शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारने करून दाखवले! ११ वर्षांत भारतातील गरिबी किती घटली? आकडेवारीच समोर आली
2
“राहुल गांधी असामान्य नेते, भाजपा, मोदींना खोटे बोलण्याचा नोबेल पुरस्कार द्यावा”: संजय राऊत
3
२३ पानांचं प्रेमपत्र लिहीत पुतण्यानं उचललं टोकाचं पाऊल! म्हणाला "काका आय लव्ह यु, मी तुमच्याशिवाय..."
4
पाकिस्तान पुन्हा तोंडावर पडला; UN मध्ये मागितले ४ महत्वाच्या समित्यांचे अध्यक्षपद, मिळाला 'ठेंगा'
5
“नितेशने जपून बोलावे, भान ठेवायला हवे, आपण महायुतीमध्ये आहोत हे विसरता कामा नये”: निलेश राणे
6
बकरी ईदच्या दिवशीच वृद्धाने दिली स्वतःची कुर्बानी; मशिदीत नमाज अदा केली अन् नंतर...
7
आंतरराष्ट्रीय स्तरावर हात पसरणारा पाकिस्तान भरतोय नेत्यांचे खिसे! सरकारने वाढवला पाचपटींनी पगार
8
मुंबई गोवा महामार्गांवर CNG टँकरची शिक्षकांच्या ट्रॅव्हल्सला धडक; गॅस गळतीमुळे घराने घेतला पेट
9
HDFC बँकेच्या CEO वर कारवाईची मागणी, ₹२५ कोटी घोटाळ्याचा आरोप; जाणून घ्या प्रकरण
10
विराट कोहलीसारखी निष्ठा कायम राहील का? १८ वर्षांपर्यंत तुमचाही संयम टिकू शकेल का?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींचे शुभ कल्याण, ६ राशींना काहीसा संमिश्र काळ; तुमची रास कोणती?
12
दहशतवादी आणि पीडित एकाच तराजूत नाहीच..; जयशंकर यांचा पुन्हा एकदा जगाला स्पष्ट संदेश
13
फुफ्फुस निकामी, सतत दम्याचा त्रास अन्..! दुर्धर आजारावर मात करुन ३ वर्षांनी मराठी अभिनेत्याचं कमबॅक
14
T20 Mumbai League : कॅप्टन पृथ्वीची फसलेली चाल; सलामीवीर जोडीदाराला Retire Out करून स्वत:ही परतला तंबूत
15
“निवडणूक आयोग हा भाजपा आयोग, मतांवर टाकलेल्या दरोड्याची चौकशी का करत नाही?”: नाना पटोले
16
"गंभीर परिणाम भोगावे लागतील"; ट्रम्प यांचा मस्क यांच्याशी समेट करण्यास नकार, दिला मोठा इशारा
17
जनता त्यांना नाकारते, ते जनादेशाला नाकारतात! देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींना टोला
18
कोलंबियात भाषण देताना राष्ट्राध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या डोक्यात झाडली गोळी; हल्लेखोराला अटक
19
Bengaluru Stampede: कर्नाटक सरकारने भरपाईची वाढवली रक्कम; मृतांच्या कुटुंबियांना देणार २५ लाख रुपये
20
आता रिपब्लिकन घडवणार ट्रम्प-मस्क यांच्यात समेट, दोघांतील वादामुळे भविष्यात अडचणी वाढण्याची पक्षाला भीती

अर्थसंकल्पात भटक्या विमुक्त प्रवर्गाला पहिल्यांदाच भरगच्च निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST

अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांना ३८१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सन २०१२ पासून तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यापासून ५०० ...

अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांना ३८१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सन २०१२ पासून तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यापासून ५०० कोटी रुपयांपासून सुरू झालेले निधीचे वाटप व भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे भटक्या विमुक्त प्रवर्गाला निधी वाटपात काही अंशी न्याय मिळाला, असे प्रथमदर्शनी वाटते. अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या योजना प्रत्यक्षात राबतांना दिसत नाहीत, हेही जळजळीत वास्तव आहे. यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांसाठी तब्बल ३८१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

यात राज्यात राजकीय अनास्थेचा बळी ठरलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना गुंडाळून त्याऐवजी सावित्रीबाई फुले घरकुल योजना लागू करण्यात आली आहे.

यासाठी निधी मिळणार असल्याने विमुक्त भटक्यांना हक्काचे घरकुल मिळणार आहे.

महाज्योतीसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पांढरा हत्ती ठरलेल्या वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

मत्स्य व्यवसाय उद्योजकांसाठी १०० रुपये मंजूर करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळासाठी कारखान्याकडून जमा होणाऱ्या १० टक्के निधीवर तितकाच निधी देण्याचे मान्य केले आहे; मात्र या ऊसतोड भटक्या विमुक्त बांधवांसाठी ठोस अशा निधीची तरतूद करण्यात आली नाही.

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले; मात्र ठोस अशा निधीची तरतूद मात्र करण्यात आली नाही. निधीअभावी भटक्या विमुक्तांच्या थकीत असलेल्या शिष्यवृत्तीसंदर्भात कुठलीही निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे यापुढे भटक्या विमुक्त समाजातील मुलाबाळांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करणे गरजेचे होते ते न झाल्याने निराशा पदरी पडली आहे. या अर्थसंकल्पाचे संघर्षवहिनी व भटके विमुक्त परिषद व इतर भटक्या जमातीच्या संघटनांनी स्वागत केले आहे.