शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारावर मांडला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:41 IST

आथली गावातील प्रकार: दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : अतिवृष्टीमुळे व आलेल्या पुरामुळे गावातील अनेकांच्या घरांची पडझड तथा शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी निर्देशांनुसार शेतीचे पंचनामे करून याद्या तयार करण्यात आल्या नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. मुख्य पूरग्रस्तांना बाजूला सारून, अन्य लोकांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारला लाखांदूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन सादर केले.

पावसाळ्यात तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात आथली गावात देखील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानीचा मोबदला मिळावा या हेतूने तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पंचनामे करून त्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी तलाठी व ग्रामसेवक यांना दिले होते. आथलीतील तलाठी व ग्रामसेवक यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करून कार्यरत कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण व याद्या तयार करायला लावले. 

कर्मचाऱ्यांनी शासन नियमांना तिलांजली देत ओलिताखाली असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू दाखविले तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ओलिताखाली दाखविले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची शेती कमी दाखविली. नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांच्या पूर्णतः शेतीचे नुकसान दाखविले आहे. 'आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपय्या' अशी गत आथली येथील शेतकऱ्यांची आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मनमर्जीतील लोकांकरीता पैसे घेऊन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आहे. निवेदन देताना पुरुषोत्तम ठाकरे, बाजार समितीचे संचालक डेलीस ठाकरे, सरपंच बागडे, चंद्रशेखर ठाकरे, दिनेश सोनपिंपळे, नरेश बेदरे, नरेश प्रधान, मेघशाम सुखदेवे, पुंडलिक नागोसे, श्रीहरी ठाकरे, प्रदीप भावे, देवा करकाडे, शीलवंत बांबोळे, पुरुषोत्तम कुंभलकर यांच्यासह ८६ शेतकरी उपस्थित होते. 

वेळेवर केले ठिय्या आंदोलन निवेदन सादर करताना लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार उपस्थित नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी काही काळ तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केला. त्यानंतर नायब तहसीलदार धकाते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीbhandara-acभंडारा