शहरं
Join us  
Trending Stories
1
...त्यामुळे कोणालाच वाचविण्याची संधी मिळाली नाही; अमित शाह यांनी सांगितले मृतांचा आकडा कधी जाहीर होणार
2
एअर इंडियाच्या विमानाचे दोन्ही को-पायलट मुंबई, बदलापूरचे; दोघांनीही निघताना घरच्यांना फोन केलेला, पण... 
3
एअर इंडियाच्या विमानात दोन प्रसिद्ध उद्योगपती देखील होते; एकाचे अख्खे कुटुंबच...
4
अल्पवयीन कबड्डीपटूवर बलात्कार; दोन क्रीडा प्रशिक्षकांची तुरुंगात रवानगी
5
काय तो चमत्कार! तो प्रवासी विमानात सापडला नाही, तर कोसळत असताना ४२५ फुटांवरून खाली पडला
6
Air India plane crash: उड्डाण केले अन् ३० सेंकदानंतरच जळून खाक! बघा विमान अपघाताचा नवा व्हिडीओ
7
Plane Crash: मृतांच्या कुटुंबीयांना 'टाटा'चा आर्थिक आधार! प्रत्येकी एक कोटी देणार, चंद्रशेखरन काय म्हणाले?
8
मोठी बातमी! अहमदाबादच्या विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दोघांचा मृत्यू; पती-पत्नी मुलाला भेटायला निघालेले...
9
Air India Plane Crash: विजय रुपाणींचा हा खरंच अपघातापूर्वीचा फोटो आहे का? जाणून घ्या सत्य
10
Vijay Rupani Death: पत्नी आणि मुलीला भेटायला निघाले अन्...; गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही अपघातात मृत्यू
11
म्यानमारमध्ये जन्म, गुजरातमध्ये राजकीय कारकीर्द; जाणून घ्या माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याबद्दल...
12
Ahmedabad Plane Crash Survivor : हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
13
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
14
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
15
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
16
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
17
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
18
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
19
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
20
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला

संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारावर मांडला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:41 IST

आथली गावातील प्रकार: दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : अतिवृष्टीमुळे व आलेल्या पुरामुळे गावातील अनेकांच्या घरांची पडझड तथा शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी निर्देशांनुसार शेतीचे पंचनामे करून याद्या तयार करण्यात आल्या नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. मुख्य पूरग्रस्तांना बाजूला सारून, अन्य लोकांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारला लाखांदूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन सादर केले.

पावसाळ्यात तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात आथली गावात देखील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानीचा मोबदला मिळावा या हेतूने तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पंचनामे करून त्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी तलाठी व ग्रामसेवक यांना दिले होते. आथलीतील तलाठी व ग्रामसेवक यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करून कार्यरत कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण व याद्या तयार करायला लावले. 

कर्मचाऱ्यांनी शासन नियमांना तिलांजली देत ओलिताखाली असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू दाखविले तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ओलिताखाली दाखविले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची शेती कमी दाखविली. नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांच्या पूर्णतः शेतीचे नुकसान दाखविले आहे. 'आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपय्या' अशी गत आथली येथील शेतकऱ्यांची आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मनमर्जीतील लोकांकरीता पैसे घेऊन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आहे. निवेदन देताना पुरुषोत्तम ठाकरे, बाजार समितीचे संचालक डेलीस ठाकरे, सरपंच बागडे, चंद्रशेखर ठाकरे, दिनेश सोनपिंपळे, नरेश बेदरे, नरेश प्रधान, मेघशाम सुखदेवे, पुंडलिक नागोसे, श्रीहरी ठाकरे, प्रदीप भावे, देवा करकाडे, शीलवंत बांबोळे, पुरुषोत्तम कुंभलकर यांच्यासह ८६ शेतकरी उपस्थित होते. 

वेळेवर केले ठिय्या आंदोलन निवेदन सादर करताना लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार उपस्थित नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी काही काळ तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केला. त्यानंतर नायब तहसीलदार धकाते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीbhandara-acभंडारा