शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates : कोसळधारा! मुंबईत पावसाची जोरदार बॅटींग; मध्य रेल्वेला फटका; नागरिकांना सतर्कतेचा इशारा
2
१८ महिने राहु-केतु गोचर: ५ मूलांकांना दुपटीने लाभ, गुंतवणुकीत फायदा; सुख-समृद्धी-भरभराट!
3
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
4
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
5
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
6
"तुझा नंबर पाठव, फ्लर्ट करायची इच्छा झालीये", टीव्ही अभिनेत्रीला दिग्गज मराठी अभिनेत्याचा मेसेज, म्हणाली- "तुझ्या बायकोला..."
7
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
8
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
9
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
10
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
11
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
12
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
13
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
14
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
15
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
16
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
17
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
18
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
19
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
20
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी

पिण्याच्या पाण्यासाठी पैशाचा महापूर

By admin | Updated: June 8, 2015 01:07 IST

उन्हाळ्याच्या दिवसात शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना ठंड पाणी पिल्याशिवाय पर्याय उरत नाही.

तहान झाली महाग : बाटलीबंद पाण्यासाठी कोट्यवधींचा खर्चरवींद्र चन्नेकर  बारव्हा उन्हाळ्याच्या दिवसात शुद्ध व स्वच्छ पाणी पिण्याची सवय असणाऱ्यांना ठंड पाणी पिल्याशिवाय पर्याय उरत नाही. यासाठी मनसोक्त पैशाची उधळण केली जाते. बाटलीबंद पाण्याची मागणी सर्वाधिक आहे. परंतु बाटली कोणत्या कंपनीची आहे याकडे दुर्लक्ष केल्या जाते. ‘चिल्ड’ हा शब्द आवर्जून तहानलेल्यांच्या तोंडात घर करून बसला असल्याने दुकानदारही मान्यता नसलेल्या किंवा जास्त कमीशन मिळेल त्या बाटल्यांचा गोरखधंदा बिनधास्तपणे करीत आहेत.लाखांदूर तालुक्यासह साकोली, सानगडी, वडसा, पवनी या ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर जोमात होतो. दररोज तालुक्यात २,५०० हजार बाटल्यांची विक्री होत असल्याची माहिती एका उद्योजकाने दिली. यासाठी एका दिवसाकाठी ५० हजार रुपये पाण्यासाठी खर्च होत आहे. उन्हाळ्याच्या दिवसात पाणी पिण्याचे प्रमाण वाढल्याने दररोज पिण्याचे पाणी नाकारून नागरिक रिस्क घेण्यापेक्षा बाटलीबंद शुद्ध आणि स्वच्छ पाणी वापरण्याला प्राधान्य देतात. मात्र सर्वांनाच पाणी विकत घेऊन पिण्यासाठी परवडत नाही. शासकीय यंत्रणेत पिण्याच्या पाण्यासाठी पैशाची तरतूद नसली तरीही अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या टेबलावर बॉटल असतात. कपाटात बॉक्स असतात. कोणतीही बैठक असो. मेळावा असो किंवा कार्यशाळा असो. यासाठी हजारो रुपये पाण्याच्या बाटलीसाठी राखीव ठेवलेले असतात. कधी यातीलच बाटल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या घरी पोहचत्या गेल्या जातात.एका दिवसात लाखांदूर तालुक्यात २,५०० बाटल्या विकल्या जातात. त्यासाठी ५० हजार रुपये खर्च, महिन्याकाठी १५ लाख रुपये तर वर्षाला जवळपास १ कोटी ८० लक्ष रुपये निव्वळ बाटलीबंद पिण्याच्या पाण्यासाठी खर्च होतो. बसस्टँड, हॉटेल्स, बियर बार, मंगल कार्यालये, शासकीय कार्यालय, कार्यक्रम, दवाखाने, पार्ट्या आदी ठिकाणी बाटलीबंद पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. कोणत्याही शासकीय यंत्रणेचा आपया पाणी पुरवठ्यावर विश्वास नाही. पूर्वी कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर किंवा अधिकाऱ्यांच्या टेबलावर पाण्याचा तांब्या आणि फुलपात्र असायचे. आता प्रत्येक कार्यक्रमात आणि टेबलवर पाण्याच्या बाटल्या ठेवलेल्या असतात. शुद्ध पाण्याची गरज फक्त अधिकारी किंवा श्रीमंत वर्गालाच आहे काय? बाटलीबंद पाणी विकत घेऊन पिण्याची क्षमता नाही. त्यांना शुद्ध पाणी पिण्याचा अधिकार नाही काय? नागरिकांना पुरवत असलेले पाणी इतके अशुद्ध आहे काय? याची उत्तरे ग्रामपंचायत व पदाधिकाऱ्यांनी देण्याची गरज आहे.बाटलीबंद पाणी पिल्यानंतर रिकाम्या बाटल्यांच्या प्रदूषणाला प्रश्न भविष्यात गंभीर परिणाम सामान्य नागरिकास भोगावयास नक्कीच भाग पाडणार.