तिसऱ्यांदा निघाली सोडत : आक्षेपांमुळे बदलला निर्णयभंडारा : ५२ सदस्यीय भंडारा जिल्हा परिषदेचा कार्यकाळ येत्या जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. त्यासाठी पहिल्यांदा फेब्रुवारी महिन्यात आरक्षण सोडत काढण्यात आली होती. त्यानंतर चार तालुक्यांना नगर पंचायतीचा दर्जा मिळाल्यानंतर एप्रिल महिन्यात सोडत काढण्यात आली. त्यावरील आक्षेपामुळे आज शनिवारला पुन्हा तिसऱ्यांदा चार जिल्हा परिषद क्षेत्राची सोडत काढण्यात आली.यात लाखांदूर तालुक्यातील भागडी जिल्हा परिषद क्षेत्र सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव होता. आता अनूसूचित जाती प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. साकोली तालुक्यातील किन्ही (एकोडी) पूर्वी अनूसूचित जाती प्रवर्गासाठी होता आता अनूसूचित जाती महिला प्रवर्गासाठी, लाखनी तालुक्यातील पालांदूर पूर्वी अनूसूचित जाती महिला प्रवर्गासाठी होता आता सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी तर मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी होता आता सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे आता पुन्हा नव्याने मतदारसंघ शोधण्याची वेळ काही जणांवर येणार आहे. (प्रतिनिधी)आरक्षणाला आक्षेपांचे ग्रहणयापूर्वी दोन वेळा आरक्षणाची घोषणा करण्यात आली होती. पहिल्या घोषणेनंतर चार तालुक्यांना नगरपंचायतीचा दर्जा देण्याची अधिसूचना निघाल्याने पहिले आरक्षण रद्द झाले. त्यानंतर जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणांची नव्याने रचना करुन नवे आरक्षण घोषित करण्यात आले. या आरक्षणाला आक्षेपाचे ग्रहण लागल्याने आज शनिवारला तिसऱ्यांदा चार जिल्हा परिषद क्षेत्राचे आरक्षण काढण्यात आले. चार एप्रिल रोजी झालेल्या आरक्षण सोडतीनंतर इच्छुक उमेदवारांनी संभाव्य क्षेत्र निवडून त्यादृष्टीने निवडणुकीची तयारी सुरु केली होती. मात्र आक्षेपामुळे पुन्हा जिल्हा परिषद क्षेत्र बदलले. त्यामुळे निवडणूक लढू पाहणाऱ्या इच्छुकांच्या मनसुब्यावर पाणी फेरल्या गेले.
चार जि.प. क्षेत्राचे बदलले आरक्षण
By admin | Updated: May 3, 2015 00:48 IST