शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

आठ महिन्यात बस अपघातात चौघांचा मृत्यू

By admin | Updated: December 13, 2014 22:32 IST

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर ४९ जण जखमी झाले. रापमं कडून

४९ जखमी : राज्य परिवहन मंडळाकडून अपघातग्रस्तांना ८२ लाखांचे वाटपप्रशांत देसाई - भंडारामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाचे बसने एप्रिल ते नोव्हेंबर २०१४ या आठ महिन्यात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात चौघांना आपले प्राण गमवावे लागले, तर ४९ जण जखमी झाले. रापमं कडून या आठ महिन्यात अपघातग्रस्तांना ८२ लाखांचे वाटप करण्यात आले. लोकवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हणून अनेकजण करतात. बस अपघातात विरुद्ध दिशेने आलेल्या किंवा मागून धडक दिलेल्यांना आपले प्राण गमवावे लागले. तर अनेकांना जखमी व्हावे लागले आहे. एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यात चौघांचा मृत्यू झाला असून ३४ व्यक्ती गंभीर जखमी तर ११ किरकोळ जखमी झाल्याची नोंद रापमं भंडारा विभागीय ्रकार्यालयात आहे. अपघातग्रस्तांना रापमं कडून तत्कालीन मदत, पी फॉर्म भरल्यानंतर अपघात नुकसान भरपाई, प्राणांकीत मदत व न्यायालयात दाद मागितल्यानंतर मदत दिली जात असते. अशा या प्रकारात राज्य परिवहन महामंडळाच्या भंडारा विभागाच्या माध्यमातून ८१ लाख ७५ हजार ८२२ रुपयांची आर्थिक मदत अपघातग्रस्तांना देण्यात आली आहे. एप्रिल महिन्यात एक, मे महिन्यात दोन व आॅक्टोबर महिन्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तत्कालीन मदतीच्या माध्यमातून रापमंने ९७ हजार ६०० रुपये, पी फॉर्मच्या माध्यमातून १ लाख ३९ हजार ८८५ रुपये, प्राणांकीत मदत म्हणून २ लाख ९० रुपये तर न्यायप्रविष्ठ प्रकरणांच्या निकालानंतर ७६ लाख ४८ हजार ३३७ रुपये वाटप करण्यात आलेले आहेत. एप्रिल २०१३ ते मार्च २०१४ पर्यंत भंडारा विभागातील बस अपघातात १० जणांना आपले प्राण गमवावे लागले आहे. तर ५५ व्यक्ती गंभीर जखमी झाले असून ४२ व्यक्ती किरकोळ जखमी झाले होते. यातील जखमींना ५३ हजार ३०० रुपयांची तातडीची मदत देण्यात आली. तर न्यायालयीन निकालानंतर १२ लाख ५६ हजार रुपये मृतकांच्या नातेवाईकांना देण्यात आले. वाहनचालकावर कारवाईअनेकदा बसचालकाला जबाबदार पकडून निलंबित करण्यात येते. नंतरर त्याची कार्यालयाच्या माध्यमातून विभागीय चौकशी करून त्यात तो दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करून दंड वसूल करण्यात येते.