शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

वैनगंगेत पाच जणांनी घेतली उडी; दोघे बचावले, एकाचा मृत्यू तर दोन बेपत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 05:00 IST

भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ शोधमोहीम सुरू असताना ३० वयोगटातील दोन तरुणांनी वैनगंगेच्या लहान पुलावरून उडी घेतली. हा प्रकार बचाव पथकातील पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ तिकडे बोट वळवून या दोघांना बाहेर काढले.

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शहराची जीवनदायी असलेली वैनगंगा अलीकडे सुसाईड पाॅइंट झाली असून दोन दिवसात वैनगंगेत पाच जणांनी उडी घेतली. दोघांना वाचविण्यात पोलिसांना यश आले. तर एकाचा मृत्यू झाला. दोघांचा शोध गुरुवारी सायंकाळपर्यंत सुरू होता. या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे.भंडारा शहरालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या लहान पुलावरून मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका तरुणाने उडी घेतली. याबाबतची माहिती पोलिसांना देण्यात आली. मात्र रात्री अंधार असल्याने शोध घेता आला नाही. दरम्यान, बुधवारी सकाळपासूनच शोधमोहीम सुरू होती. वैनगंगा नदीच्या मोठ्या पुलाजवळ शोधमोहीम सुरू असताना ३० वयोगटातील दोन तरुणांनी वैनगंगेच्या लहान पुलावरून उडी घेतली. हा प्रकार बचाव पथकातील पोलिसांना दिसला. त्यांनी तत्काळ तिकडे बोट वळवून या दोघांना बाहेर काढले.दरम्यान, बुधवारी रात्री पुन्हा एका तरुणाने वैनगंगेत उडी घेतली. तर गुरुवारी सकाळी एका तरुणाने मोठ्या पुलावरून उडी घेतली. शोधमोहीम सुरू असताना एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. राहुल वामन तायडे (३०) रा. पिंपळगाव, ता. लाखनी असे मृताचे नाव आहे. त्याने मंगळवारी रात्री उडी घेतली होती. मोटारसायकल पुलाजवळ ठेवल्याने हा प्रकार उघडकीस आला होता. नेमकी त्याने कोणत्या कारणाने आत्महत्या केली हे मात्र कळू शकले नाही. भंडारा पोलीस अधिक तपास करीत आहेत.

किराणा व्यावसायिक व लाँड्रीचालक बचावले- येथील सहकारनगरातील ३० वर्षीय किराणा व्यावसायिक आणि तकिया वाॅर्डातील हनुमान नगरातील लाँड्रीचालकाने बुधवारी सायंकाळी ५.१५ वाजता वैनगंगेच्या लहान पुलावरून आत्महत्या करण्यासाठी उडी मारली. त्याच वेळी एका बेपत्ता तरुणाची शोधमोहीम सुरू होती. बोटीत असलेले भंडारा ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक मंगेश नागरगोजे, पोलीस नायक नागोसे आणि जिल्हा शोध व बचाव पथकातील सदस्य सीताराम कोल्हे, अमरसिंह रंगारी, अशोक देवगडे यांना हा प्रकार दिसला. त्यांनी तत्काळ तरुणांनी उडी टाकलेल्या ठिकाणी बोट वळविली. या दोघांनाही महत्प्रयत्नांनंतर सुखरूप बाहेर काढले. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणाने वैनगंगेत उडी घेतली होती हे मात्र कळू शकले नाही. भंडारा शहरचे ठाणेदार प्रदीप पुल्लरवार यांनी या दोघा तरुणांना समज देऊन घरी रवाना केले. दरम्यान, बेपत्ता असलेल्या दोन तरुणांचा सायंकाळपर्यंत शोध सुरू होता. त्यांची नावेही कळू शकली नाही.

 

टॅग्स :Policeपोलिसriverनदी