शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक दावा
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, दुपटीने लाभ; २ राजयोग करतील मालामाल, शुभ काळ!
6
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
7
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
8
शब्देविण संवादू... इमोजींची अकरा वर्षे: अबोल भावनांना मिळालेले 'रूप' आणि 'रंग'
9
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
10
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
11
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
12
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
13
डेस्कटॉप पुन्हा फॉर्मात! वेगवान कामगिरी आणि सोयीमुळे मागणीत वाढ
14
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
15
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
16
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
17
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
18
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
19
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
20
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग

३५ लक्ष रुपयांनी शेतकऱ्याची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST

भंडारा : शेकडा चार टक्के व्याजदराने घेतलेली रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली; पण दुसऱ्या दिवशी हस्तकामार्फत ३५ लक्ष ...

भंडारा : शेकडा चार टक्के व्याजदराने घेतलेली रक्कम शेतकऱ्याच्या बँक खात्यावर जमा केली; पण दुसऱ्या दिवशी हस्तकामार्फत ३५ लक्ष ८४ हजार रुपयांची उचल करून शेतकऱ्याची फसवणूक केल्याचा आरोप शेतकरी विजय खोब्रागडे यांनी केला आहे. यासंदर्भात बीटीबी सब्जीमंडीचे संचालक बंडू बारापात्रे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या निवेदनातून खोब्रागडे यांनी केली आहे.

निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, विजय खोब्रागडे आणि त्यांच्या पत्नीचे मोगरा येथे तलाठी सजाअंतर्गत ८ हेक्‍टर ३१ आर शेतजमीन होती. शेतीला पूरक व्यवसायासाठी त्यांनी डेरी फार्मकरिता देना बँक शाखा भंडारा येथून सन २०१४ मध्ये ५३ लक्ष रुपये कर्जाची उचल केली; परंतु व्यवसाय बुडाल्याने कर्जाची परतफेड करू न शकल्याने बँकेने कारवाईसाठी नोटीस बजावली. मोठ्या रकमेची आवश्यकता असल्याने अजय भोंगाडे यांच्या सूचनेवरून बीटीबी सब्जी मंडीचे संचालक बंडू बारापात्रे व पौर्णिमा बारापात्रे यांच्याकडून मार्च २०१९ मध्ये शेकडा ४ टक्के व्याजदराने तथा विजय खोब्रागडे यांच्याकडे असलेली शेतजमीन गहाण टाकून व कोरे धनादेश देण्याच्या अटीवर सदर रक्कम कर्जरूपाने देण्याचे ठरविण्यात आले, असे विजय खोब्रागडे यांनी निवेदनात नमूद केले आहे. ठरलेल्या अटीनुसार मोगरा शिवणी येथील शेतजमीन नमुना, सातबारा व आधार कार्ड व पासपोर्ट छायाचित्र व कोरे धनादेश देण्यात आले. यात ऑगस्ट २०१९ ते १३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत विजय खोब्रागडे यांच्या देना बँक शाखेतील खात्यामध्ये बारापात्रे यांनी 35 लाख 84 हजार रुपये जमा केले; परंतु ३ सप्टेंबर २०१९ ते १३ सप्टेंबर २०१९ या कालावधीत विविध धनादेशाद्वारे लक्षावधी रुपयांची उचल केली. सदर रक्कम बंडू बारापात्रे यांचे हस्तक अजय भोंगाडे व जगदीश वंजारी यांच्यामार्फत उचल करून फसवणूक केल्याच्या आरोप विजय खोब्रागडे यांनी केला आहे.

बँकेतील नोंदीवरून शेतकऱ्याच्या खात्यावर टाकलेली रक्कम परस्पर उचल केल्याचे दिसून येते. या आशयाची बाब बँक प्रशासनाला निदर्शनास आणून दिली; परंतु कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. या प्रकाराची कायदेशीर चौकशी होऊन न्याय मिळावा याकरिता अन्यायग्रस्त शेतकरी खोब्रागडे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना तक्रारीतून केली आहे.

कोट बॉक्स

सदर शेतजमिनीबाबत संपूर्ण व्यवहार पारदर्शकरीत्या करण्यात आला आहे. विजय खोब्रागडे यांनी लावलेले आरोप धादांत खोटे आहेत. जमिनीची रजिस्ट्री, सातबारा व फेरफार झाल्यानंतर तब्बल दीड वर्षानंतर त्यांनी हा आरोप लावणे म्हणजे कुठे तरी पाणी मुरत आहे. स्वतःचे पाप लपविण्यासाठी हा केलेला खोटा बिनबुडाचा आरोप आहे. न्यायालयामार्फत ‘दुधाचे दूध आणि पाण्याचे पाणी’ होईल. आम्ही कुठेही खोब्रागडे यांची फसवणूक केलेली नाही. उलट त्यांनीच आमची फसवणूक केली आहे. यासंदर्भात लाखनी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध तक्रार देऊनही कारवाई करण्यात आली नाही. बंडू बारापात्रे, संचालक, बीटीबी सब्जी मंडी, भंडारा.