शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

वैनगंगेत पाच जणांनी घेतली उडी; दोघे बचावले, एकाचा मृत्यू तर दोन बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 19:58 IST

Bhandara News भंडारा शहराची जीवनदायी असलेली वैनगंगा अलीकडे सुसाईड पाॅइंट झाली असून दोन दिवसात वैनगंगेत पाच जणांनी उडी घेतली. दोघांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. तर एकाचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देवैनगंगा झाली सुसाईड पाॅइंट पोलिसांच्या सतर्कतेने वाचले दोघांचे प्राण

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : शहराची जीवनदायी असलेली वैनगंगा अलीकडे सुसाईड पाॅइंट झाली असून दोन दिवसात वैनगंगेत पाच जणांनी उडी घेतली. दोघांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. तर एकाचा मृत्यू झाला. दोघांचा शोध गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. (Five people jumped in Wainganga; Two rescued, one dead and two missing)

भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ शोधमोहीम सुरू असताना ३० वयोगटातील दोन तरुणांनी वैनगंगेच्या लहान पुलावरून उडी घेतली. हा प्रकार बचाव पथकातील पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ तिकडे बोट वळवून या दोघांना बाहेर काढले.

दरम्यान, बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाने वैनगंगेत उडी घेतली. तर गुरुवारी सकाळी एका तरुणाने मोठ्या पुलावरून उडी घेतली. शोधमोहीम सुरू असताना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. राहुल वामन तायडे (३०) रा. पिंपळगाव, ता. लाखनी असे मृताचे नाव आहे. त्याने मंगळवारी रात्री उडी घेतली होती. मोटारसायकल पुलाजवळ ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. नेमकी त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र कळू शकले नाही. भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

किराणा व्यावसायिक व लाँड्रीचालक बचावले

येथील सहकारनगरातील ३० वर्षीय किराणा व्यावसायिक आणि तकिया वाॅर्डातील हनुमान नगरातील लाँड्रीचालकाने बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता वैनगंगेच्या लहान पुलावरून आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. त्याच वेळी एका बेपत्ता तरुणाची शोधमोहीम सुरू होती. बोटीत असलेले भंडारा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस नायक नागोसे आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य सीताराम कोल्हे, अमरसिंह रंगारी, अशोक देवगडे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तत्काळ तरुणांनी उडी टाकलेल्या ठिकाणी बोट वळविली. या दोघांनाही महत्प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणाने वैनगंगेत उडी घेतली होती हे मात्र कळू शकले नाही. भंडारा शहरचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांनी या दोघा तरुणांना समज देऊन घरी रवाना केले. दरम्यान, बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता. त्यांची नावेही कळू शकली नाही.

टॅग्स :Deathमृत्यू