शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

अर्थसंकल्पात भटक्या विमुक्त प्रवर्गाला पहिल्यांदाच भरगच्च निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:35 IST

अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांना ३८१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सन २०१२ पासून तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यापासून ५०० ...

अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांना ३८१० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. सन २०१२ पासून तत्कालीन अर्थमंत्री जयंत पाटील यांच्यापासून ५०० कोटी रुपयांपासून सुरू झालेले निधीचे वाटप व भटक्या विमुक्त चळवळीतील कार्यकर्त्यांनी वेळोवेळी केलेल्या पाठपुराव्यामुळे भटक्या विमुक्त प्रवर्गाला निधी वाटपात काही अंशी न्याय मिळाला, असे प्रथमदर्शनी वाटते. अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आलेल्या योजना प्रत्यक्षात राबतांना दिसत नाहीत, हेही जळजळीत वास्तव आहे. यावर्षी सादर झालेल्या अर्थसंकल्पात भटक्या विमुक्तांसाठी तब्बल ३८१० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

यात राज्यात राजकीय अनास्थेचा बळी ठरलेली यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना गुंडाळून त्याऐवजी सावित्रीबाई फुले घरकुल योजना लागू करण्यात आली आहे.

यासाठी निधी मिळणार असल्याने विमुक्त भटक्यांना हक्काचे घरकुल मिळणार आहे.

महाज्योतीसाठी १५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पांढरा हत्ती ठरलेल्या वसंतराव नाईक भटके विमुक्त महामंडळासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भटक्या विमुक्तांच्या वस्त्यांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करण्यासाठी २५० कोटी रुपये मंजूर करण्यात आले.

मत्स्य व्यवसाय उद्योजकांसाठी १०० रुपये मंजूर करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार मंडळासाठी कारखान्याकडून जमा होणाऱ्या १० टक्के निधीवर तितकाच निधी देण्याचे मान्य केले आहे; मात्र या ऊसतोड भटक्या विमुक्त बांधवांसाठी ठोस अशा निधीची तरतूद करण्यात आली नाही.

बंजारा समाजाचे श्रद्धास्थान असलेल्या पोहरादेवीच्या विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे सांगितले; मात्र ठोस अशा निधीची तरतूद मात्र करण्यात आली नाही. निधीअभावी भटक्या विमुक्तांच्या थकीत असलेल्या शिष्यवृत्तीसंदर्भात कुठलीही निधीची तरतूद करण्यात आली नाही. त्यामुळे यापुढे भटक्या विमुक्त समाजातील मुलाबाळांना शिक्षणाची दारे खुली करण्यासाठी शिष्यवृत्तीची तरतूद करणे गरजेचे होते ते न झाल्याने निराशा पदरी पडली आहे. या अर्थसंकल्पाचे संघर्षवहिनी व भटके विमुक्त परिषद व इतर भटक्या जमातीच्या संघटनांनी स्वागत केले आहे.