शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

संतप्त पूरग्रस्त शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयाच्या दारावर मांडला ठिय्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 11:41 IST

आथली गावातील प्रकार: दोषींवर निलंबनाची कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क लाखांदूर : अतिवृष्टीमुळे व आलेल्या पुरामुळे गावातील अनेकांच्या घरांची पडझड तथा शेतमालाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. शेतकऱ्यांना त्यांच्या झालेल्या नुकसानीचा मोबदला मिळावा, यासाठी निर्देशांनुसार शेतीचे पंचनामे करून याद्या तयार करण्यात आल्या नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आला. मुख्य पूरग्रस्तांना बाजूला सारून, अन्य लोकांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आले. संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोमवारला लाखांदूर तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन करत तहसीलदारांना निवेदन सादर केले.

पावसाळ्यात तालुक्यात सर्वत्र अतिवृष्टी व पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यात आथली गावात देखील अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या शेतीचे नुकसान झाले होते. नुकसानीचा मोबदला मिळावा या हेतूने तलाठी व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे व ग्रामस्थांचे पंचनामे करून त्यांच्या याद्या तयार करण्याचे निर्देश लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार यांनी तलाठी व ग्रामसेवक यांना दिले होते. आथलीतील तलाठी व ग्रामसेवक यांनी या सूचनेकडे दुर्लक्ष करून कार्यरत कर्मचाऱ्यांना सर्वेक्षण व याद्या तयार करायला लावले. 

कर्मचाऱ्यांनी शासन नियमांना तिलांजली देत ओलिताखाली असलेल्या शेतकऱ्यांना कोरडवाहू दाखविले तर कोरडवाहू शेतकऱ्यांना ओलिताखाली दाखविले. ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांची शेती कमी दाखविली. नुकसान न झालेल्या शेतकऱ्यांच्या पूर्णतः शेतीचे नुकसान दाखविले आहे. 'आमदनी अठ्ठणी, खर्चा रुपय्या' अशी गत आथली येथील शेतकऱ्यांची आहे. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी मनमर्जीतील लोकांकरीता पैसे घेऊन केल्याचा आरोप आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी आहे. निवेदन देताना पुरुषोत्तम ठाकरे, बाजार समितीचे संचालक डेलीस ठाकरे, सरपंच बागडे, चंद्रशेखर ठाकरे, दिनेश सोनपिंपळे, नरेश बेदरे, नरेश प्रधान, मेघशाम सुखदेवे, पुंडलिक नागोसे, श्रीहरी ठाकरे, प्रदीप भावे, देवा करकाडे, शीलवंत बांबोळे, पुरुषोत्तम कुंभलकर यांच्यासह ८६ शेतकरी उपस्थित होते. 

वेळेवर केले ठिय्या आंदोलन निवेदन सादर करताना लाखांदूरचे तहसीलदार वैभव पवार उपस्थित नसल्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी काही काळ तहसील कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या आंदोलन केला. त्यानंतर नायब तहसीलदार धकाते यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेत निवेदन स्वीकारले.

टॅग्स :Farmers Protestशेतकरी आंदोलनFarmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीbhandara-acभंडारा