प्री-वेडिंग शूट करणाऱ्या फोटोग्राफरचे मानधन किती? जाणून घ्या
4
सावधान! पावसाळ्यात समोसा, वडापाव खाणं पडू शकतं महागात; 'या' आजारांचा सर्वाधिक धोका
5
Market Cap: मुकेश अंबानींच्या रिलायन्सची हवा, LICची ही झाली मोठी कमाई; TCS सह 'या' कंपन्यांना नुकसान
6
'फादर्स डे' निमित्त जिनिलीयाने लिहिलेली पोस्ट वाचून रितेश देशमुख म्हणाला - 'बायको तुझ्याशिवाय...'
7
बॉक्स ऑफिसवर 'मुंज्या'चं राज्य; १० दिवसात मोडला 'मैदान'चा लाइफटाइम कलेक्शनचा रेकॉर्ड
8
नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू
9
Sanjay Raut : "रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न"
10
ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन
11
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
12
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
13
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
14
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
15
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
16
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
17
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
18
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
19
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

गांधीसागर तलावाची दुरवस्था

By admin | Published: July 25, 2015 1:15 AM

तुमसर शहरातील एकमेव व जून्या गांधीसागर तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावात वनस्पती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे.

स्वच्छतेची गरज : लाखोंचा खर्च व्यर्थ, प्रशासनाचे दुर्लक्षतुमसर : तुमसर शहरातील एकमेव व जून्या गांधीसागर तलावाची दुरवस्था झाली आहे. तलावात वनस्पती प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सौंदर्यीकरणाच्या नावाखाली करण्यात आलेला लाखोंचा खर्च पाण्यात गेल्याने त्याचे अस्तित्व धोक्यात आले आहे.तुमसर शहरात आंबेडकर तथा गांधी वॉर्डात जुना गांधीसागर तलाव आहे. या तलावाचे क्षेत्रफळ सुमारे ५० एकरावर आहे. पालिका प्रशासनाने या तलावातील बालोद्यानावर सुमारे ८५ लक्ष रुपये खर्च केले. तलाव सभोवताल सिमेटीकरण, तलावात उतरण्याकरिता सिमेंट पायऱ्या, स्ट्रीट लाईटची सोय करण्यात आली आहे. एकमेव विरुंगळा व फेरफटका मारण्याचे स्थळ म्हणून गांधीसागर तलाव आहे. मागील काही वर्षात या तलावाकडे निश्चितच तुमसर नगरपरिषदेने लक्ष दिले आहे.तलावाच्या पश्चिमेस उत्तर व दक्षिण दिशेला तलावात प्रचंड मोठे गवत, वनस्पती व कमळांची वेल पसरलेली आहे. या वनस्पतीमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. तलाव किनाऱ्यावर सध्या ही वेल मोठ्या प्रमाणात आहे. तलावाच्या सौंदर्यीकरणावर विशेषत: बांधकामावर मोठी रक्कम खर्च करण्यात आली. तलाव खोलीकरण करण्यात आले, बालोद्यान तयार करण्यात आले. त्यामूळे उन्हाळ्यात व हिवाळ्यात येथे तुमसरकरांची हजेरी लागत होते.तलावस्थळी प्रथम दश्य या कचरावजा, वनस्पतींचेच दिसून येते. त्यामूळे तलावाची दुरावस्था झाल्याचे चित्र दिसून येते. सौंदर्यीकरण व स्वच्छ करण्याचा विडा उचलणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी ग्रीन अ‍ॅन्ड क्लिन चा नारा दिला, पंरतु येथे तलाव क्लिन करण्याची गरज आहे.माईन्स प्रशासनाने गांधी सागर तलावाकरिता भरीव निधी दिला होता. पंरतु येथील बांधकामाच्या गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे, या प्रकरणाची शहरात केवळ चर्चा करण्यात आली. नगरपरिषदेला शासनाकडून शहर विकासाकरिता निधी प्राप्त होतो. या निधीतून हा तलाव क्लिन करण्याची गरज आहे. शहरात सध्या अनेक विकासात्मक कामे सुरु आहेत. या अंतर्गत गांधी सागर तलाव ग्रीन अ‍ॅन्ड क्लिन करण्याकरिता प्रयत्न करण्याची तसदी नगरपरिषद प्रशासनाने घेण्याची आवश्यकता आहे. मागील १० ते १५ वर्षांपासून गांधीसागर तलाव एक देखणा तलाव तयार करण्याची केवळ चर्चा करण्यात येत होती. प्रत्यक्ष कामे हाती घेण्याची गरज आहे. शहर विकास व नियोजनाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. यात गांधी सागर तलाव शंभर टक्के सौंदर्यीकरणाचा प्रस्ताव मांडण्याची गरज आहे. (तालुका प्रतिनिधी)